शहरं
Join us  
Trending Stories
1
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिला सर्वोच्च सन्मान
2
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
3
पिंपरी-चिंचवडमध्ये ठाकरेंची 'मशाल' विझली; शहराध्यक्ष संजोग वाघेरेंचा राजीनामा; भाजपमध्ये प्रवेश निश्चित
4
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
5
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
6
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
7
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
8
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
9
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
10
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
11
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
12
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
13
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
14
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
15
बुरखा न घातल्याने पत्नीसह २ लेकींची हत्या; चेहरा दिसू नये म्हणून १८ वर्षे काढलं नाही आधार कार्ड
16
मोठी बातमी! भारत-ओमानमध्ये मुक्त व्यापार करार; देशातील 'या' उद्योगांना थेट फायदा
17
हरियाणामधील भाजपा सरकार संकटात, काँग्रेसने आणला अविश्वास प्रस्ताव, उद्या होणार चर्चा, असं आहे बहुमताचं गणित
18
एक योजना महात्मा गांधी के नाम...! मनरेगाचं नाव बदलण्याच्या धामधुमीतच ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
19
अमेरिकेकडून आणखी एक जहाजावर हल्ला, ४ जणांचा मृत्यू, व्हेनेझुएलाने घेतला मोठा निर्णय  
20
"प्रज्ञा सातव यांच्या राजीनाम्याची घटना दुर्दैवी, सत्तेच्या आणि पैशाच्या जोरावर भाजपा…’’ नाना पटोले यांची टीका   
Daily Top 2Weekly Top 5

डहाणूतील अनेक गावपाडे आजही नेटवर्कविना; गावकरी सोशल मीडियापासून दूरच

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2020 00:37 IST

डहाणू तालुक्यात मोठ्या प्रमाणात आदिवासी आहेत. डहाणूतील मुंबई-अहमदाबाद महामार्गाच्या पलीकडील भागात काही गावपाड्यांत नेटवर्क नसल्याने मोबाइल कॉल लागत नाही.

शौकत शेख

डहाणू : मुंबईपासून १२० किमी अंतरावर असलेल्या डहाणू तालुक्यातील असंख्य खेड्यापाड्यांत अद्यापही इंटरनेट सुविधा नसल्याने येथील ग्रामस्थ सध्याच्या जगापासून, सोशल मीडियापासून दूरच आहेत. कोरानामुळे विद्यार्थ्यांचे शिक्षण ऑनलाइन होत आहे. मात्र डहाणूच्या दुर्गम भागात नेटवर्कअभावी विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण घेता येत नाही. येथील आदिवासींना शैक्षणिकबरोबरच विविध शासकीय योजनेचे लाभ घेण्यासाठी ३० ते ४० किलोमीटर अंतरावर डहाणू शहरात येऊन अर्ज करावे लागतात. या खेड्यापाड्यांत नेटवर्कची सुविधा यावी, यासाठी प्रशासन उपाययोजना करीत नाही, अशी खंत ग्रामस्थ व्यक्त करतात.

डहाणू तालुक्यात मोठ्या प्रमाणात आदिवासी आहेत. डहाणूतील मुंबई-अहमदाबाद महामार्गाच्या पलीकडील भागात काही गावपाड्यांत नेटवर्क नसल्याने मोबाइल कॉल लागत नाही. डहाणूपासून ४५ किलोमीटर अंतरावर असलेल्या सायवन गावात गेल्या दोन वर्षांपासून इंटरनेट नेटवर्क सुविधा नाही. कासापासून १५ किलोमीटर अंतरावर हे गाव आहे. येथे परिसरातील आदिवासी दैनंदिन वस्तू खरेदी-विक्रीसाठी येतात. येथे ग्रामीण आरोग्य रुग्णालय, बँका, जिल्हा परिषद शाळा, पोलीस ठाणे, वनविभाग कार्यालय, ग्रामपंचायत आहे. परंतु नेटवर्कअभावी प्रशासकीय कामाचाही अनेकदा खोळंबा होतो.

सध्या प्रशासन सरकारच्या बहुसंख्य योजनेसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागवत असते. या योजनांची येथील नागरिकांपर्यंत योग्य रीतीने माहिती पोहोचत नाही. त्यांचा गोंधळ उडतो. डहाणूच्या गंजाड, शेल्टी, वधना, रानशेत, साखरे, खुबाले, अवधानी, रायपूर इ. गावांत फोन लागत नसल्याने ग्रामस्थांना १०-१५ किलोमीटर अंतरावर जाऊन संपर्क साधावा लागतो.  या गावपाड्यात नेटवर्कसाठी लवकर योग्य ती सोय करावी, अशी मागणी होत आहे.

आमच्याकडील भागात सातत्याने भूकंप होत आहे. मात्र आमचे फोन लागत नाहीत. या भागात एखादी घटना घडल्यावर प्रशासनाशी संपर्क साधायचा कसा? असा प्रश्न पडतो.-  रामदास सुतार, खुबाळे, डहाणू

टॅग्स :Internetइंटरनेट