शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलने सीझफायर तोडले, ट्रम्प प्रचंड नाराज; म्हणाले, तातडीने पायलटना माघारी बोलवा...
2
शक्तिपीठ महामार्गाला मंजुरी, २० हजार कोटींची तरतूद; GSTत बदल होणार, मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय
3
तुर्कीला धडा शिकवण्याची तयारी सुरू?; सर्वात मोठ्या शत्रूच्या देशात पोहचले भारतीय हवाई दल प्रमुख
4
“झूठ बोले कौवा काटे”; राहुल गांधींच्या आरोपांना CM फडणवीसांचे उत्तर, सगळी आकेडवारीच दिली
5
Nuclear Weapon : कोणता देश अणुबॉम्ब बनवतोय अन् कोणता नाही? कसं आणि कोण ठेवतं लक्ष? जाणून घ्या...
6
“भास्कर जाधवांनी शिंदेंचे नेतृत्व स्वीकारले तर आनंद, मातोश्रीवरचा राग...”; कुणी दिला सल्ला?
7
दिलजीत दोसांझच्या सिनेमात पाकिस्तानी अभिनेत्रीची भूमिका, टीका झाल्यावर म्हणाला...
8
Rahul Gandhi :'निवडणुका नियमांनुसार होतात', राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाचे उत्तर; चर्चेसाठी बोलावले
9
अपघाताच्या एक दिवस आधी एअर इंडियाच्या सीईओंचा पगार ४६% वाढवला; आता किती पैसे मिळतात?
10
विहिरीत पडलेल्या वासराला वाचवण्यासाठी उतरलेले तरुण एका पाठोपाठ एक बेशुद्ध पडले, पाच जणांचा मृत्यू, संपूर्ण गावावर शोककळा  
11
प्रेक्षकांची प्रतीक्षा आज संपणार; काही तासात सुबोध भावे-तेजश्रीच्या मालिकेचा प्रोमो येणार; पाहा झलक
12
"हात लावशील तर ३५ तुकडे करेन"; मधुचंद्राच्या रात्रीच नवरीने दिली थेट धमकी! म्हणाली...
13
केदारनाथला देवाकडे काय मागितलं? चाहत्याचा प्रश्न, अमृताचं मन जिंकणारं उत्तर, म्हणाली- "खरं सांगू..."
14
अहमदाबाद विमान अपघात: ब्लॅक बॉक्सची माहिती कधीपर्यंत मिळेल? केंद्रीय मंत्री नायडू म्हणाले...
15
हिंदी मोफत शिकवत असतील तर त्यात गैर काय?; राष्ट्रवादी आमदार संग्राम जगतापांचा सवाल
16
ज्या कतारवर हल्ला केला, त्याच कतारच्या शेखने फोन केला...; अन् इराण सीझफायरसाठी तयारही झाला...
17
"अमेरिकेला गुडघे टेकायला लावले, इराण बनला मुस्लिम जगताचा नेता’’, महबूबा मुफ्ती यांनी केलं कौतुक  
18
यंदा जूनमध्येच 'अलमट्टी' ६१ टक्के भरले; कृष्णा नदीकाठच्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
19
युद्धबंदीच्या बातमीनंतर सेन्सेक्स-निफ्टी वधारले, पण 'या' कंपन्यांचे शेअर्स धडाधड कोसळले; काय आहे कारण?
20
लग्नानंतर दरमहा १०,००० फिक्स! पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत फक्त एकदाच करा गुंतवणूक!

अपघातांतील बेवारस मृतदेहांची ओळख पटविताना रेल्वे पोलिसांच्या डोकेदुखीत वाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2021 01:54 IST

कोरोनाकाळात बंद असलेली रेल्वेसेवा आता पूर्वपदावर येऊ लागल्याने प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. पण, या वर्षी ३२ बेवारस मृतदेह मिळाल्याने त्यांची ओळख पटविण्यासाठी रेल्वे पोलिसांची मात्र डोकेदुखी वाढली आहे.

- सुनील घरतपारोळ - कोरोनाकाळात बंद असलेली रेल्वेसेवा आता पूर्वपदावर येऊ लागल्याने प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. पण, या वर्षी ३२ बेवारस मृतदेह मिळाल्याने त्यांची ओळख पटविण्यासाठी रेल्वे पोलिसांची मात्र डोकेदुखी वाढली आहे.यंदा लॉकडाऊन काळात रेल्वेसेवा बंद ठेवण्यात आली होती. त्यामुळे भरगच्च गर्दी, गर्दीने गजबजलेले फलाट असे चित्र मध्यंतरी काही काळ पूर्णपणे थांबले होते. रेल्वेसेवाच बंद असल्याने अपघातांचे प्रमाणदेखील कमी झाले होते.  गेल्या अनेक वर्षांत प्रथमच रेल्वे अपघातांचा आलेख यंदाच्या कोरोना महामारीत खाली आल्याने रेल्वे प्रशासनाला दिलासा मिळाला असला तरी लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर झालेल्या अपघातांतील मृतांची अद्याप ओळख पटविण्यात वसई रोड  रेल्वे पोलीस ठाण्याला यश आलेले नाही.मागील सहा वर्षांत रेल्वे अपघातांत मृत्यू पावलेल्या तब्बल ३७८ मृतांची अद्याप ओळख पटलेली नसल्याने वसई रोड रेल्वे पोलिसांकडून मृतांची ओळख पटविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. वसई रोड रेल्वे पोलीस ठाण्याच्या हद्दीत वैतरणा ते मीरा रोडदरम्यान एकूण ८ रेल्वे स्थानके येतात. या पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील विरार, नालासोपारा, भाईंदर, मीरा रोड ही सर्वाधिक गर्दीची स्थानके आहेत. वसई-विरार शहरांच्या वाढत्या लोकसंख्येबरोबरच प्रवाशांची संख्याही वाढली आहे. या स्थानकांतून दररोज लाखो प्रवासी मुंबईत ये-जा करीत असतात. वाढत्या गर्दीमुळे प्रवास धोकादायक बनत चालला आहे. यामुळे विविध प्रकारच्या अपघाताच्या घटना घडत आहेत. रूळ ओलांडणे, लोकलमधील गर्दीमुळे खाली पडणे, ओव्हरहेड तारेचा धक्का बसणे यामुळे प्रवाशांचे मृत्यू वाढले आहेत.मागील ६ वर्षांच्या आकडेवारीवर एक नजर टाकल्यास वसई रोड रेल्वे स्थानकांच्या हद्दीतील बेवारस मृतदेहांचा आकडा थक्क करणारा ठरला आहे. मागील ६ वर्षांत अपघातांत मृत्यू झालेल्यांपैकी ३७८ प्रवाशांची ओळख पटलेली नाही. रेल्वे अपघातांत मरण पावलेल्या बेवारस मृतांची आकडेवारी मोठी असून मोठ्या प्रमाणात मृतांच्या वारसांचा शोध घेण्याचे आव्हान वसई रोड रेल्वे पोलिसांसमोर आहे. बेवारस मृतदेह रेल्वे पोलिसांना मिळाल्यावर त्याची पूर्ण चौकशी करून सात दिवसांपर्यंत त्याच्या नातेवाइकांचा शोध घेतला जातो. या व्यक्तीबाबत स्थानिक पोलीस ठाणे यांनाही कळविले जाते. सर्व प्रक्रिया करूनही ओळख न पटल्यास त्या बेवारस मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात येतात.- सचिन इंगवले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, वसई रोड रेल्वे पोलीस ठाणे

टॅग्स :Vasai Virarवसई विरारrailwayरेल्वेDeathमृत्यू