शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
2
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
3
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
4
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
5
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
6
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
7
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
8
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
9
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
10
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
11
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
12
पाकिस्तानसोबतच्या युद्धविरामावर असदुद्दीन ओवेसींनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, सरकारला विचारले चार सवाल  
13
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
14
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
15
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
16
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
17
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
18
Operation Sindoor Live Updates: नागरोटा येथे लष्कराच्या तळावर गोळीबार, १ जवान जखमी
19
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
20
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video

‘ती’ जमीन बांधकाम खात्याकडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2018 23:34 IST

एनपीसीआयएलने कोर्टात दावा सुरू असल्याचे सांगून मज्जाव केल्यानंतर सार्वजनिक बांधकाम खात्याने केलेल्या विनंती नुसार ही जमीन जिल्हा शल्यचिकित्सक (पालघर) यांनी सा. बा. खात्याकडे सुपूर्द केल्याने आता सा. बा. खाते काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

बोईसर : येथील प्रस्तावित ग्रामीण रुग्णालयाच्या जागेवर संरक्षक भिंत बांधण्यास एनपीसीआयएलने कोर्टात दावा सुरू असल्याचे सांगून मज्जाव केल्यानंतर सार्वजनिक बांधकाम खात्याने केलेल्या विनंती नुसार ही जमीन जिल्हा शल्यचिकित्सक (पालघर) यांनी सा. बा. खात्याकडे सुपूर्द केल्याने आता सा. बा. खाते काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.संरक्षक भिंत बांधणारे ठेकेदार मे. शिवसाई कन्स्ट्रक्शन यांनी या जागेवर काम करण्याच्या दृष्टीने तयारी सुरू केली असता एनपीसीआयएलने कामास मज्जाव केला. नंतर सा. बां. उपविभाग पालघर विभागाच्या उप विभागीय अभियंत्यांनी पालघरच्या जिल्हा शल्यचिकित्सकांना पत्र पाठवून आपल्या स्तरावरून बांधकामासाठी योग्य ती कार्यवाही करून ही जागा या कार्यालयाच्या ताब्यात देवून त्याचे सीमांकन प्रत्यक्ष जागेवर आपल्या विभागामार्फत करून द्यावी अशी विनंती केली होती. त्या विनंती पत्रानंतर जिल्हा शल्यचिकित्सकांनी १ डिसेंबर १८ रोजी सा. बां. ला पाठविलेल्या पत्रात जिल्हाधिकारी तथा सदस्य सचिव, जिल्हा नियोजन समिती पालघर यांचे प्रशासकीय आदेशा नुसार ग्रामीण रुग्णालय बोईसर येथील सर्व्हे क्रमांक १०८ ए/३० पैकी २.५० एकर जागेवर संरक्षण भिंतीचे बांधकाम करण्यास परवानगी देण्यात आली असून त्यानुसार आपणास निधी वितरीत करण्यात आलेला आहे तरी सदर जागेवर बांधकाम करण्यासाठी या कार्यालयाकडून उपरोक्त जागा सुपूर्द करण्यात येत असून काम लवकरात लवकर पूर्ण करावे अशी विनंती वजा सूचना केली आहे. या पार्श्वभूमीवर आजची ही घडामोड महत्वपूर्ण ठरली आहे. आतातरी या कामाला गती मिळावी, अशी येथील जनतेची इच्छा आहे.>आता कामाला गती२००३ साली बोईसर ग्रामीण रुग्णालय मंजूरझाल्या नंतर मागील १५ वर्ष हा प्रश्न विविध खात्याच्या लाल फितित अडकून पडण्या बरोबरच न्यायालयातही गेल्याने प्रलंबित आहे त्यामुळे हजारो गोर गरीब मोफत व सुसज्ज सेवे पासून इतकी वर्षे वंचित आहेत.आता चेंडू सार्वजनिक बांधकाम खात्याकडे असून ते बांधकाम सुरु करतात की नाही या बरोबरच काम पुन्हा सुरु केल्या नंतर एनपीसीआयएलची भूमिका काय असणार याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.