शहरं
Join us  
Trending Stories
1
Congress: ठाकरेंना मोठा धक्का! काँग्रेसची 'एकला चलो'ची घोषणा; मुंबई महानगरपालिका स्वबळावर लढणार
2
अमेरिकेत महागाई वाढली, डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफवर घेतला यू-टर्न; भारताला मोठा फायदा होणार
3
लालू प्रसाद यादवांच्या मुलीचा खळबळजनक आरोप! रोहिणी म्हणाल्या "तेजस्वीने मला घरातून बाहेर..."
4
Rohini Aacharya: लालू प्रसाद यादवांच्या घरात ज्यांच्यामुळे सुरू झालं 'महाभारत', ते संजय यादव कोण?
5
एका वर्षात तिसरी वेळ! भारताच्या शेजारी देशात सापडली तब्बल १००० टन सोन्याची खाण, कोणता आहे देश?
6
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आज कराडात! सातारा जिल्ह्यामधील महाविकास आघाडी बाबत होणार निर्णय?
7
मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळ्यातील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीजवळ मातीचा ढिगारा कोसळला; २ मजुरांचा मृत्यू, ३ जखमी
8
दिल्ली ब्लास्ट प्रकरण : आता पठानकोटमधून आणखी एका डॉक्टरला अटक, अल-फलाह विद्यापीठात केली होती नोकरी
9
IPL 2026 : अय्यरसह मसल पॉवर रसेल OUT! मिनी लिलावासाठी शाहरुखच्या KKR च्या पर्समध्ये सर्वाधिक पैसा
10
इराण देशभरातील लोकांच्या मोबाईल फोनवर 'इमरजन्सी अलर्ट' का पाठवत आहे?
11
IPL 2026: प्रितीच्या पंजाबनं ग्लेन मॅक्सवेलला दाखवला ठेंगा! कोच रिकी पाँटिंगनं सांगितली आतली गोष्ट
12
जी मोटारसायकल चोरली, तिच्यावरच गेला जीव; मिरज रोडवर चोर ठार, कसा घडला अपघात?
13
Amravati Crime: छायाचा घरी येणाऱ्या विश्वंभरवर जडला जीव, पती प्रमोदची देवी दर्शनानंतर केली हत्या; लंघुशंकेसाठी थांबली अन्...
14
चुकूनही करू नका 'हे' काम, क्षणार्धात तुमचा मोबाईल फोन होऊ शकतो हॅक! गुगलने काय इशारा दिला?
15
नोकरी सोडून आयपीएस अधिकारी उतरले बिहार निवडणुकीच्या मैदानात; मराठमोळ्या लांडेंना किती मिळाली मते?
16
"रडायचं नाही लढायचं! बिहार निकालानं खचून जाऊ नका; मुंबई महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवा"
17
मशिदीचा पत्ता, मोबाइल SIM, थायलंड टूर अन्...! डॉ. शाहीन संदर्भात मोठा खुलासा; डॉ परवेझला कशासाठी नेलं होतं कानपूरला?
18
दिल्ली स्फोटापूर्वी उमर घाबरला होता, नवीन सीसीटीव्हीमध्ये खुलासा, दोन्ही फोन कुठे लपवले?
19
Ravindra Jadeja : जड्डूनं केली विक्रमांची 'बरसात'! WTC मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Travel : नवीन वर्ष परदेशात सेलिब्रेट करायचा विचार करताय? 'या' देशांमध्ये होऊ शकते खिशाला परवडणारी ट्रीप!
Daily Top 2Weekly Top 5

विरारमध्ये होते आहे बाजारामुळे वाहतूककोंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2019 23:06 IST

विरारमध्ये आठवडे : बाजारामुळे वाहतूक कोंडी

विरार : पश्चिमेला आठवड्यातून दोन दिवस आठवडे बाजार भरविला जातो. त्यासाठी येणारे नागरिक आपल्या गाड्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला पार्क करीत असल्याने वाहतूककोंडीत वाढ होऊ लागली आहे. तसेच बाजारातील फेरीवाले हे हळूहळू रस्त्यावर आपले बस्तान मांडत आहेत. मात्र, महानगरपालिका व वाहतूक पोलीस याकडे दुर्लक्ष करीत आहेत.

हा आठवडे बाजार पूर्वी एक दिवस (मंगळवारी) भरवला जात होता. पण काही महिन्यांपूर्वी जकात नाका मैदानात मंगळवार व शनिवार असे दोन दिवस तो भरविला जात आहे. या मैदानासमोरील रस्ता हा मुख्य रस्ता असून मोठ्या प्रमाणात वाहने इथून ये-जा करतात. तर बाजारात येणाऱ्या नागरिकांसाठी मैदानात जागा असतांनाही महानगरपालिकेने पार्किंगची योग्य सोय केली नसल्याने नागरिक बेशिस्तपणे रस्त्याच्या दोन्ही बाजूच्या कडेला तसेच नो पार्किंग लिहिलेल्या ठिकाणी सुद्धा गाड्या उभ्या करतात. यामुळे अर्धा रस्ता हा अनधिकृत पार्किंगमुळे व्यापला जातो. तसेच फेरीवाले फुटपाथची जागा देखील व्यापून टाकतात. ज्यामुळे नागरिकांना चालण्यासाठी जागा मिळत नाही.ज्या मैदानात हा बाजार भरवला जातो त्या समोरील हा रस्ता मुख्य रस्ता असल्याने अवजड वाहने देखील त्याचा उपयोग करतात. ग्राहकांच्या शोधात चालक रिक्षा भर रस्त्यात उभ्या करतात यासर्व कारणांमुळे वाहतूककोंडीमध्ये वाढ होत आहे. आठवडे बाजार हा नागरिकांना स्वस्त दरात वस्तू मिळाव्यात, यासाठी भरविण्यात येतो, पण आता त्याचा त्रास इतर नागरिकांना होऊ लागला आहे.महानगरपालिकेचे याकडे दुर्लक्ष होत असल्याने फेरीवाल्यांची मनमानी सुरु आहे. महानगरपालिका यावर कारवाई करत नसल्याने ही परिस्थिती उद्भवली आहे. ती बदलणार तरी कधी? असा सवाल नागरीक करीत आहेत.फुटपाथ वरून चालण्याची सोय नाही त्यामुळे आम्ही रस्त्याचा उपयोग करतो, पण आता रस्त्यावर गाड्या कशाही उभ्या केल्या जातात. इतकेच नाही तर रिक्षा चालकांचा हैदोस असतो. नेमकं कुठून जावं तेच कळत नाही.’’- विठू शेटे, नागरीकमाझं आॅफिस या बाजूला असल्याने मी रोज या रस्त्याचा वापर करते. माझी दुचाकी आहे, पण मंगळवार आणि शनिवार संध्याकाळी हा रस्ता संपूर्ण जाम असल्याने बराच वेळ कोंडी पार करण्यात जातो.-अर्पिता जाधव, नागरीक

टॅग्स :Vasai Virarवसई विरारTrafficवाहतूक कोंडी