शहरं
Join us  
Trending Stories
1
'परिवार का साथ, परिवार का विकास...', बिहारमधून पीएम मोदींची काँग्रेस-रादजवर खोचक टीका
2
इस्रायलसोबत युद्ध सुरू असताना अचानक ३ इराणी विमाने ओमानमध्ये पोहोचली, नेमकं कारण काय?
3
Two-Wheeler New Rules : नवीन सर्व दुचाकींना 'एबीएस आणि दोन हेल्मेट' सक्तीचे; केंद्रीय परिवहन मंत्रालयाचा मोठा निर्णय
4
कुणी फुकट खाऊ घालत नाही...! आसिम मुनीर-डोनाल्ड ट्रम्प 'लन्च पॉलिटिक्स'नं पाकिस्तानचंच टेन्शन वाढवलं
5
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेवेळी एका टिफिनवाल्याने वाचवला ८० डॉक्टरांचा जीव
6
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
7
Pandharpur Wari 2025: आता स्वस्तात करा विठ्ठलाचे दर्शन; एसटी महामंडळाची खास ऑफर!
8
१ जुलैपासून बदलणार बँकिंगचे नियम, क्रेडिट कार्ड बिल पेमेंटमध्येही होणार बदल; जाणून घ्या माहिती
9
क्रुझर प्रेमींची पहिली पसंत; नवीन अवतारात येणार Bajaj ची Avenger, किंमत फक्त...
10
Debt on US: ट्रम्प अडकले... संकटात अमेरिका; कर्ज ३७ ट्रिलियन डॉलर्सच्या पार, भारताचं किती देणं लागतो US
11
आधी स्वत:च पत्नीचं कुंकू पुसलं, नंतर बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं; पती म्हणतो, “मला विष देऊन...”
12
इराण-इस्त्रायल युद्ध आता ट्रम्प विरुद्ध पुतिन; चीन, नॉर्थ कोरियाचा हुकुमशाह उघडपणे पुढे आले
13
पंढरपुरात मोठी घटना! मित्रासोबत विठू माऊलीच्या दर्शनाला आलेल्या तरुणाचा चंद्रभागा नदीत बुडून मृत्यू
14
'वर्षभरापूर्वीच एअर इंडियाच्या बोईंगमधील खराबीची माहिती दिलेली'; अहमदाबाद विमान अपघातावर खळबळजनक दावा
15
“पप्पा, आम्हाला भारतात बोलवा अन् फोन कट”; इराणमध्ये अडकली लेक, वडिलांना सतावतेय भीती
16
अभिषेक-करिश्मा कपूरचा झालेला साखरपुडा, पण लग्न का मोडलं? बिग बींनी केलेला खुलासा
17
बँकेत जाताय? थांबा! जुलैमध्ये १३ दिवस बँका बंद राहणार; पहा तुमच्या शहरातील सुट्ट्यांची यादी
18
मुंबई महापालिकेची निवडणूक मविआ एकत्र लढणार की नाही? शरद पवार म्हणाले, "उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची..."
19
Ashadhi Wari 2025: वारी म्हणजे केवळ पंढरपूरला चालत जाणं नव्हे, तर वारी म्हणजे सदेह वैकुंठाची वाट चालणं!
20
प्रियकरासोबत मिळून पतीची केली हत्या, लग्नाआधीपासून सुरू होते अफेअर; हत्येनंतर रचला बनाव

दिवाळीनिमित्त पोह्यांना वाढली मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2018 02:32 IST

दिवाळीनिमित्त चिवडा बनविण्यासाठी पोह्यांना मागणी वाढली असून भात कापणी हंगामानंतर स्थानिक फोर्ट येथील पोहा मिलकडे वळले आहेत. दरम्यान, मुंबईच्या बाजारात येथील पोह्यांना वाढती मागणी असून ते खवय्यांच्या पसंतीस उतरले आहेत.

