शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

रब्बी लागवड लांबण्याची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2020 12:57 AM

ढगाळ हवामान : उत्पादनात घट ?

लोकमत न्यूज नेटवर्कबोर्डी : तालुक्यात आठवड्यापासून ढगाळ वातावरण असल्याने परतीच्या पावसाने ओली झालेली जमीन सुकण्यात अडथळा येत आहे. दरम्यान, वापशाअभावी जमिनीच्या उखळणीची कामे मंदावल्याने पालघर जिल्ह्यातील रब्बी लागवड लांबण्याची शक्यता आहे. त्याचा उत्पादनावर परिणाम होण्याची भीती व्यक्त होत आहे. त्यामुळे रब्बी लागवडीपूर्व प्रशिक्षणाची गरज निर्माण झाली आहे.

मोठ्या प्रमाणात परतीचा पाऊस पडल्याने नोव्हेंबर महिन्याचा पहिला पंधरवडा उलटूनही शेतजमिनीला वापसा आलेला नाही. त्यामुळे रब्बी हंगामाकरिता जमिनीची उखळणी करण्यात अडचण येत असून लागवड लांबण्याची शक्यता वर्तविली जात आहे. पालघर जिल्ह्यात किनारपट्टी भागात हिरवी आणि ढोबळी मिरचीची आधुनिक पद्धतीने शेती केली जाते. 

ही पिके प्रतिकूल हवामान बदलांना अधिक लवकर बळी पडते. जमिनीत ओलावा असल्यास मुळकुजव्या आणि अन्य बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव वाढून रोपे रोगग्रस्त होऊन सरासरी उत्पादन घटते. शिवाय उन्हाळी कांदा बी पेरणी उशिरा होऊ शकते. त्यामुळे शेत पीक बाजारात उशिरा आल्यास दर कमी मिळतो.

मागील वर्षी परतीच्या पावसाने हंगाम लांबल्याने वांग्याच्या रोपांची वाढ झाली, मात्र त्याची फळधारणा खूपच कमी प्रमाणात झाली. वालाच्या शेंगांमध्ये दाणा चांगला भरलाही नव्हता. ही स्थिती कमी-अधिक फरकाने सर्वच पिकांबाबत सारखीच झाली होती. त्यामुळे कृषी विभागाने जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना रब्बी लागवड पूर्व प्रशिक्षण देण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.

या हंगामातील पिकेपालघर जिल्ह्यात या हंगामात वाल, हरभरा ही कडधान्ये तसेच वांगी, मिरची, टोमॅटो या नगदी पिकासह वेलवर्गीय व मुळा, पालक, पातीचा कांदा इ. भाजीपाल्याची लागवड केली जाते. किनारपट्टी भागात हिरवी आणि ढोबळी मिरचीची आधुनिक पद्धतीने शेती केली जाते. हे पीक प्रतिकूल हवामान बदलांना अधिक लवकर बळी पडते.