शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

आक्षेपांची पूर्तता होत नसल्याने केडीएमसीचे होतेय नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2019 12:42 AM

रक्कम वसूल कोण करणार? : शिवसेना नगरसेवकाने वेधले लक्ष

कल्याण : केडीएमसीच्या लेखापरीक्षण विभागाने आतापर्यंत ७०० पेक्षा जास्त आक्षेप नोंदवले असून, त्यानुसार वसूलपात्र रक्कम ही कोट्यवधींच्या घरात आहे. १९८३ पासूनच्या लेखापरीक्षणातील सगळे आक्षेप पाहता वसूलपात्र रकमेचा आकडा चार अब्जांपेक्षा मोठा आहे. मात्र, त्याची पूर्तता केली जात नसल्याने महापालिकेचे नुकसान करणाऱ्यांकडून पैसा वसूल जात नाही. त्यामुळे महापालिकेचे आर्थिक नुकसान होत असल्याकडे सत्ताधारी पक्षाचे शिवसेनेचे नगरसेवक वामन म्हात्रे यांनी लक्ष वेधले आहे.म्हात्रे म्हणाले, महापालिकेच्या लेखा व वित्त विभागाकडून योग्य प्रकारे काम केले जात नाही. यापूर्वी दिनेश थोरात यांनी याबाबतचा सगळा अहवाल तयार केला होता. मात्र, त्या अहवालाची अंमलबजावणीच अद्यापपर्यंत केलेली नाही. नव्याने आलेल्या लेखा अधिकाऱ्यांना त्यांच्या कामाविषयी स्वारस्य नाही. त्यामुळे लेखापरीक्षण अहवालातील आक्षेपांची पूर्तता कोण करणार व वसूलपात्र रक्कम कोण वसूल करणार, याविषयी प्रश्नचिन्ह आहे.महापालिकेत ई-टेंडरिंग पद्धतीने निविदा काढल्या जातात. तरीही, अधिकारी व कंत्राटदार यांच्या संगनमताने टेंडर फिक्सिंग केले जाते. त्यामुळे महापालिकेचे नुकसान होत आहे. परिणामी, २०११ पासून महापालिकेचे जवळपास साडेतीन हजार कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा आरोप म्हात्रे यांनी केला आहे. ठरावीक कंत्राटदारांनाच काम मिळते. निकोप स्पर्धा होत नसल्यामुळे कंत्राटदारांकडून कामाचा दर्जा राखला जात नाही, असे ते म्हणाले.सध्या महापालिकेच्या हद्दीतील रस्त्यांवरील खड्डे भरण्याचा मुद्दा गाजत आहे. १७ कोटी रुपयांच्या खर्चाचे हे काम असून ७० टक्के खड्डे बुजविल्याचा दावा प्रशासनाकडून केला जात आहे. असे असले तरी प्रत्यक्षात खड्डे कायम आहेत. त्यामुळे २०११ पासून टेंडर फिक्सिंग व रस्त्याची निकृष्ट कामे करणारे व खड्डे न बुजविता बिले लाटणाºया कंत्राटदारांच्या विरोधात फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी म्हात्रे यांनी केली आहे.बेकायदा बांधकामांच्या विरोधात कारवाई केली जात नाही. तसेच दंड आकारून ही बांधकामे नियमित केली जात नाही. बेकायदा बांधकामाला अधीन राहून कर लावल्यास महापालिकेच्या तिजोरीत एक हजार कोटींचा महसूल जमा होऊ शकतो, असे म्हात्रे यांनी सांगितले.महापालिकेने आपल्या हद्दीतील बिल्डरांना ओपन लॅण्डच्या करदरात सूट दिली. मात्र, त्यांनी थकबाकीची रक्कम भरलेली नाही. महापालिका हद्दीतील बिल्डर चोर असल्याचा खळबळजनक आरोप बुधवारी कर आढावा बैठकीत म्हात्रे यांनी केला होता. त्यामुळे स्थायी सदस्य व सभापती यांच्यात शाब्दिक चकमक उडाली. तसेच काही सदस्यांनी बिल्डरांना महापालिका सोयीसुविधा देत नाही. त्यामुळे ते चोर आहेत, असा आरोप करणे कितपत योग्य आहे, याकडे लक्ष वेधले.पाणीचोर मोकाटबेकायदा नळजोडण्या नियमित केल्या जात नाहीत. त्यामुळे पाणीचोर फुकट पाणी पित आहेत. तर, दुसरीकडे पाणीबिल व मालमत्ताकर भरणाºयांच्या तोंडचे पाणी पळविले जात आहे.बेकायदा बांधकामधारक पिण्याच्या पाण्याचा वापर बांधकामासाठी करत आहेत, याकडे म्हात्रे यांनी लक्ष वेधले आहे. पाणीचोरांच्या विरोधात कारवाई होत नसल्याने महापालिकेचे कोट्यवधींचे नुकसान होत आहे.

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिका