शहरं
Join us  
Trending Stories
1
'पूर्वी देशात दोन संविधान होते, एकानं देश चालायचा अन् दुसऱ्यानं...', PM मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला
2
What a Ball! भुवनेश्वर कुमारने ५ चेंडूंत निकाल लावला, संजू सॅमसनचा त्रिफळा उडवला, Video 
3
विशाल पाटील यांच्यावर खरेच कारवाई होणार का? नाना पटोलेंची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...
4
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
5
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
6
'काँग्रेसचा अजेंडा; पण तुम्ही ना कलम 370, ना CAA...', पीएम मोदींचे काँग्रेसला ओपन चॅलेंज
7
नितीश कुमार रेड्डीने SRH ची लाज वाचवली, ट्रॅव्हिस हेडची बॅट थंड राहिली; RR ची चांगली कामगिरी
8
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
9
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
10
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
11
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
12
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
13
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
14
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
15
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
16
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात
17
ब्रिजभूषण यांचा पत्ता कट; BJP ने त्यांच्या मुलाला दिले तिकीट, रायबरेलीचाही उमेदवार जाहीर
18
रस्त्यावर पाणीच पाणी, वीजपुरवठाही खंडित… मुसळधार पाऊस, वादळी वाऱ्याचा UAEला तडाखा!
19
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
20
“उत्तर मुंबईकरांचा मिळणारा प्रतिसाद महायुतीच्या महाविजयाची नांदी”; पीयूष गोयल यांना विश्वास

बेरोजगारीचे किती बळी?, शॉक लागून माय - लेकराचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2019 12:53 AM

प्रशासनाने स्थानिक ठिकाणी रोजगार उपलब्ध न केल्याने आदिवासी मजुरांना पोटाची खळगी भरण्यासाठी स्थलांतरित व्हावे लागले आहे.

हुसेन मेमन जव्हार : एकीकडे अवकाळी पावसाने शेती उद्ध्वस्त झाली, त्यामुळे शेतीतील रोजगार नाही तर दुसरीकडे प्रशासनाने स्थानिक ठिकाणी रोजगार उपलब्ध न केल्याने आदिवासी मजुरांना पोटाची खळगी भरण्यासाठी स्थलांतरित व्हावे लागले आहे. यातूनच गेल्या आठवड्यात दीड वर्षाला मुलासह आईचा शॉक लागून मृत्यू झाला. यानिमित्ताने पुन्हा एकदा रोजगार हमीसह इतर आदिवासी योजना शासनाच्या उदासीनतेमुळे अंमलात न आल्याने आदिवासींना रोजगारासाठी किती कष्ट घ्यावे लागतात ते समोर आले आहे.वास्तविक, आदिवासी भागात शेतीचे काम संपताच म्हणजे २ आॅक्टोबर, गांधी जयंतीपासून महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेची कामे सुरू करणे आवश्यक आहे. तसे शासनाचे धोरणही आहे. मात्र, प्रशासनाने येथे कामेच सुरू केलेली नाहीत. त्यातच यंदा अवकाळी पावसाने खरीप हंगाम पुरता वाया गेला आहे. त्यामुळे स्थानिक ठिकाणी शेतीचा रोजगारच उपलब्ध झाला नाही. त्यामुळे शेतमजूर बेरोजगार झाला आहे, तर भूमिहीन शेतकरी उपासमारीच्या खाईत ढकलला गेला आहे. त्यामुळे मजुरांनी पोटाची खळगी भरण्यासाठी स्थलांतर केले आहे. याच स्थलांतराने मोखाड्यातील पळसुंडा येथील विकास वाडीतील माय - लेकरांचा बळी घेतला आहे.विकास वाडीतील काळू, ज्योती हे जोडपे आपल्या दीड वर्षांच्या राघोला घेऊन २०० रूपये रोजाच्या मजुरीसाठी नाशिक जिल्ह्यातील जातेगाव येथे शेतातील कामासाठी स्थलांतर केले. येथे शेतातच झोपडी बांधून हे कुटूंब रहात होते. तेथेच ४ नोव्हेंबर रोजी झोपडीत असलेल्या दीड वर्षांच्या राघोला विजेचा शॉक लागला. त्याला सोडवण्यासाठी ज्योती धावली आणि दोघांनाही शॉक लागल्याने त्यातच या मायलेकांचा दुर्दैवी मृत्यू झाला.मुळात रोजगात हमी, घरकूल योजना, रेशनवर धान्य, विधवांना पगार अशा अनेक योजना आदिवासींसाठी शासन राबवित आहे. मात्र या योजना किती पोकळ आहेत, त्या केवळ कागदावरच कशा राहतात, हे यावरून समोर येते.>या भागातील लोकांना रोजगारासाठी वावण भटकावे लागते. त्यातून अशा दुर्दैवी घटनाही घडत आहेत. यामुळे आजवरच्या लोकप्रतिनिधींनी काय केले, या भानगडीत न पडता या लोकांना स्थानिक पातळीवर पुरेसा रोजगार कसा उपलब्ध होईल, यासाठी प्रयत्न करायचे आहेत. हा स्थलांतराचा डाग पुसण्यासाठी येत्या काळात युद्ध पातळीवर प्रयत्न करणार आहे.- सुनील भुसारा, आमदार, विक्रमगड मतदारसंघ