शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
3
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
4
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
5
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
6
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
7
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
8
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
9
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
10
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
11
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
12
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
13
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
14
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
15
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
16
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
17
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
18
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
19
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
20
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार

पुलावरील संरक्षक कठड्यांची उंची वाढवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2018 5:52 AM

वाहनचालकांसह नागरिकांची मागणी : सततच्या दुरूस्तीने पुलावरील थर वाढला

वाडा : तालुक्यातील नद्यांवर असलेल्या जुन्या पुलांची उंची अंत्यत कमी झाल्याने अपघात होऊन काहींचा मृत्यू झाला आहे तर काही जण जखमी झाले आहेत. तसेच येथे मोठा अपघात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या पुलां वरील संरक्षक कठड्यांची उंची वाढवावी, अशी मागणी चालकांसह नागरिक करीत आहेत.

वाडा तालुक्यात तानसा, वैतरणा, पिंजाळ व देहर्जे अशा चार मुख्य नद्या असून येथून भिवंडी वाडा मनोर हा राज्यमार्ग गेला आहे. या नद्यांवर गेल्या अनेक वर्षापूर्वी पूल बांधलेले आहेत. या पुलांवर संरक्षक कठडे आहेत. मात्र सततच्या होणाऱ्या दुरुस्तीमुळे त्यांची उंची अत्यंत कमी असल्याने या पूलांवरून पडून अपघात झाले आहेत. गेल्या काही महिन्यापूर्वी या पुलांवरील कठड्यावरून पडून दुचाकी वरील एका तरूणाचा मृत्यू झाला होता. तर अनेक जण जखमी झाले आहेत. तसेच या पूलांवरून पडून मोठा अपघात होण्याची शक्यता आहे.तानसा, वैतरणा, पिंजाळ या नद्यांवर गेल्या अनेक वर्षापूर्वी पुले बनवली आहेत. या पुलांवर संरक्षक कठडे आहेत.मात्र त्यांची उंची अत्यंत कमी असल्याने येथे अपघात होत आहेत. ते रोखण्यासाठी कठड्यांची उंची वाढवा.- अनंता वनगा, आदिवासी मुक्ती मोर्चा सामाजिक संघटनातानसा नदीवरील पुलाच्या कठड्यावरून पडून एका दुचाकीस्वाराला आपला जीव गमवावा लागला आहे. भविष्यात या पुलांवर मोठे अपघात होऊ शकतात. त्यामुळे संरक्षक कठड्यांची उंची वाढवावी अशी आमची मागणी आहे.- सुरेश भोईर, अध्यक्ष, रिपाई (सेक्युलर), वाडा तालुका

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाVasai Virarवसई विरार