शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

मीरा भाईंदर महापालिकेने कंत्राटी ६६० सुरक्षा रक्षक काढून टाकल्याने अत्यावश्यक ठिकाणी सुरक्षा बलाचे जवान नेमणार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2023 19:21 IST

लोकमत न्यूज नेटवर्क  मीरारोड - मीरा भाईंदर महापालिका आयुक्त संजय काटकर यांनी महापालिकेच्या विविध मालमत्ता ठिकाणी सुरक्षा रक्षक पुरवणाऱ्या ...

लोकमत न्यूज नेटवर्क 

मीरारोड - मीरा भाईंदर महापालिका आयुक्त संजय काटकर यांनी महापालिकेच्या विविध मालमत्ता ठिकाणी सुरक्षा रक्षक पुरवणाऱ्या ठेकेदाराची मुदत २०१८ सालीच संपुष्टात आलेली असल्याने ठेका रद्द केला आहे . त्यामुळे ६६० सुरक्षा रक्षक हे  सेवेतून कमी केल्याने त्यांच्या वेतनावर दर महिना १ कोटी ३५ लाख इतका खर्च वाचेल असा प्रशासनाचा दावा आहे . तर अत्यावश्यक ठिकाणी सुरक्षा रक्षकांची गरज नुसार अहवाल देण्यास विभाग प्रमुखांना आयुक्तांनी सांगितले असून तेथे महाराष्ट्र सुरक्षा बलाचे जवान नेमले जाणार आहेत . 

मीरा भाईंदर महापालिकेच्या शाळा , उद्याने , मैदाने , सभागृह , विविध कार्यालये , स्मशान भूमी , वाचनालय, पाण्याची टाकी, डम्पिंग आदी मालमत्तांच्या ठिकाणी खाजगी सुरक्षा रक्षक नेमले जात होते . सैनिक सिक्युरिटी ह्या ठेकेदारा मार्फत ६६० सुरक्षा रक्षक पालिकेच्या सेवेत नेमण्यात आले होते . काम करणाऱ्या ह्या सुरक्षा रक्षकां मध्ये काही तत्कालीन नगरसेवक व राजकारणी, काही अधिकारी आदींच्या वशिल्याने देखील अनेक जण काम करत होते . 

महापालिका आयुक्त काटकर यांनी सुरक्षा रक्षकांचा आढावा घेताना प्रशासकीय बैठकीत सैनिक सिक्युरिटीची सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला व त्या नुसार १ ऑक्टोबर पासून ठेका रद्द केला गेला . सदर ठेकेदाराची मुदत २०१८ सलातच संपलेली होती. त्यावेळी महासभेने सुरक्षा रक्षक मंडळ , सानपाडा यांच्या कडून माहिती घेऊन पुढील प्रक्रिया पूर्ण होई पर्यंत सैनिक सिक्युरिटीला मुदतवाढ देण्याचा ठराव केला होता . 

मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशा नुसार सैनिक सिक्युरिटी कडील कार्यरत सुरक्षा रक्षकांना सुरक्षा रक्षक मंडळ बृहन्मुंबई व ठाणे जिल्ह्या करीता नोंदणीची प्रक्रिया सुद्धा पूर्ण करण्यात आली आहे . परंतु सुरक्षा रक्षक मंडळ कडून त्यावर सुद्धा कोणताच प्रतिसाद मिळाला नाही .  दुसरीकडे महापालिकेने महाराष्ट्र सुरक्षा बलाचे २५० जवान सुरक्षेसाठी घेतलेले आहेत . त्यातील अधिकारी वर्गाला दिलेले जवान काढून घेण्यात आले आहेत . त्यांना पालिकेच्या अत्यावश्यक असलेल्या मालमत्तांच्या ठिकाणी सुरक्षेसाठी नेमले जाणार आहे . 

दरम्यान ६६० खाजगी सुरक्षा रक्षक कमी झाल्याने त्यांच्यावर बेरोजगारीची पाळी आली आहे . अचानक हातची नोकरी गेल्याने ते हवालदिल झाले आहेत . तर ठेकेदाराचे समर्थक आणि सुरक्षा रक्षकांना नेमण्यात वशिलेबाजी करणाऱ्यांची सुद्धा धावपळ सुरु झाल्याची चर्चा आहे . 

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदर