शहरं
Join us  
Trending Stories
1
उत्तर प्रदेशमध्ये मतदार यादीतून तब्बल २.८९ कोटी लोकांची नावं वगळणार, SIRबाबत धक्कादायक माहिती समोर 
2
‘सर्व भारतीयांना अमेरिकेतून बाहेर काढा, अन्यथा…’, अमेरिकन पत्रकाराचं वादग्रस्त विधान   
3
पळवा पळवी! पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमानंतर लोकांनी कुंड्या, होर्डिंग आणि पुतळे पळवले   
4
स्वबळावर लढणाऱ्या काँग्रेसला ठाकरेंकडून मोठा धक्का, माजी नगरसेवक चंगेज मुलतानी उद्धवसेनेत
5
IND W vs SL W T20I : शफालीची वादळी खेळी! विजयी हॅटट्रिकसह टीम इंडियाचा मालिकेवर कब्जा; हरमनप्रीतनंही रचला इतिहास
6
"भाजपचे लोक हुशार, विरोधकांना सतत होमवर्क देतात", 'धुरंधर'चं नाव घेत कुमार विश्वास यांचा टोला
7
सीरियामध्ये मोठा हल्ला! नमाज पठणादरम्यान मशिदीत स्फोट, ८ जणांचा मृत्यू, १८ जण जखमी
8
IND W vs SL W : पहिल्या ओव्हरमध्ये धुलाई; मग रेणुकानं असा काढला राग! शेवटी 'चार चौघीं'वर पडली भारी
9
‘निष्ठावंतांना उमेदवारी न दिल्यास ते ज्या पक्षात जातील त्याचा प्रचार करणार’, भाजपाच्या ज्येष्ठ आमदाराचा इशारा
10
छत्रपती संभाजीनगरात एमआयएममध्ये 'राडा'; अधिकृत उमेदवारावर पक्ष कार्यकर्त्यांचाच हल्ला!
11
"भाजपाच्या पाठिंब्याशिवाय शिंदेसेना जिंकू शकत नाही"; मीरा-भाईंदरमध्ये महायुतीसाठी अटीशर्ती
12
लेडी DSP दीप्ती शर्मानं रचला इतिहास! असा पराक्रम करणारी ठरली पहिली भारतीय गोलंदाज
13
Ishan Kishan ने ठोकली सलग दोन शतकं, तरीही संघातून बाहेर; BCCIच्या आदेशानंतर घरी का परतला?
14
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
15
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
16
पित्याला मृत्युच्या दाढेतून ओढलं, थेट मगरीशी भिडला, चिमुकल्या अजयराजच्या शौर्याची कहाणी!
17
पुतण्यानेच रचला चुलत्याच्या हत्येचा कट; पराभवाचा बदला घेण्यासाठी मंगेश काळोखेंची हत्या, तटकरेंच्या निकटवर्तीयावरही गुन्हा दाखल
18
"कितीही अडथळे आले तरी परत आणणारच"; मोदी-माल्यांच्या लंडनमधील ‘त्या’ मस्करीला भारताचं चोख प्रत्युत्तर
19
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
20
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

मध्यस्थीनंतर लॉँग मार्च स्थगित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2018 01:19 IST

जिल्ह्यातील रिलायन्स गॅस पाईप टाकण्यासाठी शेतकऱ्याच्या घेतलेल्या जमिनीचा योग्य मोबदला १५ दिवसात शेतक-यांना दिला जाईल

- हितेन नाईकपालघर - जिल्ह्यातील रिलायन्स गॅस पाईप टाकण्यासाठी शेतकऱ्याच्या घेतलेल्या जमिनीचा योग्य मोबदला १५ दिवसात शेतक-यांना दिला जाईल असे खा. राजेंद्र गावितांच्या मध्यस्ती नंतर मुख्यमंत्र्यांनी दिल्याने अखेर पालघरमधून मुंबईकडे निघालेला लॉँग मार्च मंगळवारी मुंबईत पोहोचल्यानंतर स्थगित करण्यात आला आहे.पालघरच्या मुंबई-अहमदाबाद महामार्गा वरील ढेकाळे येथून रविवारी उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स गॅस पाईप लाईन विरोधात मुंबईच्या दिशेने निघलेला लॉँग मार्च मुंबईच्या वेशिवर जाऊन स्थगित करण्यात आला आहे.गुजरात मधील दहेज ते महाराष्ट्रातल्या रायगड जिल्ह्यातील नागोठणे पर्यंत रिलायंस ईथेन गॅस पाईप लाईनच काम २०१५ साली सुरु करण्यात आले. मात्र, या वेळी संपादित केलेल्या जमीनिंचा मोबादला देताना रिलायंस कडून तलासरी, डहाणू, पालघर, विक्र मगड, वाडा मधील आदिवासी शेतकºयांची फसवणूक झाल्याचा आरोप करत हजारो शेतकºयांनी हा लॉंग मार्च काढला होता.जिल्ह्यातील मनोर जवळील ढेकाळे येथुन १२ तारखेला निघलेला हजारो शेतकºयांचा मोर्चा १५ आॅगस्ट रोजी मुकेश अंबानी यांच्या निवास्थानी पोचून त्यांच्या बंगल्या समोर सर्व मोर्चेकºयांच्यावतीने ठीय्या आंदोलन करण्यात येणार होते. मात्र, मुंबईतील सीमेवर दहिसर येथे लॉँग मार्च पोहचताच पालघर चे खासदार राजेंद्र गावित यांच्या मध्यस्तीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आंदोलन कर्त्यांना चर्चेच निमंत्रण दिले. मोर्चेकरी आणि प्रशासन यांच्यात सकारात्मक चर्चा झाल्यानंतर हा मार्च पुढे स्थगित करण्यात आला.या चर्चे दरम्यान खासदार राजेंद्र गावित यांच्यासह गेलेल्या शेतकºयांच्या शिष्टमंडळाने जिल्ह्यात शेतकºयांच्या झालेल्या फसवणुकी बाबत मुख्यमंत्र्याना माहिती दिल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आश्चर्य व संताप व्यक्त करत या संदर्भात येत्या १५ दिवसात महसूल आयुक्त, पालघर जिल्हाधिकारी, खासदार राजेंद्र गावित यांच्या सह काही शेतकºयांची कमिटी तयार करणार असून आदिवासी शेतकºयांवर झालेला अन्याय दूर करून त्यांना न्याय देऊ तसेच योग्य मोबादला दिला जात नाही तोपर्यंत रिलायंस ला जिल्ह्यात कोणतही काम न करू देण्याचे निर्देश दिले आहेत.मुख्यमंत्री आश्चर्यचकितरिलायंस कडून शेतकºयांच्या सातबारा उतारा आणि फेरफार चढ़वण्यात आलेला बोजा त्वरित रद्द करा असे निर्देश ही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.शेतकºयांनी कंपनीची मनमानी सांगितल्यावर फडणविस यांनी आश्चर्य व्यक्त करुन अधिकाºयांना खडसावले.

टॅग्स :Vasai Virarवसई विरारnewsबातम्या