शहरं
Join us  
Trending Stories
1
पटनायक सरकारची 'एक्सपायरी डेट' 4 जून; पहिल्याच रॅलीत संकटमोचकावरच PM मोदींचा हल्लाबोल
2
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
3
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
4
Amit Shah : "दीदींनी 5 वर्षे प्रचार केला तरी..."; अमित शाह यांनी ममता बॅनर्जींना दिलं जाहीर आव्हान
5
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
6
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
7
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
8
मतदानाच्या आदल्या दिवशी बारामती मतदारसंघाबाबत सुप्रिया सुळेंची निवडणूक आयोगाकडे मोठी मागणी
9
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
10
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
11
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
12
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
13
"असं असेल तर MS Dhoni ने खेळूच नये..."; Harbhajan Singh भडकला, CSK vs PBKS सामन्यानंतर व्यक्त केला संताप
14
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
15
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार
16
पाकिस्तानची फजिती! मोहम्मद आमिर आयर्लंड दौऱ्यावर वेळेत जाणार नाही, कारण...
17
"भाजपा आता लाठ्याकाठ्यांनी तोडफोड करायला उतरलीय, अत्यंत निंदनीय आणि लज्जास्पद"
18
LSG ने काल १३ खेळाडू खेळवले! KKR लाही कसे नाही समजले? वाचा नेमके असे काय घडले  
19
माता न तू वैरिणी; नवऱ्यासोबत भांडणाचा राग, चिमुकल्याला मगरींनी भरलेल्या नदीत फेकले...
20
Eknath Shinde : धर्मवीर चित्रपटात राजन विचारेंबाबत दाखवलेलं सर्व खोटं, विचारे नकली शिष्य; एकनाथ शिंदेंनी सगळंच सांगितलं

अपहरण झालेल्या तरूणाची सुखरूप सुटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2019 11:04 PM

या तरुणाची सुखरूप सुटका करून बुधवारी रात्री त्याला वसईला आणण्यात आले असून फरार दोन्ही आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे.

मंगेश कराळेनालासोपारा : वालीव येथे राहणारा समसुल कमर शकील खान (३०) हा तरुण १४ जुलैला कामानिमित्त कोलकत्यात गेला होता. मात्र, हावडा रेल्वे स्थानकावरून त्याचे २० लाख रूपयांसाठी अपहरण झाल्याची खळबळजनक घटना घडली होती. तरुणाच्या वडिलांना फोनवरून आलेल्या धमकीनंतर वालीव पोलीस ठाण्यात जाऊन १६ जुलैला गुन्हा दाखल झाला होता. या अपहृत तरुणाचा शोध घेऊन या प्रकरणाचा तपास करण्यासाठी गुन्हे शाखेची एक टीम रवाना झाली होती. या तरुणाची सुखरूप सुटका करून बुधवारी रात्री त्याला वसईला आणण्यात आले असून फरार दोन्ही आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे.

पैशांसाठी अपहरण केलेल्या गुन्ह्याची गंभीर दखल घेऊन वालीव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली एक पथक आणि मुलाचे वडील अशी टीम गुन्ह्याचा तपास करण्यासाठी गेल्या गुरुवारी कोलकत्याला रवाना झाली.मुलाच्या वडिलांना अपहरणकर्त्यांनी २५ ते ३० फोन करून वेगवेगळ्या ठिकाणी पैसे घेऊन येण्यास सांगितले. मात्र, ते समोर येत नव्हते. दरम्यान, वालीव पोलिसांनी कालीचा चक पोलीस ठाण्यातील पोलिसांशी संपर्क साधून अपहरण झालेल्या तरुणाची माहिती दिली.वालीव पोलिसांनी आरोपीचे नाव उघड केल्यावर कालीचा चक पोलीस ठाण्यातील २ ते ३ पोलीस निरीक्षक, २५ ते ३० आर्मी, कमांडो आणि पोलिसांचा फौजफाट्यासह ४ गाड्या घेऊन रात्रीच्या सुमारास आरोपीच्या घरावर छापा घालण्यात आला.

कसा सापडला तरुण : घरातील मंडळींना पोलीस ठाण्यात आणून विचारपूस करण्यास सुरुवात केली. पश्चिम बंगाल आणि झारखंड राज्याच्या बॉर्डरजवळील गंगा नदीच्या बाजूलाच असलेल्या जंगलात आरोपी जात असल्याची माहिती त्यांच्या कुटुंबीयांकडून मिळवली. घरच्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती आरोपीला मिळाल्यावर अपहरण केलेल्या तरुणाची अखेर पाच दिवसांनी पोलिसांनी सुटका केली. आपल्या मुलाची सुखरूप सुटका झालेली पाहून वडिलांनी पोलिसांचे आभार मानले.

टॅग्स :Kidnappingअपहरण