शहरं
Join us  
Trending Stories
1
फक्त मराठीच अनिवार्य, हिंदी सक्तीवर सरकारचे एक पाऊल मागे; नवीन आदेश काढणार
2
'हा' अमित मिश्रा वेगळा... कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप झालेला क्रिकेटर नेमका कोण? जाणून घ्या...
3
पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींचा गृहमंत्र्यांना फोन; अमित शाहांना जम्मू-काश्मीरला जाण्याची सूचना
4
मत्स्य व्यवसायाला कृषी क्षेत्रासारखाच दर्जा; मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय
5
बँकेने गुन्हा दाखल केल्याने त्याची सटकली, साथीदारांना सोबत घेत अख्खी बँकच पेटवली
6
UPSC पास झाल्यानंतर उमेदवारांना पहिला पगार कधी आणि किती मिळतो? पाहा...
7
"मुस्लीम राजेशाही असो अथवा लोकशाही, वक्फ सर्वत्र...;" सौदीत पोहोचलेल्या PM मोदींवर ओवेसींचा निशाणा
8
Jammu and Kashmir : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये मोठा दहशतवादी हल्ला; पर्यटकांवर केला गोळीबार, २ जण जखमी
9
Jammu and Kashmir : दहशतवाद्यांनी पर्यटकांना आधी विचारला 'हा' प्रश्न अन् सुरू केला गोळीबार, नेमकं काय घडलं?
10
दहशतवाद्यांनी आधी धर्म विचारला, नंतर झाडल्या गोळ्या, पहलगाम हल्ल्यातील जखमींचा धक्कादायक दावा   
11
'नरेंद्र मोदी जगातील सर्वात लोकप्रिय नेते', जेडी व्हेन्स यांनी केले पंतप्रधानांचे कौतुक...
12
IPL 2025: हर्षा भोगलेंना KKRच्या मॅचमधून मुद्दाम वगळलं? खुद्द त्यांनीच दिलं स्पष्टीकरण
13
तेव्हा सलग १७ वर्षे घटत होते सोन्याचे दर, झालं होतं एवढं स्वस्त, मात्र आता...  
14
जालना: बॉयफ्रेंडकडून बदनामीच्या धमक्या, १८ वर्षीय तरुणीने संपवलं आयुष्य, मृतदेह कुठे सापडला?
15
टेबल फॅन खूपच खराब झालाय? स्वच्छ करण्यासाठी पाहा 'ही' सोपी पद्धत, पंखा दिसेल नव्यासारखा
16
नरेंद्र मोदींचं विमान सौदी अरेबियाच्या हवाई हद्दीत प्रवेश करताच घडलं असं काही, सारेच अवाक्
17
सलग सहाव्या दिवशी बाजार तेजीत बंद; 'या' बँकांच्या शेअर्सने खाल्ला भाव; कोणत्या सेक्टरमध्ये घसरण?
18
बापरे! सासू अन् जावयानंतर आता विवाहित महिला १५ वर्षाच्या मुलासोबत फरार, प्रकरण काय?
19
सोन्यानं पार केला १ लाखांचा टप्पा, शक्ती कपूरनं ३५ वर्षांपूर्वीच केलेली भविष्यवाणी; व्हिडीओ व्हायरल
20
'२३७ जागा मिळल्याचा माज करू नका, शिंदेंमुळे त्या मिळाल्या', शिवसेना आमदार कदमांचा अतुल सावेंवर पलटवार

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: पालघरमधील ‘ठाकूर’शाही संपुष्टात आली?; कथित पैसे वाटपाच्या गोंधळाने नुकसानच झालं

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2024 06:23 IST

Maharashtra Assembly Election 2024 Results Highlights: अलीकडेच झालेल्या लोकसभा निवडणुकीतच खरे तर ‘ठाकूरशाही’ संपेल, असे संकेत मिळाले होते.

