शहरं
Join us  
Trending Stories
1
Jairam Ramesh : "राहुल गांधी हे राजकारणातील अनुभवी खेळाडू, बुद्धिबळाच्या काही चाली बाकी आहेत"
2
Narendra Modi : "आज मीही सांगतो... घाबरू नका, पळू नका"; पंतप्रधान मोदींची राहुल गांधींवर खोचक टीका
3
उद्धव ठाकरेंनी शब्द दिला अन् ऐनवेळी फिरवला; विजय करंजकरांनी भरला अपक्ष अर्ज
4
Lalu Prasad Yadav : "पाकिस्तान, स्मशानभूमी, हिंदू-मुस्लिम..."; लालू प्रसाद यादव यांचा नरेंद्र मोदींना खोचक टोला
5
पराभव, भीती की रणनीती...! राहुल गांधींनी अमेठीऐवजी रायबरेली मतदारसंघ का निवडला?
6
अ‍ॅडव्हान्स फीचर्ससह पल्सरचे नवीन मॉडेल लाँच, टॉप स्पीड पाहून बसेल धक्का!
7
Share Market Upcoming IPO : पैसे तयार ठेवा! या महिन्यात कमाईची संधी; कंपन्या IPO मधून १० हजार कोटी उभारणार
8
'माफी मागा, तुमच्या घाणेरड्या आरोपांनी...'; चित्रा वाघ यांना 'त्या' अभिनेत्याचा कारवाईचा इशारा
9
सुशांत सिंह राजपूतच्या जीवाला होता धोका? बहिणीने केला मोठा खुलासा
10
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
11
जागावाटपाच्या वाटाघाटीत शिंदे जिंकले, जे हवे होते ते मतदारसंघ घेतले; भाजपाने नेमके काय साधले?
12
Kangana Ranaut : "राजपुत्र पत्नीसोबत चांगलं वागत नाही, छळ करतात"; कंगनाचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर पलटवार
13
"शिंदे सरकारच त्यांचा माज उतरवेल", मराठी सिनेमांना प्राइम शो न देणाऱ्या मल्टिप्लेक्सबाबत प्रसाद ओकचं मोठं वक्तव्य
14
Adani Ports Share Price : ₹१७०० पार जाऊ शकतो Adani समूहाचा 'हा' शेअर; वर्षभरात पैसे केलेत दुप्पट, जाणून घ्या
15
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : ठाकरे गटाच्या अडचणीत वाढ, विजय करंजकर अपक्ष उमेदवारी अर्ज भरणार
16
सुषमा अंधारेंना नेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर क्रॅश, पायलट सुखरूप
17
Akshaya Tritiya 2024: पूर्वीचे लोक अक्षय्य तृतीयेनंतरच आंबा खायचे? असे का? वाचा त्यामागचे कारण!
18
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेला करा 'हे' पाच खास उपाय, वास्तूला कधीही होणार नाही अपाय!
19
मोबाईल फेकला, एकानंतर एक रिक्षा बदलल्या अन्...; 'तारक मेहता' फेम सोढीने स्वतःच बनवला अपहरणाचा प्लॅन?
20
Adani Enterprises ला SEBI नं पाठवली कारणे दाखवा नोटीस, हिंडेनबर्गच्या तपासाशी निगडीत प्रकरण 

युवापिढीतही खादीची क्रेझ; ‘डेनिम खादी’चीही पडली भुरळ

By ऑनलाइन लोकमत | Published: October 02, 2019 12:31 AM

गेल्या पन्नास वर्षांत खादीचा चेहरामोहरा बदलला आहे. खादीचा ग्राहक बदलला आहे. युवापिढी खादीकडे आकर्षित होत आहे. महाविद्यालयीन तरुणाई खादी परिधान करत आहे.

