शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
2
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
3
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
4
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
5
“महाराष्ट्र विधानपरिषद देशासाठी आदर्श”; विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे कौतुकोद्गार
6
Mamata Banerjee : "मी माफी मागते"; मेस्सीच्या कार्यक्रमातील गोंधळ पाहून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी नाराज
7
H-1B व्हिसाच्या नव्या नियमांवरुन ट्रम्पच गोत्यात, वॉशिंग्टन ते कॅलिफोर्नियापर्यंत १९ राज्यांनी कोर्टाचा दरवाजा ठोठावला
8
इंडिगोला आणखी एक धक्का; रांचीत लँडिंग दरम्यान 'टेल स्ट्राइक'; थोडक्यात वाचले ७० प्रवासी
9
सॉल्ट लेक स्टेडियम तोडफोडप्रकरणी आयोजकाला अटक, प्रेक्षकांनाही तिकिटाचे पैसे परत मिळणार!
10
WhatsApp कॉलवर बोलताय? तुमचं लोकेशन होऊ शकतं ट्रॅक; सुरक्षिततेसाठी ऑन करा 'ही' सेटिंग
11
"आम्ही थांबणार नाही..", दुसऱ्या बाळाच्या जन्माआधीच भारती सिंग करतेय तिसऱ्या बाळाचं प्लानिंग? पती हर्ष म्हणाला...
12
Stock Market Holidays: पुढच्या वर्षी १५ दिवस बंद राहणार शेअर बाजार, पाहा NSE मध्ये सुट्ट्या कधी, पाहा लिस्ट
13
कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी उपस्थित केलं भाजपाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह, म्हणाले, येथे सर्व निर्णय... 
14
जिथं वक्फचा वाद उफाळला, तिथे भाजपाला मिळाला 'ऐतिहासिक' विजय; केरळमध्ये हैराण करणारा निकाल
15
Gold-Silver Rate Today: सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; १८ कॅरेट सोनंही १ लाखांच्या पार, मुंबई ते दिल्ली नवे दर काय?
16
“शरद पवारांना भारतरत्न पुरस्कार द्यावा”; राष्ट्रवादी काँग्रेस पवार गटाच्या खासदाराचे समर्थन
17
“विधान परिषदेतील नियम, परंपरा आणि चर्चांमुळे लोकशाही बळकट”: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी
18
“विधान परिषदेतील गुणवत्तापूर्ण चर्चांचे दस्तऐवजीकरण म्हणजे लोकशाहीची खरी ताकद”: CM फडणवीस
19
Lionel Messi : Video - मेस्सी आला, ५ मिनिटांत गेला, फॅन्सचा पारा चढला; खुर्च्या फेकल्या, स्टेडियममध्ये तोडफोड
20
मेस्सीला पाहण्यासाठी इतकं महागडं तिकीट, राज्यपाल संतापले; राज्य सरकारकडून मागवला रिपोर्ट
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Election 2019: मतदान कमी झाल्याचा फटका कोणाला?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2019 06:14 IST

Maharashtra Election 2019: नालासोपाऱ्यात ४ टक्क्यांनी मतदान घटले

नालासोपारा : सेना आणि बविआमधील आरोप - प्रत्यारोपांच्या फैरीदरम्यान सोमवारी मतदान पार पडले. नालासोपाऱ्यातील १४ उमेदवारांच्या या लढतीमध्ये बविआचे क्षितिज ठाकूर आणि शिवसेनेचे प्रदीप शर्मा यांच्यातच मुख्य लढत आहे. दरम्यान, नालासोपाऱ्यात मतदानाचा टक्का यावेळी घसरल्याने या मतांचा फटका नक्की कोणाला बसणार हे निकालाच्या दिवशीच स्पष्ट होणार आहे.

२०१४ मध्ये येथे ५६ टक्के मतदान झाले होते तर यंदा येथे ५१.८२ टक्के मतदान झाले आहे. त्यामुळे यंदा येथील मतदान हे ४ टक्क्यांनी कमी झाले आहे. मतदारसंघात माकप, मनसे, काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांनी बहुजन विकास आघाडीला पाठिंबा दिल्याने येथे सर्वच पक्षकार्यकर्त्यांनी उमेदवार निवडून येण्यासाठी मेहनत घेतली. मात्र, भाजपमध्ये असलेल्या नाराजीचा फटका कोणाला बसणार, हे अद्याप स्पष्ट नाही.

