शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
2
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
3
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
4
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
5
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
6
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
7
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
8
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
9
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
10
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
11
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
12
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
13
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
14
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
15
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
16
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
17
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
18
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
20
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!

"कोणाचाही पराभव होऊ शकतो हे..."; ठाकूरांकडून सत्ता खेचणाऱ्या स्नेहा दुबेंनी सांगितला विजयाचा फॉर्म्युला

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2024 21:05 IST

भाजपच्या स्नेहा दुबे यांनी बहुजन विकास आघाडीचे हितेंद्र ठाकूर यांचा ३१५३ मतांनी पराभव केला आहे

Maharashtra Assembly Election Result 2024 : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत अनेक दिग्गज नेत्यांचा पराभव झाला आहे. वसई विरारमध्येही गेली ३५ वर्षे आमदार हितेंद्र ठाकूर यांची एक हाती सत्ता होती. वसईतून हितेंद्र ठाकूर आणि नालासोपारातून क्षितिष ठाकूर हे सहज निवडून येत होते. क्षितिज ठाकूर यांनी सलग तीन वेळा विजय मिळवला तर हितेंद्र ठाकूर यांनी सहा वेळा विधानसभा निवडणुकीत विजय मिळवला होता. पण यंदाचा निवडणुकीत बहुजन विकास आघाडीचे दोन्ही बालेकिल्ले भाजपाने काबीज केले आहेत. कधी न हरणाऱ्या हितेंद्र ठाकूर यांना यंदा एका नवख्या महिला उमेदवाराने पराभवाची धूळ चारली. स्नेहा दुबे असे या भाजपच्या आमदाराचे नाव आहे.

भाजपच्या स्नेहा दुबे यांनी बहुजन विकास आघाडीचे हितेंद्र ठाकूर यांचा ३१५३ मतांनी पराभव केला आहे. १९९० मध्ये वसईतून हितेंद्र ठाकूर यांनी पहिल्यांदा अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवली होती. यंदाच्या तिरंगी लढतीत स्नेहा पंडित-दुबे यांना हिंतेद्र ठाकूर यांचा पराभव केल्याने त्या जायंट किलर ठरल्या आहेत. स्नेहा पंडित दुबे यांना ७७,५५३ तर हितेंद्र ठाकूरांना ७४,४०० मते मिळाली. वसईच्या लोकांनी परिवर्तन करायचं ठरवल्याने मी निवडणूक जिंकली असल्याचे स्नेहा दुबे यांनी म्हटलं. एबीपी माझाशी बोलताना स्नेहा दुबे यांनी याबाबत भाष्य केलं.

“जनतेने ठरवलं की कोणाचाही पराभव होऊ शकतो हे वसईच्या विजयाचे उत्तम उदाहरण आहे. जनता ही जनार्दन असते. गेल्या ३५ वर्षांत वसईचा विकास खुंटला होता. त्यामुळे वसईच्या लोकांनी ठरवलं होतं की वसईत परिवर्तन करायचं. मतदार बोलून दाखवत नसले तरीही प्रचाराच्या माध्यमातून मी लोकांमध्ये फिरत होते तेव्हा मला जाणवत होतं की वसईच्या लोकांना बदल हवाय ही लढाई वसईच्या जनतेने सुरू केली होती आणि वसईची जनता ही लढाई जिंकली आहे”, असं स्नेहा दुबे यांनी म्हटलं.

"एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी मोलाची साथ दिली. भाजपचं पाठबळ कायमच राहिलं आहे. तसंच, आरएसएसनेही पाठिंबा दिला. आमच्यामागेही आरएसएस खंबीरपणे उभी होती. श्रमजीवी संघटनेचं खूप मोठं योगदान आहे," असंही स्नेहा दुबे म्हणाल्या.

"राजकारणात कधी येईन हा विचार केला नव्हता. २० वर्षे समाजकारणात सक्रिय आहे. संघटनेचंच काम करत राहिले. पण जेव्हा जबाबदारी येते, त्यावेळी मागे हटायचं नाही हे मी आई बाबांकडून शिकले आहे. लढाईची वेळ येते तेव्हा परिणामांचा विचार करायचा नसतो. पण वसईच्या जनतेने पाठिंबा देऊन अशक्य अशी लढाई जिंकली," असं स्नेहा दुबे म्हणाल्या. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024 resultमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024Vasai Virarवसई विरारHitendra Thakurहितेंद्र ठाकूरBJPभाजपा