शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांनो काळजी घ्या! पुढील २४ तासांसाठी पावसाचा रेडअलर्ट, हवामान खात्याचा इशारा
2
आता खामेनेईचा खात्मा करणारच..: हॉस्पिटलवरील हल्ल्यानंतर इस्त्रायलचे खुले चॅलेंज
3
इराणच्या हल्ल्यात इस्त्रायली एअर डिफेन्स फेल; मित्राची झाली आठवण, भारताला आला कॉल, आता...
4
जगाला हादरवणारी बातमी! इराणने इस्रायलचा शेअर बाजार उडवला; तुमच्या गुंतवणुकीवर काय परिणाम होणार?
5
Rain Update: रायगडमधील तीन नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी, तीन पर्यटन ठिकाणी जाण्यास बंदी
6
...तर अमेरिका किम जोंग उन यांच्या देशावर अणुबॉम्ब टाकेल; यांनी केला मोठा दावा
7
₹८,००० कोटींची गुंतवणूक... अंबानींनी केली Coca-Cola आणि Pepsi ला टक्कर देण्याची तयारी; काय आहे प्लान?
8
मुंबई, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यासह पुणे घाट, सातारा घाट परिसरात 24 तासांसाठी ऑरेंज अलर्ट
9
धक्कादायक! "लग्न ठरल्यानंतर सोनम दिवसातून फक्त..."; राजा रघुवंशीच्या मित्राचा मोठा खुलासा
10
बसच्या तिकिटामुळे हत्या उघडकीस आली! पाच वर्षाचे रिलेशन, लग्नाची इच्छा, घडलं वेगळंच
11
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर: १० राशी मालामाल, इच्छापूर्ती काळ; अचानक पैसे मिळतील, चांगले घडेल!
12
Video: इलॉन मस्क यांना मोठा धक्का; प्रक्षेपणादरम्यान SpaceX च्या स्टारशिप रॉकेटमध्ये स्फोट
13
Air India Plane Crash: 'असं वाटलं पाकिस्ताननेच मिसाईल हल्ला केला, चार मित्र गमावले'; अपघातातून वाचलेल्या केशवने सांगितला थरार
14
ठाकरेंसोबत रात्रीतून खेळ झाला! काल मातोश्रीवर आलेले 'ते' दोन नेते आज शिंदेंच्या शिवसेनेत
15
लीड्स टेस्टपूर्वीच टीम इंडियाला मोठा झटका, 259 धावा करणाऱ्या 'या' क्रिकेटरला दुखापत! नेमकं काय घडलं? आता कशी असेल प्लेइंग 11?
16
Ashadhi Ekadashi 2025: संत नामदेवांनी पांडुरंगाच्या आरतीत उल्लेखलेली 'राही' नेमकी कोण?
17
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राहुल गांधी यांना वाढदिवसानिमित्त दिल्या खास शुभेच्छा, म्हणाले...
18
Shree Swami Samarth: एक पैशाचा खर्च नाही, ‘हा’ उपाय एकदा करून पाहा; स्वामी कायम पाठीशी असतील, अशक्यही शक्य होईल!
19
चालत्या रिक्षात अचानक झाला स्फोट; आगीत महिला प्रवासी जिवंत जळाली, ५ जण जखमी
20
Air India Plane Crash Insurance Claim : अहमदाबाद विमान अपघात: Air India ४,०८० कोटी रुपयांचा 'इन्श्युरन्स क्लेम' करणार, इतिहासातील सर्वाधिक आकडा ठरणार?

विक्रमगडमध्ये माळरानाला लागली आग; महावितरणचा निष्काळजीपणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2020 00:40 IST

आंबा, काजूची ५० फळझाडे जळून खाक  

विक्रमगड : महावितरणाच्या निष्काळजीपणामुळे माळरान शेतीचे आगीमुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याची दुर्दैवी घटना रविवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास घडली. विक्रमगड तालुक्यातील ओंदे गावातील शेतकरी गजानन देऊ पाटील यांच्या माळरान शेतीतील वैरणावर महावितरण वाहिनीच्या तारांचा एकमेकांना स्पर्श होऊन ठिणगी पडली आणि मोठ्या प्रमाणावर आग लागली.

गजानन पाटील यांनी त्यांच्या माळरान शेतीवर लागवड केलेली आंबा/ काजूची ५० फळझाडे जळून खाक झाली आहेत. या शेतीमधून महावितरण कंपनीची विद्युत वाहिनी गेली आहे. या विद्युत वाहिनीच्या तारांचा एकमेकांना स्पर्श होऊन (स्पार्किंग) त्याची ठिणगी माळरान शेतीतील सुक्या वैरणीवर पडल्यामुळे आग लागली. या आगीत पाच एकर माळावरील वैरण जळून खाक झाली व लागवड केलेले आंबे व काजू यांची ५० झाडेदेखील जळून खाक झाली आहेत. त्यामुळे गजानन पाटील यांचे मोठे नुकसान झाले आहे.

२०१६ सालीही महावितरणाच्या निष्काळजीपणामुळे अशीच आग लागल्याने चार दुधाळ म्हैशींचा होरपळून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली होती. यात दोन लाखांहून अधिक रुपयांचे नुकसान झाले होते. मात्र पंचनामा करूनही महावितरणकडून कुठलीही नुकसानभरपाई देण्यात आली नसल्याचा आरोप विनायक पाटील यांनी केला आहे. २०१८ व २०१९ सालीही पुन्हा आग लागली होती. तेव्हादेखील नुकसान झाले होते, याबाबत महावितरणकडे लेखी तक्रार करूनही दखल घेतली गेली नव्हती. वारंवार लागणाऱ्या आगींमुळे गजानन पाटील यांनी महावितरणविरोधात तीव्र संताप व्यक्त केला आहे.

दरवर्षी घडतात आगीच्या घटनादरवर्षी महावितरणच्या विद्युत वाहिनीच्या तारांचा स्पर्श होऊन आग लागण्याचे प्रकार घडत आहेत, मात्र महावितरणकडे तक्रार करूनही महावितरण दखल घेत नाही. त्यामुळे स्पार्किंगमुळे आग लागण्याचे प्रमाण वाढतच आहे. 

टॅग्स :fireआगmahavitaranमहावितरणFarmerशेतकरी