स्ट्राँग रुमवर पोलिसांचा कडक पहारा

नालासोपारा विधानसभा निवडणूक झाल्यानंतर मतदान पेट्या पश्चिमेकडील श्रीप्रस्था परिसरातील वृंदावन गार्डनमध्ये मतपेट्या ठेवण्यात आल्या आहेत. सोमवारी मतदान झाल्यानंतर मतपेट्या रात्री ३ वाजेपर्यंत सील केल्याचे कळते. याठिकाणी कोणीही जाऊ नये अथवा काहीही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस प्रशासनाने जागता पहारा दिला आहे. याठिकाणी सीआयएसएफ चे तीन प्लाटून, नालासोपारा पोलिसांची टीम, गुजरात पोलिसांची टीम असा तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

उमेदवारांना आता प्रतीक्षा निकालाची

कौल कुणाला : उमेदवारांची धाकधूक वाढली; जिल्ह्यात सर्वाधिक मतदान विक्रमगडमध्ये

विक्रमगड/जव्हार : सोमवारी मतदान झाले आणि आता अवघ्या एका दिवसावर निकाल आला असल्याने उमेदवारांची धाकधूक वाढली आहे. मतदारांनी दिलेले मत इव्हीएम मशीनमध्ये बंद झाले असून या मतपेट्या आता दोन दिवस पोलिस संरक्षणात स्ट्राँगरूममध्ये ठेवण्यात आल्या असून तेथे कडक पोलीस बंदोबस्त आहे.

मतदारांनी नेमका कोणाच्या बाजूने कौल दिला आहे, याची धास्ती उमेदवारांना आहे. विक्रमगडमध्ये १० उमेदवार रिंगणात असले तरी खरी लढत भाजपचे डॉ. हेमंत सवरा आणि राष्ट्रवादीचे सुनील भुसारा यांचातच आहे. मतदान झाल्याने आता सध्या कुणाचे पारडे जड आणि कुणाला झुकते माप याची चर्चा नाक्या नाक्यावर रंगली आहे. तर पालघर जिल्ह्यातील सहा मतदारसंघात लोकसभेच्या तुलनेत कमी मतदान झाल्याचे आकडीवरुन दिसते.

च्तर सर्वाधिक ६९ टक्के मतदान हे विक्रमगडमध्ये झाले आहे. या मतदारसंघात २ लाख ६२ हजार मतदार आहेत.राष्ट्रवादीच्या सुनील भुसारा यांचे जव्हार मोखाड्यात चांगले वर्चस्व असून येथून त्यांना लीड मिळण्याची चर्चा आहे, तर वाडा आणि विक्र मगड भाजपचा बालेकिल्ला असल्याने त्यांना तेथे लीड मिळू शकतो. त्यामुळे ही लढत पहिल्यापासूनच चुरशीची व अटीतटीची मानली जाते.

च्दर निवडणुकीत मतमोजणीवेळी जव्हार मोखाड्यातून भुसारा हे आघाडी घेत असले तरीही मतमोजणीच्यावेळी विक्रमगड - कंचाड गटातून भाजपची सरशी होत असल्याचे चित्र दर निवडणुकीत पहायला मिळते आहे. दरम्यान, मागील पोटनिवडणूक आणि लोकसभा निवडणुकीला जव्हार तालुक्यातुन महाआघाडीला आघाडी घेण्यात यश आले होते.

५आमचाच उमेदवार निवडून येणार, सोशल मीडियावर वॉर

२१ ऑक्टोबरला मतदान झाल्यापासूनच सोशल मीडियावरील फेसबुक, इन्स्टाग्राम, वॉट्सअप, ट्विटर यांच्यावर पक्षाचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये आमच्याच पक्षाचा उमेदवार निवडून येईल अशा आशयाचे मेसेज सुरू आहेत.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Votingमतदान