- अनिरुद्ध पाटीलबोर्डी  - दिवाळीनिमित्त चिवडा बनविण्यासाठी पोह्यांना मागणी वाढली असून भात कापणी हंगामानंतर स्थानिक फोर्ट येथील पोहा मिलकडे वळले आहेत. दरम्यान, मुंबईच्या बाजारात येथील पोह्यांना वाढती मागणी असून ते खवय्यांच्या पसंतीस उतरले आहेत.डहाणू येथील खादी ग्रामोद्योगात प्रशिक्षण घेतल्यानंतर १९८१ साली फोर्ट येथे राहणारे दिवंगत रामचंद्र जोशी यांनी घराच्या आवारातच पोहा मिल सुरू केली. त्यांंचा हा वारसा मिथुन जोशी हा युवक चालवत आहे. येथे दगडी आणि पातळ पोहे बनविले जातात. याकरिता गुजरी जातीच्या भाताची आवश्यकता असते. दगडी पोह्यांकरिता हे भात गरम पाण्यात तीन तास भिजविण्यात येते. त्यानंतर, दुसऱ्या दिवशी ते भाजले जाते. त्यापासून थोडेसे गोलसर आकारातील आणि जाड पोहे मिळतात.या पोह्यांना चिवडा बनविण्यासाठी मुंबई बाजारात मोठी मागणी आहे. विशेषत: लालबागच्या प्रसिद्ध चिवडा गल्ली मध्ये मिळणारा विजयलक्ष्मी चिवडा, टेस्टी चिवडा आणि महालक्ष्मी चिवडा बनविण्यासाठी येथूनच निर्यात होते. तर पातळ (पेपर) पोह्यांसाठी भात थंड पाण्यात भिजवले जात असून वर उल्लेख केल्या प्रमाणेच प्रक्रि या केली जाते. त्यालाही चांगली मागणी आहे.गुजरी भातापासून हे पोहे केले जातात. पूर्वी डहाणू तालुक्यातील डोंगरीपट्ट्यातून स्थानिक आदिवासींकडून या जातीचे भात मोठ्या प्रमाणात उपलब्ध व्हायचे. मात्र हल्ली हायब्रीड बियाण्यांचा प्रभाव शेतकºयांवर जास्त आहे. तरीही चारोटीनजीकच्या उरसा गावातून काही प्रमाणात ही निकड भरून निघते. तर अधिकच्या भातासाठी गुजरातच्या नवसारी येथून आयात केली जाते. ते घाऊक बाजारात १३ ते १५ रु पये प्रतिकिलो दराने खरेदी केले जाते. तर तयार पोहे ३० ते ३५ रूपये किलोने विक्र ी केले जातात असे मिथून सांगतो.दरम्यान, भाताच्या दर्जानुसार त्यापासून किती पोहे मिळतात ते ठरते. असं असलं तरीही उत्तम दर्जाच्या शंभर किलो भातापासून ७० किलो दगडी पोहे, तर ५० किलो पातळ पोहे तयार होतात.उर्विरत ३० किलो कनी (बारीक तुकडे) आणि कोंड्याच्या स्वरूपात मिळतो. त्याचा वापर जनावरांचे खाद्य म्हणून केला जातो. त्याला ६ ते ८ रु पये प्रतिकिलोने बाजारभाव मिळतो. तर भाताच्या आवरणापासून निघणारा तूस हा गिरणीची भट्टी पेटविण्यासाठी उपयोगात आणला जातो.हक्काची बाजारपेठ हवी\गट शेतीच्या माध्यमातून गुजरी या भाताची लागवड करण्यास कृषी विभागाने शेतकर्यांना प्रवृत्त केले पाहिजे. शिवाय त्यांना हमी भाव देऊन, या भाताची खरेदी केली पाहिजे. तर पोह्यांपासून प्रक्रि या उद्योगाला चालना देण्यासाठी महिला वर्गाला प्रशिक्षण देणे आवश्यक असून बाजारपेठ मिळवून द्यायला हवी. याचा समावेश विद्यार्थ्यांच्या पोषण आहारात केल्यास त्यांना पौष्टिक अन्न आण िदुष्काळ परिस्थितीत जनावरांना खाद्याची गरजही भागविता येईल.गुजरी भाताची कमतरता आणि सणवार वगळता वर्षभर हा व्यवसाय चालविणे अवघड आहे. त्यामुळे मोजक्याच पोहा मिल शेवटची घटका मोजत आहेत. याला नवसंजीवनीची गरज आहे.- मिथुन जोशी, डहाणू फोर्ट येथील अरु ण पोहा मिलचा मालक

टॅग्स :Vasai Virarवसई विरारDiwaliदिवाळी