शहरं
Join us  
Trending Stories
1
पालघरची जागा भाजपच्या खात्यात; राजेंद्र गावित यांना झटका, हेमंत सावरा यांना मिळाली उमेदवारी 
2
'पूर्वी देशात दोन संविधान होते, एकानं देश चालायचा अन् दुसऱ्यानं...', PM मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला
3
What a Ball! भुवनेश्वर कुमारने ५ चेंडूंत निकाल लावला, संजू सॅमसनचा त्रिफळा उडवला, Video 
4
विशाल पाटील यांच्यावर खरेच कारवाई होणार का? नाना पटोलेंची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...
5
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
6
सांगलीतील चुरशीच्या लढतीने प्रचार सभांचा धुराळा,  शेवटचे दोन दिवस दिग्गज नेत्यांची प्रचारात उडी
7
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
8
'काँग्रेसचा अजेंडा; पण तुम्ही ना कलम 370, ना CAA...', पीएम मोदींचे काँग्रेसला ओपन चॅलेंज
9
नितीश कुमार रेड्डीने SRH ची लाज वाचवली, ट्रॅव्हिस हेडची बॅट थंड राहिली; RR ची चांगली कामगिरी
10
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
11
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
12
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
13
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
14
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
15
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
16
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
17
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
18
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात
19
ब्रिजभूषण यांचा पत्ता कट; BJP ने त्यांच्या मुलाला दिले तिकीट, रायबरेलीचाही उमेदवार जाहीर
20
रस्त्यावर पाणीच पाणी, वीजपुरवठाही खंडित… मुसळधार पाऊस, वादळी वाऱ्याचा UAEला तडाखा!

हायवेवर अवजड वाहनांचे अवैध पार्र्किं ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2018 11:58 PM

मुंबई-अहमदाबाद राष्टÑीय महामार्गावरील घोडबंदर ते तलासरीच्या अच्छाड पर्यंतचा ११० कि.मी. चा पट्टा दिवसेंदिवस मृत्यूचा सापळा बनत असून हायवेवर फिरणारी मोकाट गुरे

शौकत शेखडहाणू : मुंबई-अहमदाबाद राष्टÑीय महामार्गावरील घोडबंदर ते तलासरीच्या अच्छाड पर्यंतचा ११० कि.मी. चा पट्टा दिवसेंदिवस मृत्यूचा सापळा बनत असून हायवेवर फिरणारी मोकाट गुरे, हायवेच्या कडेला होणारे अवजड वाहनांचे अवैध पार्र्किंग तसेच चारोटी ते मनोर, चारोटी ते अच्छाड पर्यंत विरोधी दिशेने येणारी मोटारसायकल, रिक्षा आदी त्यास कारणीभूत ठरत आहे. ज्या महामार्ग पोलीसांवर येथील वाहतूक सुरळीत व सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी सोपवली आहे. त्यांच्याकडे अपुरे मनुष्यबळ असल्याने सध्या तलासरी ते मनोर पर्यंतच्या हायवेवर अनेक अपघात होत आहे.मुंबई-अहमदाबाद महामार्गाच्या चारोटी, महालक्ष्मी, धनोरी, धुंदलवाडी, आंबोली, ओसरविरा, दापचरी, तलासरी, मेंढवण येथील हायवेच्या कडेला मुंबई तसेच अहमदाबादकडे जाणाºया हायवेवर शेकडो अवजड वाहने अवैधरित्या उभी असतात. शिवाय महामार्गालगत असलेल्या गाव, खेडोपाडयात जाण्यासाठी असलेल्या सर्व्हिस रोडवर अवजड वाहनांची बेकायदेशीर पार्र्किंग होत असल्याने पादचारी तसेच स्थानिक वाहन चालकांची प्रचंड गैरसोय होत आहे. विशेष म्हणजे हायवे तसेच सर्व्हिस रोडला अवजड वाहनचालक वाहन पार्क करून येथील हॉटेल तसेच ढाब्यावर अंघोळ, जेवण तसेच झोप काढण्यासाठी जात असल्याने भरधाव येणाºया वाहनचालकांचे लक्ष या वाहनांकडे न गेल्यास अपघात घडत आहेत. तर मुंबई-अहमदाबाद हायवेच्या दोन्ही बाजूला अनेक गाव, खेड, पाडे आहेत. दिवसभर येथील स्थानिक नागरिक , व्यवसायानिमित्त बाहेर जात असतात. परंतु एका बाजूकडून दुसºया बाजूकडे जाण्यासाठी ओव्हरब्रिज किंवा अनेक कि.मी. पर्यंत रस्ता न ठेवल्याने दिवसभर असंख्य वाहने उलट दिशेने येत असतांना अनेक वेळा अपघात झाल्याच्या घटना घडल्या आहेत. कासा पोलीसांच्या हद्दीतील मेंढवण, मनोरगेट, धुंदलवाडी पर्यंत ३४ कि.मी. ची हद्द असून गेल्या वर्षभरात मुंबई-अहमदाबाद महामार्गावर किरकोळ व गंभीर असे एकूण १२० अपघात झाले असून त्यामध्ये ६२ जणांचा मृत्यू झाला आहे. शिवाय शेकडो जण गंभीर जखमी झाले आहेत.दरम्यान नुकतेच मुंबई-हायवे वरील आंबोली येथे बैल आडवे आल्याने घडलेल्या अपघातात दोन जणांचा बळी गेला. तर मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील चौपदरीकरण तसेच अर्धवट कामे वाहनचालकांच्या जीवावर बेतू लागली आहेत. चारोटी महामार्गाच्या पोलीसांची हद्द मेंढवण ते धुंदलवाडी पर्यंत (३४ कि.मी.) आहे. परंतु त्यांच्याकडे पुरेशा प्रमाणात पोलीस बळ तसेच वाहने नसल्याने अनेक अडचणी येत असतात. असे वाहतूक पोलीसांचे म्हणणे आहे. शिवाय अनेक महिन्यांपासून प्रभारी असून कायमस्वरूपी अधिकारी मिळत नाही अशी तक्रार आहे. मुंबई-अहमदाबाद हायवेवर असंख्य वाहन चालकांकडून वाहतूक नियमाचे उल्लंघन होत असून हायवे, सर्व्हिसरोड तसेच विरोधी दिशेने येणाºया वाहनचालकांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

टॅग्स :Parkingपार्किंग