शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात आजपासून आचारसंहिता? निवडणूक आयोग दुपारी ४ वाजता घोषणा करणार
2
जिओ-हॉटस्टार सबस्क्रीप्शनमध्ये मोठी वाढ करण्याची शक्यता; ₹१,४९९ प्लॅनची किंमत थेट...
3
India’s Squad For Rising Star T20 Asia Cup: वैभव सूर्यवंशीला संधी; 'या' तारखेला रंगणार भारत-पाक सामना!
4
'घराणेशाहीचे राजकारण लोकशाहीसाठी घातक', गांधी कुटुंबाचे नाव घेत शशी थरुरांचे मोठे वक्तव्य
5
चीनने पाकिस्तानसमोर मैत्रीचा हात पुढे केला! भारताविरुद्ध जाण्याचा नवा कट? काय आहे ड्रॅगनची खेळी?
6
जगातील 'या' 9 देशांकडे 12,241 अण्वस्त्रे; रशिया-अमेरिका आघाडीवर, भारताचा कितवा नंबर..?
7
दररोज पाठवायचा अश्लील मेसेज, प्रायव्हेट पार्ट व्हिडिओ; अभिनेत्रीने एकदा भेटायला बोलावले अन्...
8
आता सरकारी कार्यालयात खेटे घालण्याची गरज नाही; घरबसल्या मिळेल जीवन प्रमाणपत्र
9
Sandeep Deshpande : "खास अशिशुद्दीन यांच्यासाठी..."; भाजपा नेत्यांचा फोटो शेअर करत मनसेचं 'व्होट जिहाद'ला प्रत्युत्तर
10
MHADA Lottery: पुणेकरांसाठी सुवर्णसंधी! 'म्हाडा'च्या लॉटरीत वाकड-हिंजवडीत फक्त २८ लाखांत घर; ६० लाखांची थेट बचत!
11
त्रिपुरी पौर्णिमा २०२५: त्रिपुरी पौर्णिमेला 'या' राशींवर लक्ष्मीकृपा; व्यापारात लाभ; मालमत्ता खरेदीचे योग
12
रोहित आर्या प्रकरणावर अभिनेता आस्ताद काळेने व्यक्त केला संशय, पोस्ट करत म्हणाला...
13
आता त्यांचे मोजकेच दिवस उरलेत, या देशाच्या राष्ट्रपतींना ट्रम्प यांची उघड धमकी   
14
हवाई प्रवाशांसाठी मोठी बातमी; अतिरिक्त शुल्काशिवाय विमान तिकिटे रद्द करता येणार, कंपन्यांची मनमानी थांबणार!
15
Harmanpreet Kaur: "हरमनप्रीत कौरला कर्णधारपदाच्या ओझ्यातून मुक्त करा", माजी क्रिकेटपटूची मागणी चर्चेत!
16
कारच्या बंद दरवाजात गुदमरले जीव, ५ जणांचा मृत्यू; Tesla कारविरोधात खटला दाखल, काय आहे प्रकरण?
17
Ladki Bahin Yojana: मेसेजची रिंग वाजली? लाडकी बहीण योजनेचे आज पैसे येणार; eKYC न केलेल्या महिलांचे काय?
18
लाडकी बहीण योजना ज्यांनी राबविली, ते म्हणाले 'आम्ही कर्जात आहोत'; MSP वेळी हात वर केले, केंद्राला पत्र
19
"सांगा, ही मतचोरी आहे की व्होट जिहाद?"; भाजपाचा विरोधी पक्षांना खोचक सवाल, दिली आकडेवारी
20
शनी ग्रहाच्या चंद्राने केमिस्ट्रीला देखील फेल केले; तेल आणि पाणी...

भाड्याच्या लोकांवर काय निवडणूक लढवता? हितेंद्र ठाकूर यांचा शिवसेनेवर घणाघात

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2019 23:52 IST

दुसऱ्याच्या पक्षातून उमेदवार पळवून आणून त्यांना उमेदवारी देणा-या शिवसेनेला पक्षात एकही लायक उमेदवार मिळत नाही का?

