शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi vs Congress: "काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी, त्यांना विकासाची ABCD माहिती नाही"; पंतप्रधान मोदी विरोधकांवर बरसले!
2
RCB चे अभिनंदन न करता MS Dhoni ड्रेसिंग रुममध्ये का परतला? समोर आलं कारण 
3
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
4
...तर पक्ष तेव्हाच फुटला असता; शरद पवारांच्या दाव्यावर छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
5
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
6
Swati Maliwal Case : दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केला
7
Video: धोनी मॅच संपल्यावर RCBच्या खेळाडूंशी जे वागला, त्यावर विश्वासच बसेना! नेटकऱ्यांनीही केली टीका
8
शेतातील ५० लाख झाडांवर कुऱ्हाड! अधिक पिकांसाठी जमीन हवी म्हणून तोडली झाडे - अहवाल 
9
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
10
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
11
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
12
नाशिकमध्ये निवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार? मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं
13
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
14
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
15
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
16
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
17
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
18
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
19
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
20
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू

वसईत भाज्यांना महागाईची फोडणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 04, 2019 11:13 PM

मालाची आवक घटली : गृहिणींचे स्वयंपाकाचे बजेट बिघडले; शोधला कडधान्याचा पर्याय

पारोळ : महाराष्ट्रात परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावल्याने पिकांचे मोठे नुकसान होत आहे. बाजारपेठेत मालाची आवक कमी झाल्याने वसई, विरार, नालासोपारा भागात भाजीपाला महागला असल्याने सामान्य नागरिकांचे स्वयंपाक घराचे बजेट बिघडले असून या पावसामुळे आता भाज्यांनाही महागाईची फोडणी बसत आहे. तर भाज्या महाग झाल्याने आता नागरिकांनी कडधान्याचा पर्याय शोधला आहे.

येत्या दोन दिवसात वेधशाळेने महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचा अंदाज दिल्याने भाजीपाल्याची आवक कमी होणार असल्याने काही दिवस भाज्यांचे भाव तेजीत राहणार आहेत. चंदनसार, होळी या भाजी बाजारात नाशिकवरून रोज भाजीपाला येतो तर वसई पूर्व तसेच पश्चिम भागातील शेतकरीही येथे विक्रीसाठी भाज्या आणतात. व्यापारी या शेतकऱ्यांकडून होलसेल दराने भाजीपाला विकत घेतात आणि शहरी तसेच ग्रामीण भागात किरकोळ दराने विकतात. पण या काही दिवसात परतीच्या पावसाने पिकांचे मोठे नुकसान केले तसेच माल शेतात राहिल्याने त्याची नासाडीही झाली. यामुळे येणाºया मालाची आवक घटली तर बाजारात मालाची उपलब्धता कमी प्रमाणात असल्याने भाजीपाल्याचे भाव गगनाला भिडले.टोमॅटोने किलोला सत्तरी गाठली. वांगीही ६० वर पोहोचली. भेंडीही ८० वर गेली. मिरची ६० रुपये किलो झाल्याने तीही आणखी तिखट झाली. तर जेवणाची लज्जत वाढवणारी कोथिंबीर ही ६० रुपये जुडी झाली. कांदे ८० रुपये किलो झाले आहेत. मेथी, पालक, शेपू पालेभाज्यांच्याही दरात दुप्पट वाढ झाली तर काकडी, गाजर, बीट यांचाही किलो मागे ६० रु. असा भाव वधारला.ग्राहक करतात होलसेल खरेदीच्किरकोळ बाजारात भाजीपाल्याचे दर वाढत असल्याने ग्राहक चंदनसार बाजारात होलसेल दराने भाजी विकत घेत असून एकत्रित पाच ते दहा किलो घेतलेली भाजी आपआपसात वाटप करत असल्याचे चित्र भाजी बाजाराच्या परिसरात पाहायला मिळत आहे. तर वाढीव दराने माल विकत घ्यावा लागत असल्याने किरकोळ बाजारात दरात होत असल्याचे भाजी विक्रेत्यांनी सांगितले.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार