शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचं टार्गेट किलिंग! ५ मिलियन डॉलरचे इनाम असलेला टॉप कमांडर बेरूतमध्ये हवाई हल्ल्यात उडवला
2
शेख हसीनांच्या प्रत्यार्पणासाठी बांगलादेशची भारताला थेट मागणी; फाशीच्या शिक्षेमुळे वाढले टेन्शन!
3
Wing Commander Namansh Syal :'भारत माता की जय'च्या घोषणा, हजारो नागरिकांच्या उपस्थितीत वीरपत्नीचा 'तो' अखेरचा सॅल्यूट...
4
India ODI Squad vs SA: भारतीय वनडे संघाची घोषणा! KL राहुल कॅप्टन; ऋतुराजलाही मिळाली संधी
5
Travel : भारतातील ५ सुंदर गावं, जिथे फिरायला जाल तर इटली अन् पॅरिसही विसराल! पाहा कुठे आहेत...
6
अल-फलाह डॉक्टरांच्या अटकेनंतर सर्च ऑपरेशन सुरू; मशिदीतून संशयास्पद पावडरसह विदेशी दारूही जप्त!
7
“स्वामी समर्थांनी सांगितले, आळशी माणसाचे तोंड पाहू नका”; शिंदेंचा नाव न घेता ठाकरेंना टोला
8
गुरुवारी दत्त जयंती २०२५: ११ दिवस सेवा करा, नक्की फल मिळेल; काळजी सोडा, स्वामी शुभच करतील!
9
संतापजनक! सोयाबीनची भाजी केली म्हणून पतीने पत्नीचे डोके फोडले; सिद्धार्थनगरमध्ये हादरवणारी घटना
10
बिबट्या पुण्याच्या वेशीवर; पहाटे पहाटे औंधमध्ये  बिबट्याचे दर्शन; पुणे शहरात खळबळ, वनविभाग आणि RESQ सतर्क
11
“काँग्रेसच्या विकासकांमाची यादी करायची तर कागद संपतो, भाजपाने मात्र...”: हर्षवर्धन सपकाळ
12
IND vs SA 2nd Test Day 2 Stumps : धोक्याची घंटा वाजली! टीम इंडिया पलटवार करू शकेल का?
13
६, ९, ५, २२ अन् २५ हे केवळ अंक नाहीत, अयोध्या राम मंदिराशी खास कनेक्शन; तुम्हाला माहितीये?
14
"महिलेचा गर्भपात, पती म्हणून अनंत गर्जेंचे नाव"; डॉक्टर गौरींना मिळाली होती कागदपत्रे, प्रकरणाला धक्कादायक वळण
15
Smriti Mandhana Wedding Postponed: वडिलांची तब्येत बिघडली; स्मृतीनं घेतला लग्न पुढे ढकलण्याचा निर्णय
16
"अनंतचा फोन आलेला, खूप रडत होता; त्याने मला सांगितलं की..."; गौरी पालवे प्रकरणावर पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
17
Video - क्लिनिकबाहेर उभ्या असलेल्या डॉक्टरला आला हार्ट अटॅक, खाली कोसळला अन्...
18
“भाजपाने सुसंस्कृत राजकारण सोडले, सरकार नैतिक कर्तव्य विसरले”; सुप्रिया सुळेंची टीका
19
भारताच्या तेल पुरवठ्यावर अमेरिकेचा मोठा 'बॅन'; रशियाकडून मिळणारे ४०% स्वस्त तेल आता कमी होणार?
20
सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच मिळणार फायदे! नवीन लेबर कोडमुळे कामगारांना मिळणार मोठा आधार
Daily Top 2Weekly Top 5

अपघातांतील बेवारस मृतदेहांची ओळख पटविताना रेल्वे पोलिसांच्या डोकेदुखीत वाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2021 01:54 IST

कोरोनाकाळात बंद असलेली रेल्वेसेवा आता पूर्वपदावर येऊ लागल्याने प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. पण, या वर्षी ३२ बेवारस मृतदेह मिळाल्याने त्यांची ओळख पटविण्यासाठी रेल्वे पोलिसांची मात्र डोकेदुखी वाढली आहे.