 - सचिन लुंगसेमुंबई : गेल्या पन्नास वर्षांत खादीचा चेहरामोहरा बदलला आहे. खादीचा ग्राहक बदलला आहे. युवापिढी खादीकडे आकर्षित होत आहे. महाविद्यालयीन तरुणाई खादी परिधान करत आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, खादीमध्येही वेळ आणि काळानुसार बदल होत आहेत. खादी परिधान करणे ही आजची फॅशन झाली आहे. युवापिढीमध्ये खादीची क्रेझ आहे. ‘डेनिम खादी’ने तरुणाईला भुरळ घातली असून, २ आॅक्टोबर रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची १५०वी जयंती साजरी करण्यात येत असतानाच, ज्या खादीचा बापूंनी आयुष्यभर प्रचार आणि प्रसार केला, त्याच खादीचा या निमित्ताने घेतलेला हा खास आढावा ‘लोकमत’च्या वाचकांसाठी.बोरीवलीच्या कोरा केंद्रात खादीपासून तयार होत असलेल्या विविध वस्त्रांना देशासह विदेशातून प्रचंड मागणी असून, फोर्ट येथील खादी ग्रामोद्योग भवनासह खादी ग्रामोद्योग भंडारद्वारे ही वस्त्रे मागणीनुसार पुरविली जात आहे. महत्त्वाचे म्हणजे, खादीच्या कापडापासून तयार करण्यात आलेली वस्त्रे वापरण्याचे प्रमाण गेल्या ३ वर्षांत २० टक्क्यांनी वाढले असून, खादीच्या कापडापासून तयार करण्यात आलेली वस्त्रे वापरण्यात युवापिढी अग्रस्थानी आहे. युवापिढीमध्ये महाविद्यालयीन तरुणाईसह कार्यालयीन तरुणाईचा समावेश आहे, शिवाय खादीपासून तयार केलेली वस्त्रे वापरण्यात महिला वर्गही पुढे आहे.केंद्र सरकारच्या खादी अँड व्हिलेज इंडस्ट्री कमिशनच्या नियंत्रणाखाली मुंबई खादी अँड व्हिलेज इंडस्ट्री असोसिएशन कार्यरत आहे. असोसिएशन अंतर्गत खादी ग्रामोद्योग भवन, कोरा केंद्र आणि खादी ग्रामोद्योग भंडार कार्यरत आहे. फोर्ट येथे खादी ग्रामोद्योग भवनचे कार्यालय असून, ठिकठिकाणी खादी ग्रामोद्योग भंडार आहेत, तर बोरीवली येथे कोरा केंद्र आहे. भवन आणि भंडारमध्ये खादीची विक्री केली जाते. केंद्र सरकारच्या खादी अँड व्हिलेज इंडस्ट्री कमिशनच्या परवानाधारक संस्थांना शेतकरी वर्गाकडून कापूस पुरविला जातो. या परवानाधारक संस्थेचे सदर शेतकरी सदस्य असतात.या संस्थांकडून कापड उद्योगांना कापड तयार करण्यासाठी कापूस पुरविला जातो. कापड उद्योगांकडून त्यानंतर कापसापासून दोरे आणि मग खादीचे कापड तयार होते. बोरीवली येथील कोरा केंद्रात हे कापड दाखल होते. कोरा केंद्रात दाखल झालेल्या खादीच्या कापडावर प्रथमत: प्रक्रिया केली जाते. ब्लिचिंग, डायिंग, प्रिटिंग आणि टिचिंग या टप्प्यांद्वारे खादीच्या कापडावर प्रक्रिया केली जाते. त्यानंतर, खादीच्या कापडाद्वारे तयार करण्यात आलेले सदरे, शर्ट, साड्या आणि पिशव्यांसारखे साहित्य खादी ग्रामोद्योग भवन आणि विविध भंडारात विक्रीसाठी उपलब्ध करून दिले जाते.

महात्मा गांधी यांनी केले उदघाटन१९४६ साली महात्मा गांधी यांनी काळबादेवी येथील खादी ग्रामोद्योग भवनाच्या खादी ग्रामोद्योग भंडाराचे उद्घाटन केले होते. मुंबईमधील हे सर्वात पहिले भंडार होय. त्यानंतर खादी ग्रामोद्योग भवन आणि इतर भंडारासह कोरा केंद्र उभे राहिले.शरीरास फायदेशीर : खादीपासून तयार करण्यात आलेल्या विविध साहित्याचे फोर्ट येथील खादी ग्रामोद्योग भवनातून विविध स्तरांवर वितरण केले जाते. देश आणि विदेशातही मागणीनुसार खादीच्या कापडापासून तयार करण्यात आलेल्या वस्त्रांचा पुरवठा केला जातो. खादीचे कापड शरीरासाठीही चांगले असून, शरीराच्या आरोग्याच्या दृष्टीने फायदेशीर आहे. - महेश मांजरेकर, व्यवस्थापक, मुंबई खादी अँड व्हिलेज इंडस्ट्री असोसिएशन.१९४६ साली स्वदेशी चळवळ सुरू झाली होती. तेव्हा विदेशी मालावर बहिष्कार घातला गेला होता. याच काळात मुंबईत स्थापन झालेल्या ग्रामोद्योग भंडारचे उद्घाटन महात्मा गांधी यांनी केले होते.- व्ही.जी. जाधव, माजी मुख्य कार्यकारी अधिकारी, मुंबई खादी अँड व्हिलेज इंडस्ट्री असोसिएशन.

टॅग्स :KhadiखादीVasai Virarवसई विरार