शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा नवा निर्णय; भारतीयांसाठी 'अमेरिकन ड्रीम' महागणार! Visa साठी भरावे लागणार ₹८८ लाख
2
Zero GST Product List: सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? 
3
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शाह यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
4
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
5
२२ दिवसांपासून बेपत्ता, शोधूनही सापडेना! नेमकी कुठे गेली साक्षी? आईने केले गंभीर आरोप
6
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
7
असा पैसा काय कामाचा? "मी कामावर जाण्यापूर्वी रोज रडते"; ४० लाख पगार, पण समाधान नाही
8
Asia Cup: संजू सॅमसनची धमाकेदार फटकेबाजी! एका खेळीने धोनीला टाकलं मागे, केला मोठा विक्रम
9
भारताविरुद्ध युद्ध झाल्यास 'हा' देश देणार पाकिस्तानला साथ? संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ म्हणाले...
10
प्रिया मराठेच्या निधनानंतर पती शंतनू मोघेची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, "मधल्या काळात..."
11
भारत, चीन की...., कंडोमच्या वापरात कुठला देश आहे नंबर १, कुठल्या देशात आहे अधिक मागणी?
12
घरातच सूत जुळलं! काकीचा जडला पुतण्यावर जीव, ३ वर्षांपासून प्रेम; पोलीस ठाण्यातच केलं लग्न
13
ओबीसींच्या विकासासाठी योगी सरकारचा मजबूत 'प्लॅन', उचललं क्रांतिकारी पाऊल
14
ठाण्यातील अवजड वाहन बंदीचा ताप! मुंबई अहमदाबाद महामार्गावर देखील अवजड वाहनांना बंदी
15
Navratri Astro 2025: नवरात्रीत 'या' राशींवर होणार अंबाबाईची कृपा, धन-समृद्धी, आनंदाला नसेल तोटा
16
उधमपूरमध्ये काय घडलं? दहशतवाद्यांशी लढताना एक जवान शहीद, सुरक्षा दलांची मोठी कारवाई
17
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
18
बिग बजेट सिनेमांमधून दाखवला बाहेरचा रस्ता, दीपिका पादुकोणने सोडलं मौन; पोस्ट करत म्हणाली...
19
जीएसटीतील बदलानंतर स्कूटर आणि बाईकच्या किंमती १८ हजारांपर्यंत झाल्या कमी!
20
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत

कारगिलच्या विजयाचे शिल्पकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2018 02:27 IST

शेवटी प्रत्युत्तर देण्याचे आदेश आम्हाला प्राप्त झाल्यानंतर एकाबाजूने आर टी रेजिमेंट ने ‘बोफोर्स तोफांचा’ मारा केला दुसरीकडून वायुसेनेने शत्रूंनी ताब्यात घेतलेल्या सर्व चौक्यांवर जोरदार हल्ला करण्यास सुरु वात केली.

