शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

विरारमध्ये होते आहे बाजारामुळे वाहतूककोंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2019 23:06 IST

विरारमध्ये आठवडे : बाजारामुळे वाहतूक कोंडी

विरार : पश्चिमेला आठवड्यातून दोन दिवस आठवडे बाजार भरविला जातो. त्यासाठी येणारे नागरिक आपल्या गाड्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला पार्क करीत असल्याने वाहतूककोंडीत वाढ होऊ लागली आहे. तसेच बाजारातील फेरीवाले हे हळूहळू रस्त्यावर आपले बस्तान मांडत आहेत. मात्र, महानगरपालिका व वाहतूक पोलीस याकडे दुर्लक्ष करीत आहेत.

हा आठवडे बाजार पूर्वी एक दिवस (मंगळवारी) भरवला जात होता. पण काही महिन्यांपूर्वी जकात नाका मैदानात मंगळवार व शनिवार असे दोन दिवस तो भरविला जात आहे. या मैदानासमोरील रस्ता हा मुख्य रस्ता असून मोठ्या प्रमाणात वाहने इथून ये-जा करतात. तर बाजारात येणाऱ्या नागरिकांसाठी मैदानात जागा असतांनाही महानगरपालिकेने पार्किंगची योग्य सोय केली नसल्याने नागरिक बेशिस्तपणे रस्त्याच्या दोन्ही बाजूच्या कडेला तसेच नो पार्किंग लिहिलेल्या ठिकाणी सुद्धा गाड्या उभ्या करतात. यामुळे अर्धा रस्ता हा अनधिकृत पार्किंगमुळे व्यापला जातो. तसेच फेरीवाले फुटपाथची जागा देखील व्यापून टाकतात. ज्यामुळे नागरिकांना चालण्यासाठी जागा मिळत नाही.ज्या मैदानात हा बाजार भरवला जातो त्या समोरील हा रस्ता मुख्य रस्ता असल्याने अवजड वाहने देखील त्याचा उपयोग करतात. ग्राहकांच्या शोधात चालक रिक्षा भर रस्त्यात उभ्या करतात यासर्व कारणांमुळे वाहतूककोंडीमध्ये वाढ होत आहे. आठवडे बाजार हा नागरिकांना स्वस्त दरात वस्तू मिळाव्यात, यासाठी भरविण्यात येतो, पण आता त्याचा त्रास इतर नागरिकांना होऊ लागला आहे.महानगरपालिकेचे याकडे दुर्लक्ष होत असल्याने फेरीवाल्यांची मनमानी सुरु आहे. महानगरपालिका यावर कारवाई करत नसल्याने ही परिस्थिती उद्भवली आहे. ती बदलणार तरी कधी? असा सवाल नागरीक करीत आहेत.फुटपाथ वरून चालण्याची सोय नाही त्यामुळे आम्ही रस्त्याचा उपयोग करतो, पण आता रस्त्यावर गाड्या कशाही उभ्या केल्या जातात. इतकेच नाही तर रिक्षा चालकांचा हैदोस असतो. नेमकं कुठून जावं तेच कळत नाही.’’- विठू शेटे, नागरीकमाझं आॅफिस या बाजूला असल्याने मी रोज या रस्त्याचा वापर करते. माझी दुचाकी आहे, पण मंगळवार आणि शनिवार संध्याकाळी हा रस्ता संपूर्ण जाम असल्याने बराच वेळ कोंडी पार करण्यात जातो.-अर्पिता जाधव, नागरीक

टॅग्स :Vasai Virarवसई विरारTrafficवाहतूक कोंडी