शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
3
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
4
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
5
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
6
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
7
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
8
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
9
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
10
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
11
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
12
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
13
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
14
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
15
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
16
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
17
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
18
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
19
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
20
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
Daily Top 2Weekly Top 5

मध्यस्थीनंतर लॉँग मार्च स्थगित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2018 01:19 IST

जिल्ह्यातील रिलायन्स गॅस पाईप टाकण्यासाठी शेतकऱ्याच्या घेतलेल्या जमिनीचा योग्य मोबदला १५ दिवसात शेतक-यांना दिला जाईल

- हितेन नाईकपालघर - जिल्ह्यातील रिलायन्स गॅस पाईप टाकण्यासाठी शेतकऱ्याच्या घेतलेल्या जमिनीचा योग्य मोबदला १५ दिवसात शेतक-यांना दिला जाईल असे खा. राजेंद्र गावितांच्या मध्यस्ती नंतर मुख्यमंत्र्यांनी दिल्याने अखेर पालघरमधून मुंबईकडे निघालेला लॉँग मार्च मंगळवारी मुंबईत पोहोचल्यानंतर स्थगित करण्यात आला आहे.पालघरच्या मुंबई-अहमदाबाद महामार्गा वरील ढेकाळे येथून रविवारी उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स गॅस पाईप लाईन विरोधात मुंबईच्या दिशेने निघलेला लॉँग मार्च मुंबईच्या वेशिवर जाऊन स्थगित करण्यात आला आहे.गुजरात मधील दहेज ते महाराष्ट्रातल्या रायगड जिल्ह्यातील नागोठणे पर्यंत रिलायंस ईथेन गॅस पाईप लाईनच काम २०१५ साली सुरु करण्यात आले. मात्र, या वेळी संपादित केलेल्या जमीनिंचा मोबादला देताना रिलायंस कडून तलासरी, डहाणू, पालघर, विक्र मगड, वाडा मधील आदिवासी शेतकºयांची फसवणूक झाल्याचा आरोप करत हजारो शेतकºयांनी हा लॉंग मार्च काढला होता.जिल्ह्यातील मनोर जवळील ढेकाळे येथुन १२ तारखेला निघलेला हजारो शेतकºयांचा मोर्चा १५ आॅगस्ट रोजी मुकेश अंबानी यांच्या निवास्थानी पोचून त्यांच्या बंगल्या समोर सर्व मोर्चेकºयांच्यावतीने ठीय्या आंदोलन करण्यात येणार होते. मात्र, मुंबईतील सीमेवर दहिसर येथे लॉँग मार्च पोहचताच पालघर चे खासदार राजेंद्र गावित यांच्या मध्यस्तीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आंदोलन कर्त्यांना चर्चेच निमंत्रण दिले. मोर्चेकरी आणि प्रशासन यांच्यात सकारात्मक चर्चा झाल्यानंतर हा मार्च पुढे स्थगित करण्यात आला.या चर्चे दरम्यान खासदार राजेंद्र गावित यांच्यासह गेलेल्या शेतकºयांच्या शिष्टमंडळाने जिल्ह्यात शेतकºयांच्या झालेल्या फसवणुकी बाबत मुख्यमंत्र्याना माहिती दिल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आश्चर्य व संताप व्यक्त करत या संदर्भात येत्या १५ दिवसात महसूल आयुक्त, पालघर जिल्हाधिकारी, खासदार राजेंद्र गावित यांच्या सह काही शेतकºयांची कमिटी तयार करणार असून आदिवासी शेतकºयांवर झालेला अन्याय दूर करून त्यांना न्याय देऊ तसेच योग्य मोबादला दिला जात नाही तोपर्यंत रिलायंस ला जिल्ह्यात कोणतही काम न करू देण्याचे निर्देश दिले आहेत.मुख्यमंत्री आश्चर्यचकितरिलायंस कडून शेतकºयांच्या सातबारा उतारा आणि फेरफार चढ़वण्यात आलेला बोजा त्वरित रद्द करा असे निर्देश ही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.शेतकºयांनी कंपनीची मनमानी सांगितल्यावर फडणविस यांनी आश्चर्य व्यक्त करुन अधिकाºयांना खडसावले.

टॅग्स :Vasai Virarवसई विरारnewsबातम्या