जगदीश भोवडमुख्य उपसंपादक

वसई-विरारचे अनभिषिक्त सम्राट अशी ओळख असलेल्या, बहुजन विकास आघाडीचे सर्वेसर्वा हितेंद्र ठाकूर यांचे राज्य आता खालसा झाले आहे. राज्यभरात अनेक ठिकाणी धक्कादायक निकाल लागले, त्यात हितेंद्र ठाकूर यांचे वर्चस्व असलेल्या वसई, नालासोपारा आणि बोईसर या तीन मतदारसंघांचाही समावेश आहे. यामुळे पालघरच्या निकालाने हितेंद्र ठाकूर यांचे राजकारण संकुचित केले का? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

हितेंद्र ठाकूर, त्यांचे चिरंजीव क्षितिज ठाकूर आणि राजेश पाटील या आमदारांना पराभूत का व्हावे लागले? त्यामागची कारणे काय? गेली ३०-३५ वर्षे निरंकुश सत्ता राबविणाऱ्या ठाकूर यांना यंदा तिहेरी धक्का का बसला? त्यांचे राजकारण चुकले का? असे अनेक प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहेत. वसई-विरार महापालिकेच्या स्थापनेपासून हितेंद्र ठाकूर यांचे महापालिकेवर वर्चस्व राहिले होते. महापालिकेसह जिल्हा परिषद, नगरपालिका, ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत ठाकूर यांची एकहाती सत्ता असण्याचे दिवस आता संपले आहेत. एका अर्थाने  त्यांची ‘ठाकूरशाही’च  संपली असल्याचे संकेत या यावेळच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालांनी दिले आहेत.

हितेंद्र ठाकूर यांचा प्रभाव असलेल्या तीनही विधानसभा मतदारसंघांत महायुतीतील भाजप आणि शिंदेसेनेच्या उमेदवारांना स्पष्ट बहुमत देत वसई-विरारकरांनी, तसेच तालुक्यातील नागरिकांनी ठाकूर यांच्या एकाधिकारशाहीला छेद दिला आहे. ठाकूर यांच्या पराभवाची आता जी काही कारणे दिली जात आहेत, त्यात मुलांप्रती असलेले अतीव प्रेम, कार्यकर्त्यांसोबतची तुटलेली नाळ, पावलोपावली पदाधिकाऱ्यांचा होणारा अपमान आणि शहरातील गेल्या अनेक वर्षांचे न सुटलेले प्रश्न आदींचा समावेश आहे. अलीकडेच झालेल्या लोकसभा निवडणुकीतच खरे तर ‘ठाकूरशाही’ संपेल, असे संकेत मिळाले होते. भाजपचे लोकसभेचे उमेदवार डॉ. हेमंत सवरा यांना वसई, नालासोपारा, बोईसर भागात मोठे मताधिक्य मिळाले होते. भाजप जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदारसंघांत आघाडी घेतो आणि  बहुजन विकास आघाडीचा उमेदवार तिसऱ्या क्रमांकावर फेकला जातो, यातून हितेंद्र ठाकूर यांनी कोणताही बोध घेतला नाही.

येथे फक्त आमचेच चालणार, आम्हाला काहीच फरक पडणार नाही, अशीच नेहमी हितेंद्र ठाकूर यांची भाषा असायची. त्यातच त्यांचे जवळचे काही कार्यकर्ते दुखावले होते. विशेषत: त्यांच्या नात्यातीलच असलेले राजीव पाटील हेही दुखावलेले होते. ते  भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा होती. मात्र, राजीव पाटील यांच्या आईने पुकारलेल्या असहकारामुळे त्यांना निर्णय बदलावा लागला होता; परंतु ते प्रचारादरम्यान फारसे सक्रिय असल्याचे दिसले नाही, तसेच निवडणुकीच्या आदल्या दिवशी भाजपचे राष्ट्रीय नेते विनोद तावडे यांना पैसे वाटप प्रकरणात गोवण्याचा झालेला प्रयत्नही फारसा यशस्वी ठरला नाही. त्यातून बविआचा फायदा होण्याऐवजी नुकसानच झाल्याचे बोलले जात आहे.

टॅग्स :maharashtra assembly election 2024 resultमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024palghar-acपालघरvasai-acवसईHitendra Thakurहितेंद्र ठाकूरKshitij thakurक्षितिज ठाकूरBJPभाजपा