गणेशोत्सवात दोन दिवस वीज गायब

By Admin | Updated: September 23, 2015 03:54 IST2015-09-23T03:54:42+5:302015-09-23T03:54:42+5:30

विक्रमगड महावितरणचा गलथान कारभार नेहमीचाच आहे. मात्र, सणासुदीच्या काळात तरी व्यवस्थित सेवा मिळावी अशी इच्छा असताना तालुक्यातील कुंर्झे गावठण

Lightning disappears for two days in Ganesh Festival | गणेशोत्सवात दोन दिवस वीज गायब

गणेशोत्सवात दोन दिवस वीज गायब

विक्रमगड : विक्रमगड महावितरणचा गलथान कारभार नेहमीचाच आहे. मात्र, सणासुदीच्या काळात तरी व्यवस्थित सेवा मिळावी अशी इच्छा असताना तालुक्यातील कुंर्झे गावठण आणि परिसरातील दहाहुन अधिक गावांमध्ये शुक्रवारी रात्रीपासून विद्युत पुरवठा बंद झाला. त्यामुळे गणेशभक्तांसह नागरीकांमध्ये महावितरणविरोधात संतापाची लाट उसळली आहे.
शुक्रवारी रात्री खंडीत झालेला वीजपुरवठा शनिवारी रात्री सुरू झाला. मात्र, जेमतेम तीन तास टिकून पुन्हा वीज खंडीत झाली ती सोमवारी सकाळी दहा वाजता सुरळीत झाली. मात्र अधुन मधून विजपुरवठा खंडीत होण्याचे प्रकार सुरूच असल्याने याबाबत गणेशभक्तांनी विजवितरण कंपनीच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांच्या कॉलला उत्तर देण्याचे अधिकाऱ्यांनी टाळले. याबाबत विक्रमगड महावितरणचे मुख्य कार्यकारी अभियंता नानोठ यांच्याशी संपर्क केला असता आमचे काम सुरू आहे, लाईट दोन किंवा तीन तासात येईल अशी उडवाउडवीची उत्तरे दिली. दरवर्षी पावसाळ्याआधी ही कामे करणे गरजेचे असते.
मात्र विक्रमगड तालुक्यात महावितरण ही कामे व्यवस्थित करीत नसल्याने नागरीकांना याचा त्रास होतो. महावितरणचा गलथान कारभार हा नेहमीचाच असल्याचे सर्व कामांची चौकशी होणे गरजेचे असल्याचे सामाजिक कार्यकर्ते प्रमोद ठाकरे यांनी सांगितले. (वार्ताहर)

Web Title: Lightning disappears for two days in Ganesh Festival

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.