शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

मीरा भाईंदर महापालिकेने कंत्राटी ६६० सुरक्षा रक्षक काढून टाकल्याने अत्यावश्यक ठिकाणी सुरक्षा बलाचे जवान नेमणार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2023 19:21 IST

लोकमत न्यूज नेटवर्क  मीरारोड - मीरा भाईंदर महापालिका आयुक्त संजय काटकर यांनी महापालिकेच्या विविध मालमत्ता ठिकाणी सुरक्षा रक्षक पुरवणाऱ्या ...

लोकमत न्यूज नेटवर्क 

मीरारोड - मीरा भाईंदर महापालिका आयुक्त संजय काटकर यांनी महापालिकेच्या विविध मालमत्ता ठिकाणी सुरक्षा रक्षक पुरवणाऱ्या ठेकेदाराची मुदत २०१८ सालीच संपुष्टात आलेली असल्याने ठेका रद्द केला आहे . त्यामुळे ६६० सुरक्षा रक्षक हे  सेवेतून कमी केल्याने त्यांच्या वेतनावर दर महिना १ कोटी ३५ लाख इतका खर्च वाचेल असा प्रशासनाचा दावा आहे . तर अत्यावश्यक ठिकाणी सुरक्षा रक्षकांची गरज नुसार अहवाल देण्यास विभाग प्रमुखांना आयुक्तांनी सांगितले असून तेथे महाराष्ट्र सुरक्षा बलाचे जवान नेमले जाणार आहेत . 

मीरा भाईंदर महापालिकेच्या शाळा , उद्याने , मैदाने , सभागृह , विविध कार्यालये , स्मशान भूमी , वाचनालय, पाण्याची टाकी, डम्पिंग आदी मालमत्तांच्या ठिकाणी खाजगी सुरक्षा रक्षक नेमले जात होते . सैनिक सिक्युरिटी ह्या ठेकेदारा मार्फत ६६० सुरक्षा रक्षक पालिकेच्या सेवेत नेमण्यात आले होते . काम करणाऱ्या ह्या सुरक्षा रक्षकां मध्ये काही तत्कालीन नगरसेवक व राजकारणी, काही अधिकारी आदींच्या वशिल्याने देखील अनेक जण काम करत होते . 

महापालिका आयुक्त काटकर यांनी सुरक्षा रक्षकांचा आढावा घेताना प्रशासकीय बैठकीत सैनिक सिक्युरिटीची सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला व त्या नुसार १ ऑक्टोबर पासून ठेका रद्द केला गेला . सदर ठेकेदाराची मुदत २०१८ सलातच संपलेली होती. त्यावेळी महासभेने सुरक्षा रक्षक मंडळ , सानपाडा यांच्या कडून माहिती घेऊन पुढील प्रक्रिया पूर्ण होई पर्यंत सैनिक सिक्युरिटीला मुदतवाढ देण्याचा ठराव केला होता . 

मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशा नुसार सैनिक सिक्युरिटी कडील कार्यरत सुरक्षा रक्षकांना सुरक्षा रक्षक मंडळ बृहन्मुंबई व ठाणे जिल्ह्या करीता नोंदणीची प्रक्रिया सुद्धा पूर्ण करण्यात आली आहे . परंतु सुरक्षा रक्षक मंडळ कडून त्यावर सुद्धा कोणताच प्रतिसाद मिळाला नाही .  दुसरीकडे महापालिकेने महाराष्ट्र सुरक्षा बलाचे २५० जवान सुरक्षेसाठी घेतलेले आहेत . त्यातील अधिकारी वर्गाला दिलेले जवान काढून घेण्यात आले आहेत . त्यांना पालिकेच्या अत्यावश्यक असलेल्या मालमत्तांच्या ठिकाणी सुरक्षेसाठी नेमले जाणार आहे . 

दरम्यान ६६० खाजगी सुरक्षा रक्षक कमी झाल्याने त्यांच्यावर बेरोजगारीची पाळी आली आहे . अचानक हातची नोकरी गेल्याने ते हवालदिल झाले आहेत . तर ठेकेदाराचे समर्थक आणि सुरक्षा रक्षकांना नेमण्यात वशिलेबाजी करणाऱ्यांची सुद्धा धावपळ सुरु झाल्याची चर्चा आहे . 

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदर