शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडविल्याची शंका
2
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
3
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
4
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
5
Travel : भारताशी कनेक्शन, 'या' देशात जाताच करोडपती व्हाल! परदेशवारीचा प्लॅन करताय तर नक्की विचार करा
6
ती चूक यामाहा नाही करणार...! पहिली वहिली इलेक्ट्रीक स्कूटर आली!  Aerox लूक; इतकी रेंज देणार की...
7
Delhi Red Fort Blast : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचे कॉल डिटेल्स उघड; दिल्ली स्फोटाचं रहस्य उलगडलं, उमरने ‘तारिक’ नावाने घेतलं सिम कार्ड
8
Yamaha ची नव्या जमान्याची RX100...! स्टायलिश बाईक लाँच; किंमत फक्त ₹ १.** लाख!
9
IND vs SA : ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर गंभीर नाराज; गांगुलीनं असं दिलं उत्तर
10
संत्र्याच्या साली कचरा समजून फेकून देता, थोडं थांबा... त्वचेसह घरालाही होईल मोठा फायदा
11
दिल्ली स्फोट प्रकरणात नवा खुलासा; डॉ. शाहीन अन् डॉ. परवेज सख्खे भाऊ बहीण, तपासात काय सापडलं?
12
मुख्य आरोपीचा 'खास' दोस्त अटकेत; दिल्ली स्फोटप्रकरणात वैद्यकीय क्षेत्रातील सहावी व्यक्ती ताब्यात!
13
एकनाथ शिंदेंनी संजय राऊतांच्या तब्येतीची चौकशी केली; भावाला फोन करून प्रकृतीची विचारपूस
14
'सरकारने निर्दोषांना शिक्षा करू नये; पण...', दिल्ली बॉम्बस्फोटांवर अबू आझमींचे मोठे विधान
15
"पाकिस्तान युद्ध स्थितीत..." इस्लामाबादमध्ये आत्मघाती हल्ला, संरक्षण मंत्री संतापले, टार्गेटवर कोण? 
16
Suraj Tiwari : ट्रेन अपघातात एक हात आणि दोन्ही पाय गमावले; पण मानली नाही हार, जिद्दीने झाला अधिकारी
17
बापरे! १ कोटींची लॉटरी लागली, पण विजेता काही केल्या समोर येईना; कंपनीला सुचली 'अशी' आयडिया
18
दिल्लीच्या प्रदूषणामुळे 'या' ५ कंपन्यांचे शेअर झाले हॉट! Air Purifier ची मागणी वाढल्याने गुंतवणूकदारांचे लक्ष
19
Decision Making: निर्णय घेताना द्विधा मनःस्थिती होते? सद्गुरु सांगतात, 'या' पाच मार्गाने घ्या मनाचा कौल!
20
कॉलेज तरुणीने उबर बुक केली...! अपघात झाला अन् ड्रायव्हर पळाला; आईने कंपनीला तीन प्रश्न विचारले...

जव्हारचे जय सागर धरण कोरडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2019 23:02 IST

आठवड्यात पाऊस पडला नाही तर शहर सोडून जाण्याची वेळ

जव्हार : या शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या जय सागर धरणात अतीअल्प म्हणजेच चार ते पाच दिवस पाणी पुरेल ऐवढाच पाणी साठा शिल्लक आहे. यामुळे जव्हारकरांना पाण्यासाठी भटकंती करावी लागणार आहे. या आठवड्यात पाऊस पडला नाही तर जव्हार शहरात भीषण पाणी टंचाई निर्माण होवून शहरातील नागरिकांना जव्हार शहर सोडून जावे लागेल, अशी स्थिती निर्माण होणार आहे.पाणी साठा चार ते पाच दिवस पुरेल एवढाच साठा शिल्लक आहे. म्हणून २१, २५, ३० जूनलाच फक्त अर्धा तास पाणी सोडण्यात येईल, असे नगरपरिषदेने शहरात दवंडी देवून जाहीर केले आहे. तसेच नगरपरिषदेने नोटिस काढली आहे. जव्हार शहराला पाणी पुरवठा करणारे जय सागर धरण हे ६० वर्षांपूर्वी संस्थानिक राजे यशवंतराव मुकणे यांनी त्यावेळच्या दोन ते चार हजार लोकांसाठी बांधले होते. मात्र दिवसेंदिवस जव्हार शहराची लोकसंख्या १८ ते २० हजाराच्या आसपास वाढली आहे. त्यातच शहराला लागून रायतळे व कासटवाडी या दोन ग्रामपंचयात क्षेत्रातील अनेक कुटुंबांना याच धरणातील पाण्यावरच अवलंबून राहावे लागत आहे. त्यामुळे वर्षानुवर्ष लोकसंख्या वाढल्याने धरणातील पाणी अपुरे पडू लागले आहे. धरणाचे बांधकाम केल्यापासून त्यात साचलेला गाळ काढलेला नाही. म्हणून पाणी साठा कमी होतो, याचा परिणाम आज पाऊस नसल्यामुळे जव्हारकराना भोगावा लागणार आहे. तसेच डॅममधील साचलेला गाळ काढण्यासाठी व डॅमची उंची वाढविण्यासाठी वर्षभरापूर्वी टेंडर काढूनही गाळ काढण्यात आला नाही की, उंचीही वाढविली नाही म्हणून ही वेळ आज जनतेवर ओढावली आहे. त्यामुळे आतातरी तातडीने धरणाची उंची वाढविणे व त्यातील गाळ काढणे ही कामे तातडीने होतील अशी अपेक्षा आहे.नगरपरिषदेने या जय सागर धरणाकडे वेळीच लक्ष दिले असते, तर ही परिस्थिती निर्माण झाली नसती. गाळ काढण्याचे टेंडर काढूनही ते व खोलीकरण केले नाही.- असरफ घाची (चॉईस मास्टर), तालुकाध्यक्ष, राष्ट्रवादी

टॅग्स :Damधरणwater scarcityपाणी टंचाई