पालघर : दुसऱ्याच्या पक्षातून उमेदवार पळवून आणून त्यांना उमेदवारी देणा-या शिवसेनेला पक्षात एकही लायक उमेदवार मिळत नाही का? भाड्याच्या लोकांवर निवडणुका काय लढवता, असा थेट सवाल बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष आ.हितेंद्र ठाकूर यांनी पालघरच्या पत्रकार परिषदेत केला.शिवसेनेचे विद्यमान आमदार अमित घोडा यांनी पक्ष सदस्यत्वाचा आणि आमदारकीचा राजीनामा देत राष्ट्रवादीत प्रवेश घेतल्यानंतर शुक्रवारी, शेवटच्या दिवशी त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी आ. हितेंद्र ठाकूर, आ. क्षीतिज ठाकूर, आ. आनंद ठाकूर, राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस अनिल गावड, जनता दलाचे पदाधिकारी उपस्थित होते.शिवसेनेच्या वाट्याला आलेल्या चार विधानसभा मतदारसंघांत भाजपमधून पळवून आणलेले श्रीनिवास वनगा, बोईसरमधून आमच्याच बविआमधून पळवून नेलेले विलास तरे, वसईमधून काँग्रेसमधून पळवलेले विजय पाटील तर नालासोपारामधून प्रदीप शर्मा निवडणुकीत उतरले आहेत. त्यामुळे शिवसेनेमध्ये निष्ठावान कार्यकर्ते उरलेच नाहीत का, असा प्रश्न उपस्थित करून कार्यकर्त्यांनी फक्त बाहेरच्या उमेदवारांना निवडून देण्याचेच काम करायचे का? त्यांच्यावर खूप अन्याय केला जातोय, असेही आ. ठाकूर यांनी म्हणाले. जर सेनेला लढायचे असेल तर स्वत:च्या हिंमतीवर लढा, उधारीच्या उमेदवाराच्या भरवशावर काय लढता, असे आव्हान त्यांनी दिले.प्रदीप शर्मा यांनी केलेल्या ११७ एन्काऊंटरदरम्यान त्यांना साधे खरचटलेही नाही. त्यांनी झोपलेल्या माणसांना हातात बेड्या घालून मारले असून या सर्व प्रकरणाची माहिती मी गोळा करायला घेतल्याचे आ. ठाकूर यांनी सांगितले. त्यांना आरोप करायचे असेल तर त्यांनी मतदार आणि पत्रकारांसमोर एका व्यासपीठावर येऊन आरोप करावेत असे खुले आव्हान आ.क्षीतिज यांनी दिले.पालघर विधानसभेची जागा काँग्रेसला असली तरी काँग्रेस-राष्ट्रवादी पक्षाच्या वरिष्ठ पातळीवरून झालेल्या चर्चेअंती हीच जागा आता राष्ट्रवादी पक्षाच्या वाट्याला आल्याने अमित घोडा हे राष्ट्रवादीचे उमेदवार असतील आणि काँग्रेसचा उमेदवार आपला अर्ज ७ तारखेला मागे घेईल, असे आ.ठाकूर यांनी सांगितले. जिल्ह्यातील बविआ पक्षाचे वर्चस्व सेना संपवायला निघाली आहे.का, असा प्रश्न पत्रकारांनी केला असता त्यांनी स्वत: संपू नये, असे उत्तर दिले. यामुळे जिल्ह्यातील विधानसभेच्या ४ जागा शिवसेनेला देऊन त्यांना पराभूत करून जिल्ह्यात वर्चस्व राखण्याचे काम बविआच्या मदतीने कोणी करीत तर नाही ना, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे.माझा बळी दिला - अमित घोडाशिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी श्रीनिवास वनगा यांना दिलेला शब्द पूर्ण करण्यासाठी माझा बळी दिल्याचे प्रतिपादन सेनेचे माजी आमदार आणि राष्ट्रवादी पक्षाकडून उमेदवारी लढवीत असलेले अमित घोडा यांनीपत्रकार परिषदेत केले.माझे वडील कृष्णा घोडा यांच्या मृत्यूनंतर झालेल्या पोटनिवडणुकीत मी जिंकून आलो. ३ वर्षाच्या कालावधीत लोकोपयोगी कामे करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. अशावेळी पालघर विधानसभेसाठी आपला शब्द पाळण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी श्रीनिवासला उमेदवारी दिल्याचे घोडा यावेळी म्हणाले.श्रीनिवास यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर मला उद्धव ठाकरेंनी मातोश्रीवर बोलावून घेतले. तू नाराज होऊ नकोस तुला चांगले पद देईन, असे सांगितले. परंतु, हे व्यासपीठावरून सर्वांसमोर सांगितले असते तर बरे झाले असते असेही त्यांनी सांगितले. कारण श्रीनिवासला विधानपरिषदेची जागा देण्यात येईल, असे आश्वासन उद्धव ठाकरे यांनी दिले असताना प्रत्यक्षात मात्र मला बाजूला सारून श्रीनिवासला पालघरची उमेदवारी दिल्याचा दावा त्यांनी केला.दरम्यान, पालघर येथे माजी आ. घोडा यांचा उमेदवारी अर्ज भरताना उपस्थित असलेले आ. ठाकूर नंतर हे बोईसर येथेही गेले. आम्ही व मित्र पक्ष मिळून सहाही विधानसभा जिंकणार असल्याचा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. बोईसर विधानसभा मतदारसंघातील बहुजन विकास आघाडीच्या उमेदवारांचा अर्ज भरण्यासाठी ते शुक्रवारी बोईसरला आले होते.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Vasai Virarवसई विरारnalasopara-acनालासोपारा