शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: पालघरमधील ‘ठाकूर’शाही संपुष्टात आली?; कथित पैसे वाटपाच्या गोंधळाने नुकसानच झालं

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2024 06:23 IST

Maharashtra Assembly Election 2024 Results Highlights: अलीकडेच झालेल्या लोकसभा निवडणुकीतच खरे तर ‘ठाकूरशाही’ संपेल, असे संकेत मिळाले होते.

जगदीश भोवडमुख्य उपसंपादक

वसई-विरारचे अनभिषिक्त सम्राट अशी ओळख असलेल्या, बहुजन विकास आघाडीचे सर्वेसर्वा हितेंद्र ठाकूर यांचे राज्य आता खालसा झाले आहे. राज्यभरात अनेक ठिकाणी धक्कादायक निकाल लागले, त्यात हितेंद्र ठाकूर यांचे वर्चस्व असलेल्या वसई, नालासोपारा आणि बोईसर या तीन मतदारसंघांचाही समावेश आहे. यामुळे पालघरच्या निकालाने हितेंद्र ठाकूर यांचे राजकारण संकुचित केले का? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

हितेंद्र ठाकूर, त्यांचे चिरंजीव क्षितिज ठाकूर आणि राजेश पाटील या आमदारांना पराभूत का व्हावे लागले? त्यामागची कारणे काय? गेली ३०-३५ वर्षे निरंकुश सत्ता राबविणाऱ्या ठाकूर यांना यंदा तिहेरी धक्का का बसला? त्यांचे राजकारण चुकले का? असे अनेक प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहेत. वसई-विरार महापालिकेच्या स्थापनेपासून हितेंद्र ठाकूर यांचे महापालिकेवर वर्चस्व राहिले होते. महापालिकेसह जिल्हा परिषद, नगरपालिका, ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत ठाकूर यांची एकहाती सत्ता असण्याचे दिवस आता संपले आहेत. एका अर्थाने  त्यांची ‘ठाकूरशाही’च  संपली असल्याचे संकेत या यावेळच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालांनी दिले आहेत.

हितेंद्र ठाकूर यांचा प्रभाव असलेल्या तीनही विधानसभा मतदारसंघांत महायुतीतील भाजप आणि शिंदेसेनेच्या उमेदवारांना स्पष्ट बहुमत देत वसई-विरारकरांनी, तसेच तालुक्यातील नागरिकांनी ठाकूर यांच्या एकाधिकारशाहीला छेद दिला आहे. ठाकूर यांच्या पराभवाची आता जी काही कारणे दिली जात आहेत, त्यात मुलांप्रती असलेले अतीव प्रेम, कार्यकर्त्यांसोबतची तुटलेली नाळ, पावलोपावली पदाधिकाऱ्यांचा होणारा अपमान आणि शहरातील गेल्या अनेक वर्षांचे न सुटलेले प्रश्न आदींचा समावेश आहे. अलीकडेच झालेल्या लोकसभा निवडणुकीतच खरे तर ‘ठाकूरशाही’ संपेल, असे संकेत मिळाले होते. भाजपचे लोकसभेचे उमेदवार डॉ. हेमंत सवरा यांना वसई, नालासोपारा, बोईसर भागात मोठे मताधिक्य मिळाले होते. भाजप जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदारसंघांत आघाडी घेतो आणि  बहुजन विकास आघाडीचा उमेदवार तिसऱ्या क्रमांकावर फेकला जातो, यातून हितेंद्र ठाकूर यांनी कोणताही बोध घेतला नाही.

येथे फक्त आमचेच चालणार, आम्हाला काहीच फरक पडणार नाही, अशीच नेहमी हितेंद्र ठाकूर यांची भाषा असायची. त्यातच त्यांचे जवळचे काही कार्यकर्ते दुखावले होते. विशेषत: त्यांच्या नात्यातीलच असलेले राजीव पाटील हेही दुखावलेले होते. ते  भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा होती. मात्र, राजीव पाटील यांच्या आईने पुकारलेल्या असहकारामुळे त्यांना निर्णय बदलावा लागला होता; परंतु ते प्रचारादरम्यान फारसे सक्रिय असल्याचे दिसले नाही, तसेच निवडणुकीच्या आदल्या दिवशी भाजपचे राष्ट्रीय नेते विनोद तावडे यांना पैसे वाटप प्रकरणात गोवण्याचा झालेला प्रयत्नही फारसा यशस्वी ठरला नाही. त्यातून बविआचा फायदा होण्याऐवजी नुकसानच झाल्याचे बोलले जात आहे.

टॅग्स :maharashtra assembly election 2024 resultमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024palghar-acपालघरvasai-acवसईHitendra Thakurहितेंद्र ठाकूरKshitij thakurक्षितिज ठाकूरBJPभाजपा