शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

लॉकडाऊनचा महावितरणला 21 काेटींचा बसला फटका;

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2020 12:13 AM

वीजबिल नाही भरल्यावर मीटर कापून जाईल, या भीतीने अनेक वीज ग्राहकांनी वाढीव आलेले वीजबिल भरले आहे.  

- मंगेश कराळेनालासोपारा : कोरोना महामारीमुळे गेल्या मार्चपासून सर्वत्र सरकारने लॉकडाऊन जाहीर केले होते. या लॉकडाऊनचा मोठा फटका महावितरणला बसला असून वसई तालुक्यात कोट्यवधी रुपयांची वीजबिले थकली आहेत. एप्रिल ते ऑक्टोबरपर्यंत २१ कोटी रुपयांची थकलेली वीजबिले वसूल करण्याचे मोठे आव्हान वसईच्या महावितरणसमोर उभे ठाकले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कोरोनाची महामारी आणि लॉकडाऊनमुळे वसई विभागाच्या महावितरण कार्यालयाला ४४० व्होल्टेजचा झटका बसला आहे. लॉकडाऊनमुळे सामान्य नागरिक घरात कैद असल्याने ते विजेचा मोठ्या प्रमाणात वापर करीत आहेत. कोरोनाच्या संक्रमणामुळे वीज विभागाच्या कर्मचाऱ्यांना वसई विभागात मीटर रीडिंग घेता न आल्याने वीज ग्राहकांना वाढीव बिल पाठविण्यात आले होते. वाढीव बिलामुळे त्रस्त ग्राहकांनी आणि इतर राजकीय पार्ट्यांनी वीज विभागाविरोधात आंदोलनही केले होते. खासदार आणि आमदारांनी वीज ग्राहकांना वीजबिले कमी होतील, अशी आश्वासने दिली होती. तरीसुद्धा वीजबिल नाही भरल्यावर मीटर कापून जाईल, या भीतीने अनेक वीज ग्राहकांनी वाढीव आलेले वीजबिल भरले आहे.  

आजही महावितरणची १२१ कोटींची वीजबिले ग्राहकांनी भरलेली नाहीत. याच बिलाच्या पैशांतून महावितरणकडून नवीन ट्रान्सफाॅर्मर, नवीन खांब, केबल, डीपी बॉक्स इत्यादी वस्तू खरेदी केल्या जातात. या वेळी इतक्या मोठ्या प्रमाणात वीजबिल थकल्याने या विभागातील वीजसंबंधी डागडुजी करण्यासाठी त्रास होत आहे. विशेष म्हणजे वसई विभागात २० लाख लोकसंख्या असून ९ लाख ६ हजार ८९१ वीजग्राहक आहेत. ही वसुली करण्याचे माेठे आव्हान महावितरणसमाेर आहे.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार