शहरं
Join us  
Trending Stories
1
नवी मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांसाठी दिवाळी बोनस जाहीर, कोणाला किती पैसे मिळणार?
2
'तिकीट वाटप'वरून काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये पाटणा एअरपोर्टवर तुफान हाणामारी, व्हिडीओ व्हायरल!
3
भीषण संघर्षानंतर पाकिस्तानची शस्रसंधीसाठी अफगाणिस्तानला विनवणी, दोन्ही देशांत ४८ तासांसाठी युद्धविराम
4
जैसलमेर दुर्घटनेनंतर आता जयपूरमध्ये धावत्या बसला आग, परिसरात खळबळ!
5
प्रसिद्ध लेखिका अर्चना शंभरकर यांचे निधन, वयाच्या ५२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास!
6
Bihar Elections: मैथिली ठाकूर यांचा मतदारसंघ ठरला, कुणाची तिकिटं कापली; भाजपची दुसरी यादी जाहीर
7
फूड डिलिव्हरी ॲपला २१ लाखांचा चुना, २ वर्षे फुकट जेवला; तरुणाचा झुगाड पाहून चक्रावून जाल!
8
सांगलीत 'भोसले टोळी'चा धुमाकूळ; भरदिवसा घरफोड्या करून ४७ तोळे सोने लंपास
9
Silver Supply Crunch: जास्त पैसे देऊन विकत घ्यायला तयार, पण लोकांना बाजारात चांदी मिळेना?
10
सासूसोबत अफेअर, अश्लील व्हिडीओ आणि..., जावयाच्या हत्येची धक्कादायक कहाणी समोर
11
रोहित शर्मा मोठ्या विक्रमाच्या उंबरठ्यावर; ५४ धावा करताच सौरव गांगुलीला टाकणार मागे!
12
डॉक्टर पतीने केली पत्नीची हत्या, भासवला नैसर्गिक मृत्यू , अखेर ६ महिन्यांनी असं फुटलं बिंग 
13
'खट्याळ सासू नाठाळ सून' सिनेमात निवेदिता सराफ यांना होती पहिली पसंती, पण नंतर वर्षा उसगांवकर यांची लागली वर्णी
14
Ghost Town Visitor: हा फोटो काढायला दहा वर्षे लागली अन् ठरला 'फोटोग्राफर ऑफ द ईयर'; सगळी स्टोरी काय?
15
आई-वडील, दोन मुली, एक मुलगा...; जैसलमेर बस दुर्घटनेत अख्खं कुटुंब जळून खाक!
16
"...म्हणूनच आज शरद पवार त्यांच्यासोबत गेले नाहीत"; विरोधकांच्या आरोपांना CM फडणवीसांचे जोरदार उत्तर
17
1 रुपयात दररोज 2 GB डेटा, अनलिमिटेड कॉलिंग अन्..; BSNL ने आणली नवीन दिवाळी ऑफर
18
बाळासाहेब थोरातांचा १ लाख  नाही तर एवढ्या मतांनी पराभव, राज ठाकरेंचा तो दावा ठरला चुकीचा
19
Ranji Trophy : पुणेकर झाला महाराष्ट्र संघाचा 'कणा'; ऋतुराज गायकवाडचं शतक थोडक्यात हुकलं, पण...
20
"आम्ही त्यांचं नाव जगाच्या नकाशावरून पुसून टाकू" इस्रायलची हमासला धमकी!

विक्रमगडमध्ये माळरानाला लागली आग; महावितरणचा निष्काळजीपणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2020 00:40 IST

आंबा, काजूची ५० फळझाडे जळून खाक  

विक्रमगड : महावितरणाच्या निष्काळजीपणामुळे माळरान शेतीचे आगीमुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याची दुर्दैवी घटना रविवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास घडली. विक्रमगड तालुक्यातील ओंदे गावातील शेतकरी गजानन देऊ पाटील यांच्या माळरान शेतीतील वैरणावर महावितरण वाहिनीच्या तारांचा एकमेकांना स्पर्श होऊन ठिणगी पडली आणि मोठ्या प्रमाणावर आग लागली.

गजानन पाटील यांनी त्यांच्या माळरान शेतीवर लागवड केलेली आंबा/ काजूची ५० फळझाडे जळून खाक झाली आहेत. या शेतीमधून महावितरण कंपनीची विद्युत वाहिनी गेली आहे. या विद्युत वाहिनीच्या तारांचा एकमेकांना स्पर्श होऊन (स्पार्किंग) त्याची ठिणगी माळरान शेतीतील सुक्या वैरणीवर पडल्यामुळे आग लागली. या आगीत पाच एकर माळावरील वैरण जळून खाक झाली व लागवड केलेले आंबे व काजू यांची ५० झाडेदेखील जळून खाक झाली आहेत. त्यामुळे गजानन पाटील यांचे मोठे नुकसान झाले आहे.

२०१६ सालीही महावितरणाच्या निष्काळजीपणामुळे अशीच आग लागल्याने चार दुधाळ म्हैशींचा होरपळून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली होती. यात दोन लाखांहून अधिक रुपयांचे नुकसान झाले होते. मात्र पंचनामा करूनही महावितरणकडून कुठलीही नुकसानभरपाई देण्यात आली नसल्याचा आरोप विनायक पाटील यांनी केला आहे. २०१८ व २०१९ सालीही पुन्हा आग लागली होती. तेव्हादेखील नुकसान झाले होते, याबाबत महावितरणकडे लेखी तक्रार करूनही दखल घेतली गेली नव्हती. वारंवार लागणाऱ्या आगींमुळे गजानन पाटील यांनी महावितरणविरोधात तीव्र संताप व्यक्त केला आहे.

दरवर्षी घडतात आगीच्या घटनादरवर्षी महावितरणच्या विद्युत वाहिनीच्या तारांचा स्पर्श होऊन आग लागण्याचे प्रकार घडत आहेत, मात्र महावितरणकडे तक्रार करूनही महावितरण दखल घेत नाही. त्यामुळे स्पार्किंगमुळे आग लागण्याचे प्रमाण वाढतच आहे. 

टॅग्स :fireआगmahavitaranमहावितरणFarmerशेतकरी