शहरं
Join us  
Trending Stories
1
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
2
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
3
बीएसएफ जवानांची बस दरीत काेसळली; तिघांचा मृत्यू
4
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
5
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
6
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
7
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका
8
निवडणुकीपूर्वी दोघांनाही नवीन चिन्हे द्या; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका
9
एसटी बसला समाेरून धडकला ट्रक, सहा जणांचा मृत्यू; २० जण गंभीर जखमी, मृतांत तीन महिला
10
तिसऱ्या भिडूंच्या दंडबैठका; आघाडी अजून अपूर्ण
11
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; उद्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
12
एसआरएतील इमारती म्हणजे उभ्या झोपड्याच, उच्च न्यायालय; प्रकल्प राबवताना अधिकारांचे उल्लंघन
13
विनेशने काँग्रेसकडून तिकीट घेतले, तेच टोचले!
14
‘जे. जे.’ नर्सिंग होमला येणार कॉर्पोरेट लूक; खासगी रुग्णालयाप्रमाणे रचना, रुग्णांसाठी अत्याधुनिक सुविधा
15
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
16
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
17
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
18
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
19
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
20
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई

पर्यटकांना पाण्याच्या ठिकाणी जाण्यास मीरा भाईंदर - वसई विरार पोलीस आयुक्तालयाने घातली बंदी 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2021 5:33 PM

Mira Bhayander And Vasai Virar : मीरा भाईंदर - वसई विरार हद्दीत विस्तीर्ण समुद्रकिनारा असून या समुद्रकिनारी मोठ्या संख्येने हॉटेल, लॉज आहेत.

मीरा रोड - पावसाळ्यात समुद्र, धबधबे, धरण, नदी, खाडी, तलाव आदी पाण्याच्या ठिकाणी जाण्यास मीरा भाईंदर - वसई विरार पोलीस आयुक्तालयाने १८ ऑगस्टपर्यंत बंदी घातली आहे. त्यासाठी कलम १४४ नुसार फौजदारी मनाई आदेश पोलीस उपायुक्त विजयकांत सागर यांनी जारी केला आहे. 

मीरा भाईंदर - वसई विरार हद्दीत विस्तीर्ण समुद्रकिनारा असून या समुद्रकिनारी मोठ्या संख्येने हॉटेल, लॉज आहेत. समुद्रकिनारी पर्यटक तसेच मद्यपी मोठ्या संख्येने मौजमजेसाठी जात असतात. पावसाळ्यात समुद्र खवळलेला असतो. उंच लाटा उसळत असतात. अशा प्रसंगात समुद्रकिनारी, समुद्राच्या पाण्यात उतरणार्‍या पर्यटकांच्या जीवाला धोका असतो. समुद्रात बुडून मरण पावल्याच्या घटना नेहमीच घडत असतात. 

तशीच परिस्थिती ही चिंचोटी सारख्या धबधब्याच्या ठिकाणी असते. पावसात या ठिकाणी पर्यटक पाण्यात वाहून मरण पावल्याच्या घटना घडत असतात. काशीमीरा पोलीस ठाणे हद्दीतील चेणे गावात असलेल्या लक्ष्मी नदीत सुधा अनेक तरुण मद्यपी पार्टी झोडायला जात असतात. नदीत पोहायला उतरणारे अनेक जण बुडून मरण पावल्याच्या घटना दर वर्षी घडत असतात. त्या अनुषंगाने पावसाळ्यात जीवित हानी रोखण्यासाठी पोलीस उपायुक्तांनी मनाई आदेश जारी केला आहे.  १८ ऑगस्ट पर्यंत समुद्र, धबधबे, नदी, धरण आदी पाण्याच्या ठिकाणी जाण्यास तसेच पाण्यात उतरण्यास पर्यटकांना कायद्याने बंदी घालण्यात आलेली आहे.

सदर ठिकाणी सेल्फी काढणे, मद्यपान करणे, मध्य विक्री करणे, ध्वनीक्षेपक डीजे वाजवणे, रस्त्यांवर वाहने थांबवणे, प्लास्टिक- थर्माकोलचा कचरा टाकणे आदींवर बंदी घातली आहे. ध्वनी, वायु व जल प्रदूषण केल्यास कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. या बंदी आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर फौजदारी कारवाई केली जाणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे. 

 

टॅग्स :Vasai Virarवसई विरारRainपाऊस