- सुनील घरतपारोळ - कोरोनाकाळात बंद असलेली रेल्वेसेवा आता पूर्वपदावर येऊ लागल्याने प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. पण, या वर्षी ३२ बेवारस मृतदेह मिळाल्याने त्यांची ओळख पटविण्यासाठी रेल्वे पोलिसांची मात्र डोकेदुखी वाढली आहे.यंदा लॉकडाऊन काळात रेल्वेसेवा बंद ठेवण्यात आली होती. त्यामुळे भरगच्च गर्दी, गर्दीने गजबजलेले फलाट असे चित्र मध्यंतरी काही काळ पूर्णपणे थांबले होते. रेल्वेसेवाच बंद असल्याने अपघातांचे प्रमाणदेखील कमी झाले होते.  गेल्या अनेक वर्षांत प्रथमच रेल्वे अपघातांचा आलेख यंदाच्या कोरोना महामारीत खाली आल्याने रेल्वे प्रशासनाला दिलासा मिळाला असला तरी लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर झालेल्या अपघातांतील मृतांची अद्याप ओळख पटविण्यात वसई रोड  रेल्वे पोलीस ठाण्याला यश आलेले नाही.मागील सहा वर्षांत रेल्वे अपघातांत मृत्यू पावलेल्या तब्बल ३७८ मृतांची अद्याप ओळख पटलेली नसल्याने वसई रोड रेल्वे पोलिसांकडून मृतांची ओळख पटविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. वसई रोड रेल्वे पोलीस ठाण्याच्या हद्दीत वैतरणा ते मीरा रोडदरम्यान एकूण ८ रेल्वे स्थानके येतात. या पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील विरार, नालासोपारा, भाईंदर, मीरा रोड ही सर्वाधिक गर्दीची स्थानके आहेत. वसई-विरार शहरांच्या वाढत्या लोकसंख्येबरोबरच प्रवाशांची संख्याही वाढली आहे. या स्थानकांतून दररोज लाखो प्रवासी मुंबईत ये-जा करीत असतात. वाढत्या गर्दीमुळे प्रवास धोकादायक बनत चालला आहे. यामुळे विविध प्रकारच्या अपघाताच्या घटना घडत आहेत. रूळ ओलांडणे, लोकलमधील गर्दीमुळे खाली पडणे, ओव्हरहेड तारेचा धक्का बसणे यामुळे प्रवाशांचे मृत्यू वाढले आहेत.मागील ६ वर्षांच्या आकडेवारीवर एक नजर टाकल्यास वसई रोड रेल्वे स्थानकांच्या हद्दीतील बेवारस मृतदेहांचा आकडा थक्क करणारा ठरला आहे. मागील ६ वर्षांत अपघातांत मृत्यू झालेल्यांपैकी ३७८ प्रवाशांची ओळख पटलेली नाही. रेल्वे अपघातांत मरण पावलेल्या बेवारस मृतांची आकडेवारी मोठी असून मोठ्या प्रमाणात मृतांच्या वारसांचा शोध घेण्याचे आव्हान वसई रोड रेल्वे पोलिसांसमोर आहे. बेवारस मृतदेह रेल्वे पोलिसांना मिळाल्यावर त्याची पूर्ण चौकशी करून सात दिवसांपर्यंत त्याच्या नातेवाइकांचा शोध घेतला जातो. या व्यक्तीबाबत स्थानिक पोलीस ठाणे यांनाही कळविले जाते. सर्व प्रक्रिया करूनही ओळख न पटल्यास त्या बेवारस मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात येतात.- सचिन इंगवले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, वसई रोड रेल्वे पोलीस ठाणे

टॅग्स :Vasai Virarवसई विरारrailwayरेल्वेDeathमृत्यू