शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

जनतेच्या समस्या जाणून घ्या, वंचित आघाडीच्या कार्यकर्त्यांचा मेळावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2019 23:49 IST

महासचिव अरूण सावंत : वंचित आघाडीच्या कार्यकर्त्यांचा मेळावा

डहाणू : राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडी आणि भारिप बहुजन महासंघाच्या पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांचा मेळावा रविवारी डहाणू पंचायत समिती सभागृहात आयोजित करण्यात आला होता. तळागाळातील लोकांच्या समस्या जाणून घेऊन त्या दूर करण्यासाठी न्यायाचा लढा उभारला पाहिजे, असे आवाहन वंचितचे महासचिव अरुण सावंत यांनी यावेळी केले. जिल्हाध्यक्ष गणेश प्रधान, वंचितचे लोकसभा उमेदवार सुरेश पाडवी, आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

सावंत यांनी वंचित भारिपची भूमिका स्पष्ट करताना सांगितले की, सर्व समाज घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी एकत्र आले पाहिजे. बहुजन समाजाच्या वेगवेगळ्या समस्या आहेत. त्यांचा विचार करून सर्वांना संवैधानिक न्याय मिळवून दिला पाहिजे. कार्यकर्त्यांनी साखळी पध्दतीने पक्ष वाढीसाठी काम करण्याची तयारी केली पाहिजे, असे सांगत त्यांनी शासनाच्या सदोष धोरणांवर टीका केली. जिल्हा अध्यक्ष गणेश प्रधान यांनी पक्ष वाढविण्यासाठी, शेवटच्या घटकापर्यंत पोहचण्यासाठी कार्यकर्त्यांनी मेहनत करण्याबाबत मार्गदर्शन केले.अ‍ॅड.विराज गडग यांनी आदिवासी चळवळ, राज्यघटनेतील ५ वी व ६ वी अनुसूची यावर विचार मांडले. संविधानाची शपथ घेणारे लोकप्रतिनिधीच अनेकदा संविधानातील तत्त्वांची पायमल्ली करत आहेत, असे लोकप्रतिनिधी हे देशद्रोही असल्याची सडकून टीका करताना पालघर विधानसभा निवडणूक लढण्याचा मनोदय व्यक्त केला. चिंतामण मोहंडकर यांनी १९४८ चा कुळवहिवाट जमीन कायदा, १९७२ चा आदिवासी वन अधिकार कायदा, तसेच २०१० चा जल वितरण विधेयक या तीन कायद्याच्या तरतुदी सांगताना शासनाने आदिवासी समाजाला जमीन, जंगल व जल यापासून कसे दूर करण्याचा प्रयत्न केला जातो याबद्दल विचार मांडले. या कार्यक्रमात डहाणूतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक कार्यकर्त्यांनी वंचितमध्ये प्रवेश घेतला. वसई, विरार, नालासोपारा, भिवंडी, ठाणे, वाडा, तलासरी, विक्र मगड, पालघर, डहाणू, जव्हार, मोखाडा, बोईसर या भागातील भारिप वंचितचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

टॅग्स :Vanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडीVasai Virarवसई विरार