शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या अयातुल्ला खामेनीला घरातूनच विरोध; पुतण्या म्हणतो- शांततेसाठी या हुकुमशाही शासनाचा अंत आवश्यक!
2
Maharashtra Rain Alert: ठाणे, पुण्यासह पाच जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा
3
पाकिस्तान तर विचारही करू शकणार नाही, इराणी मिसाईल्स रोखण्यासाठी इस्त्रायल रोज किती करतोय खर्च माहितीये?
4
इंडोनेशियाच्या माउंट लेवोटोबी लाकी येथे ज्वालामुखीचा उद्रेक, हवेत १० किमी उंचीपर्यंत धुराचे ढग
5
Rishabh Pant, IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध विराट कोहलीच्या जागी कोण बॅटिंगला उतरणार? उपकर्णधार ऋषभ पंतने दिलं उत्तर
6
युद्धाच्या भीतीदरम्यान शेअर बाजाराची कमकुवत सुरुवात; सेन्सेक्स १२० अंकांनी घसरला, IT Stocks वर दबाव
7
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
8
उद्धवसेनेचे माजी नगरसेवक मनसेशी युतीच्या बाजूने
9
Ganeshotsav 2025: मोठ्या पीओपी गणेशमूर्तींच्या विसर्जनाचा पेच?
10
गलवान घाटी संघर्षावर आधारित सिनेमात सलमान खानसोबत 'ही' अभिनेत्री दिसणार
11
इराणवर हल्ला करण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांची मंजुरी; 'या' कारणामुळे थांबवला अंतिम आदेश
12
JM Mhatre: जे. एम. म्हात्रेंच्या ४४ कोटींच्या ठेवी, गुंतवणुकीवर ईडीची टाच
13
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर आज दिल्लीत होणार अंत्यसंस्कार, पण का झाला उशीर?
14
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
15
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
16
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
17
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
18
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
19
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
20
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली

जव्हारचे जय सागर धरण कोरडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2019 23:02 IST

आठवड्यात पाऊस पडला नाही तर शहर सोडून जाण्याची वेळ

जव्हार : या शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या जय सागर धरणात अतीअल्प म्हणजेच चार ते पाच दिवस पाणी पुरेल ऐवढाच पाणी साठा शिल्लक आहे. यामुळे जव्हारकरांना पाण्यासाठी भटकंती करावी लागणार आहे. या आठवड्यात पाऊस पडला नाही तर जव्हार शहरात भीषण पाणी टंचाई निर्माण होवून शहरातील नागरिकांना जव्हार शहर सोडून जावे लागेल, अशी स्थिती निर्माण होणार आहे.पाणी साठा चार ते पाच दिवस पुरेल एवढाच साठा शिल्लक आहे. म्हणून २१, २५, ३० जूनलाच फक्त अर्धा तास पाणी सोडण्यात येईल, असे नगरपरिषदेने शहरात दवंडी देवून जाहीर केले आहे. तसेच नगरपरिषदेने नोटिस काढली आहे. जव्हार शहराला पाणी पुरवठा करणारे जय सागर धरण हे ६० वर्षांपूर्वी संस्थानिक राजे यशवंतराव मुकणे यांनी त्यावेळच्या दोन ते चार हजार लोकांसाठी बांधले होते. मात्र दिवसेंदिवस जव्हार शहराची लोकसंख्या १८ ते २० हजाराच्या आसपास वाढली आहे. त्यातच शहराला लागून रायतळे व कासटवाडी या दोन ग्रामपंचयात क्षेत्रातील अनेक कुटुंबांना याच धरणातील पाण्यावरच अवलंबून राहावे लागत आहे. त्यामुळे वर्षानुवर्ष लोकसंख्या वाढल्याने धरणातील पाणी अपुरे पडू लागले आहे. धरणाचे बांधकाम केल्यापासून त्यात साचलेला गाळ काढलेला नाही. म्हणून पाणी साठा कमी होतो, याचा परिणाम आज पाऊस नसल्यामुळे जव्हारकराना भोगावा लागणार आहे. तसेच डॅममधील साचलेला गाळ काढण्यासाठी व डॅमची उंची वाढविण्यासाठी वर्षभरापूर्वी टेंडर काढूनही गाळ काढण्यात आला नाही की, उंचीही वाढविली नाही म्हणून ही वेळ आज जनतेवर ओढावली आहे. त्यामुळे आतातरी तातडीने धरणाची उंची वाढविणे व त्यातील गाळ काढणे ही कामे तातडीने होतील अशी अपेक्षा आहे.नगरपरिषदेने या जय सागर धरणाकडे वेळीच लक्ष दिले असते, तर ही परिस्थिती निर्माण झाली नसती. गाळ काढण्याचे टेंडर काढूनही ते व खोलीकरण केले नाही.- असरफ घाची (चॉईस मास्टर), तालुकाध्यक्ष, राष्ट्रवादी

टॅग्स :Damधरणwater scarcityपाणी टंचाई