शेवटी प्रत्युत्तर देण्याचे आदेश आम्हाला प्राप्त झाल्यानंतर एकाबाजूने आर टी रेजिमेंट ने ‘बोफोर्स तोफांचा’ मारा केला दुसरीकडून वायुसेनेने शत्रूंनी ताब्यात घेतलेल्या सर्व चौक्यांवर जोरदार हल्ला करण्यास सुरु वात केली. शत्रुने शरणागती पत्करल्यानंतरच ते थांबले. त्यानंतर भारत माता की जय, हिंदुस्थान झिंदाबादच्या घोषणा देत सैनिकांनी उरलेल्या पाकिस्तानी सैनिकांचा फडशा पाडला.मूळचे पालघरचे रहिवासी असलेले भाऊराव तायडे देशप्रेमाने प्रेरीत होऊन सैन्यात दाखल झाले. ३ मे १९९९ रोजीे भारताच्या ताब्यातील कारगील प्रांतात पाकिस्तानच्या सेनेने घुसखोरी केल्याची माहिती भारतीय सेनेला प्रथम मिळाल्या नंतर ५ मे रोजी भारतीय सेनेच्या पेट्रोलिंग साठी गेलेल्या टीम मधील ५ सैनिकांची पाकिस्तानी सैनिकांनी निर्घृण हत्या केली. त्यानंतर पाकिस्तान कडून कारिगल युद्धाला सुरु वात केली. ९ मे रोजी त्यांनी केलेल्या गोळीबारात भारतीय सेनेचे दारूगोळ्याचे कोठार नष्ट झाले. त्यानंतरही पाकिस्तान सैनिकांच्या कारवाया सुरूच राहिल्याने अखेर २६ मे ला भारतीय सैनिकांना प्रत्युत्तर देण्याचे आदेश वरिष्ठ पातळीवरून देण्यात आले आणि प्रत्यक्षात युद्धाला सुरुवात झाली होती. त्यामुळे आपल्या मुलीच्या उपचारासाठी दोन महिन्यांच्या सुट्टीवर आलेल्या तायडे यांना तात्काळ कारगिल मध्ये हजर होण्याचे आदेश प्राप्त झाले. तेव्हा माझ्या मुलीवर कांदिवली च्या एका रुग्णालयात पाठीच्या कण्याची दहा तासांची शस्त्रक्रि या सुरू झाली होती. एका बाजूला देशाचे संरक्षण तर दुसरी कडे कन्येप्रति पित्याचे कर्तव्य अशा कात्रीत ते सापडले. मात्र त्यांनी देशाच्या रक्षणाच्या प्रथम प्राधान्य देऊन कन्येवरील शस्त्रक्रि येची जबाबदारी पत्नी व नातेवाईकावर सोपवून ते कारिगल कडे रवाना झाले.दोन दिवसांच्या प्रवासा नंतर मीे द्रास सेक्टर ला हजर झालो. तो पर्यंत भारतीय जवानांनी हे सेक्टर पाकिस्तानी सैनिकांकडून पुन्हा ताब्यात घेतले होते. २ महार रेजिमेंट मध्ये ३६ जवानांचा सहभाग असलेल्या टीम चा ताबा माझ्याकडे रेजिमेंट प्रमुख कर्नल आर के शर्मा ह्यांनी दिल्या नंतर मी या जवानांसह युध्द भूमीकडे कूच केली. उणे ४८ अंश सेल्सिअस अशा जीवघेण्या थंडीत अंगावर बर्फ साचत असलेल्या वातावरणातून आम्ही पुढे जात होतो तेव्हा आम्हाला पाकिस्तानने ताब्यात घेतलेल्या भारतीय चौकीच्या दिशेने जाण्याचा आदेश देण्यात आला. रात्रीचा अंधार कापीत आम्ही पुढे जात असतांना आमच्या दिशेने गोळीबार व्हायला सुरु वात झाली. प्रत्युत्तर म्हणून गोळी झाडण्याचे आदेश नसल्याने आमच्या पुढे शांत राहण्याशिवाय गत्यंतर नव्हते. आमच्याच भूभागावर जबरदस्तीने कब्जा करणाऱ्या आणि आमच्या सैनिकांची निघृण हत्या करणाºयांना यमदसनी पाठविण्यासाठी आमचे हात शिवशिवत असतांना वरिष्ठांचा फायरचा आदेश नसल्याने आमचे हात बांधले गेले होते. त्याच वेळी पाकिस्तानी सैनिकांनी डोंगरावरून आम्ही असलेल्या भागात मोठमोठे दगड लोटून देण्यास सुरु वात केली. त्या दरम्यान सपाट प्रदेश असल्याने बचावासाठी आमच्या समोर काहीही आडोसा नसल्याने अशा दगडांखाली सापडून आमचे दोन सैनिक शहीद झाले. त्या परिस्थितीत आम्ही अनेक तास एकाच ठिकाणी पडून होतो. त्यानंतर आम्ही काही वेळ थांबुन हळूहळू पुढे पुढे सरकत असतांना आमच्या एका सहकारी सैनिकांच्या खांद्यावरील बॅग वरची एक वस्तू चमकल्याने आमचा ठिकाणा शत्रूला कळला. त्याने वरून केलेल्या अंदाधुंद गोळीबारात आमचे नाशिक, मनमाड, सांगली आणि सातारा येथील ५ जवान शहीद झाले. त्यांचे रक्ताच्या थारोळ्यात पडलेले मृतदेह पाहिल्यानंतर प्रत्युत्तरा दाखल गोळीबार न करण्याचा आदेश देणाºया वरिष्ठांचा आम्हाला भयंकर संताप येत होता पण आमचा नाईलाज होता.शब्दांकन - हितेन नाईक

टॅग्स :Indian Armyभारतीय जवानVasai Virarवसई विरार