शहरं
Join us  
Trending Stories
1
'काळजी करू नका; तुम्हाला जे हवे, तेच होणार', पहलगामबाबत राजनाथ सिंह यांचे सूचक विधान
2
कुख्यात नक्षलवाद्याला दहशतवाद विरोधी पथकाने केली अटक, ६-७ वर्षांपासून होता फरार
3
PBKS vs LSG : बॅटिंग-बॉलिंगमध्ये 'सिंग इज किंग शो'; पंतच्या लखनौसमोर श्रेयस अय्यरच्या पंजाबचा 'भांगडा'
4
"...त्यासाठी सुंदर महिलांना अमेरिकेत पाठवा’’, ज्येष्ठ पत्रकाराचा पाकिस्तानला अजब सल्ला, आता होतेय टीका   
5
सीमेवर तणाव, त्यात पाकिस्तानच्या या मित्रदेशाने थेट कराचीला पाठवली युद्धनौका, कारण काय?
6
विमानतळावर उतरताना भिंतीवर आदळले विमान, वैमानिकाने उडी मारून वाचवले प्राण
7
नागपुरात शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्याविरोधात विनयभंग, फसवणुकीचा गुन्हा दाखल
8
पाच लग्नं केली, सहाव्याच्या तयारीत होता, पण पीडित पत्नीने घेतली पोलिसांत धाव, पोलिसाचाच कारनामा झाला उघड
9
सेंच्युरी हुकली; फिफ्टी प्लस धावसंख्येसह प्रभसिमरन याने साधला मोठा डाव; गेलच्या विक्रमाशी बरोबरी
10
मोदी पहलगाममधील दहशतवाद्यांना धडा कधी शिकवणार? काँग्रेस नेत्याचा सवाल, राफेलला म्हटलं खेळणं  
11
अजिंक्य रहाणेनं घेतलेला कॅच भारीच! याशिवाय या दोन गोष्टींची रंगली चर्चा (VIDEO)
12
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
13
KKR vs RR : "हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे..." गाणं वाजलंच होतं, पण कॅसेट गुंडाळलं अन्...
14
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी चालवली रिक्षा
15
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूत सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
16
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
17
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
18
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
19
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
20
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या

विक्रमगडमध्ये माळरानाला लागली आग; महावितरणचा निष्काळजीपणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2020 00:40 IST

आंबा, काजूची ५० फळझाडे जळून खाक  

विक्रमगड : महावितरणाच्या निष्काळजीपणामुळे माळरान शेतीचे आगीमुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याची दुर्दैवी घटना रविवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास घडली. विक्रमगड तालुक्यातील ओंदे गावातील शेतकरी गजानन देऊ पाटील यांच्या माळरान शेतीतील वैरणावर महावितरण वाहिनीच्या तारांचा एकमेकांना स्पर्श होऊन ठिणगी पडली आणि मोठ्या प्रमाणावर आग लागली.

गजानन पाटील यांनी त्यांच्या माळरान शेतीवर लागवड केलेली आंबा/ काजूची ५० फळझाडे जळून खाक झाली आहेत. या शेतीमधून महावितरण कंपनीची विद्युत वाहिनी गेली आहे. या विद्युत वाहिनीच्या तारांचा एकमेकांना स्पर्श होऊन (स्पार्किंग) त्याची ठिणगी माळरान शेतीतील सुक्या वैरणीवर पडल्यामुळे आग लागली. या आगीत पाच एकर माळावरील वैरण जळून खाक झाली व लागवड केलेले आंबे व काजू यांची ५० झाडेदेखील जळून खाक झाली आहेत. त्यामुळे गजानन पाटील यांचे मोठे नुकसान झाले आहे.

२०१६ सालीही महावितरणाच्या निष्काळजीपणामुळे अशीच आग लागल्याने चार दुधाळ म्हैशींचा होरपळून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली होती. यात दोन लाखांहून अधिक रुपयांचे नुकसान झाले होते. मात्र पंचनामा करूनही महावितरणकडून कुठलीही नुकसानभरपाई देण्यात आली नसल्याचा आरोप विनायक पाटील यांनी केला आहे. २०१८ व २०१९ सालीही पुन्हा आग लागली होती. तेव्हादेखील नुकसान झाले होते, याबाबत महावितरणकडे लेखी तक्रार करूनही दखल घेतली गेली नव्हती. वारंवार लागणाऱ्या आगींमुळे गजानन पाटील यांनी महावितरणविरोधात तीव्र संताप व्यक्त केला आहे.

दरवर्षी घडतात आगीच्या घटनादरवर्षी महावितरणच्या विद्युत वाहिनीच्या तारांचा स्पर्श होऊन आग लागण्याचे प्रकार घडत आहेत, मात्र महावितरणकडे तक्रार करूनही महावितरण दखल घेत नाही. त्यामुळे स्पार्किंगमुळे आग लागण्याचे प्रमाण वाढतच आहे. 

टॅग्स :fireआगmahavitaranमहावितरणFarmerशेतकरी