शहरं
Join us  
Trending Stories
1
शशी थरूर भाजपात जाणार? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
2
Tejasvi Ghosalkar: "उद्धव ठाकरे माझे कुटुंबप्रमुख, मी अजूनही...", बँकेचं संचालकपद मिळाल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांचं स्पष्टीकरण
3
विमान अपघातानंतर ९ दिवसांनी दीपक पठक यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार
4
पत्नीची हत्या करून मृतदेह घराबाहेर पुरला, पोलीस आणि नातेवाईकांना असा दिला चकवा, दोन महिने सांगायचा...  
5
Air India Plane Crash: नव्या पाहुण्याचं स्वागत करण्याआधीच सगळं संपलं; ७ महिन्याची गर्भवती होती जिनल
6
Iran Israel युद्घात अजब चोरी; इस्रायली हॅकर्सनं ८०० कोटींची क्रिप्टोकरन्सी केली नष्ट, प्रकरण काय?
7
Yogini Ekadashi 2025: एखाद्या व्यक्तीने दिलेला शाप योगिनी एकादशी व्रताचरणामुळे होतो दूर!
8
खळबळ उडाली! जीन्स अन् टॉपमध्ये दिसू लागल्या हायफाय भिकारी, लोक १००-२०० रुपये देऊ लागले... 
9
Beed Crime News : बीडमध्ये पैशांसाठी अपहरण, मुलासाठी ५० हजार रुपयांची मागणी; नेमकं प्रकरण काय?
10
चीन-पाकिस्तानचं वाढणार टेन्शन; भारताला लवकरच मिळणार हायटेक्निक मिसाईल, कसं करणार काम?
11
हास्यास्पद! पाऊस पडतोय म्हणून नाही आणले...; एअर इंडियाची दोन विमाने लगेज न घेताच आली
12
"इराण भारताचा जुना मित्र, दुसरीकडे इस्त्रायल..."; मध्य पूर्वेतील युद्धावर सोनिया गांधी स्पष्ट बोलल्या
13
Air India :'या' तीन कर्मचाऱ्यांना तात्काळ बडतर्फ करा'; अहमदाबाद विमान अपघातानंतर एअर इंडियाला डीजीसीएचे आदेश
14
"संपूर्ण युक्रेन आमचा..."; पुतिन यांनी झेलेन्स्की यांच्या संपूर्ण देशावरच ठोकला दावा! मिळालं असं उत्तर
15
ऑफिसला न जाताच कर्मचाऱ्याला मिळाले २६ लाख रुपये; कोर्टाने दिला मोठा निर्णय
16
"मी इनसाइडर असते तर बरं झालं असतं", इंडस्ट्रीतील स्ट्रगलवर लोकप्रिय अभिनेत्रीची क्रिप्टिक पोस्ट
17
"गोयंकाजी पाहताय ना?’’, इंग्लंडमध्ये पंतच्या फटकेबाजीनंतर फॅन्सनी घेतली लखनौच्या मालकांची शाळा  
18
हनीमुनचा प्लॅन, रसगुल्लामध्ये विष भरले अन्...; बेवफा सोनमपेक्षाही खतरनाक आहे खूनी 'मुस्कान'
19
NSE चा IPO कधी येणार? सेबीचे अध्यक्ष म्हणाले, "आयपीओ आणण्यात कोणताही अडथळा..."
20
Air India Plane Crash: "१४ वर्षांनी घरी लक्ष्मी जन्मली अन् विमान दुर्घटनेत दुर्दैवाने तिलाच गमावले..."

गोरगरिबांची घरे राहिली अर्धवट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2018 00:30 IST

टप्प्यांमध्ये मिळणारे अनुदान उशिराने मिळत असल्याने गत चार वर्षांपासूनच्या योजना रेंगाळल्या आहेत.

संजय नेवे।विक्रमगड : गोर गरिबांना हक्काचे घर मिळावे म्हणून घरकुल योजना अमलात आली असली तरी कागदोपत्री अडथळे आणि अनियमित हप्त्यांमुळे तालुक्यातील अनेकांची घरे अर्धवट आहेत. टप्प्यांमध्ये मिळणारे अनुदान उशिराने मिळत असल्याने गत चार वर्षांपासूनच्या योजना रेंगाळल्या आहेत. २०१५ पासून उपलब्ध आकडेवारीमध्ये आतापर्यंत कोणत्याही वर्षी ही योजना पुर्णत्वास जाताना दिसत नाही. ग्रामीण भागातील द्रारिदय रेषेखालील अनुसुचित जाती जमातीच्या व्यक्तींना तसेच इतर प्रवर्गातील गरीब व्यक्तींचे घराचे स्वप्न पूर्ण व्हावे यासाठी केंद्र सरकारने प्रधानमंत्री आवाज योजना सुरू केली आहे.तसेच, राज्य शासनाची घरकूल योजना सुरू असून या योजने अंतर्गत तालुक्यात वर्ष २०१५-२०१६ या काळामध्ये २१७३ घरकुलाना मंजूरी मिळाली होती. त्यानुसार प्रधानमंत्री आवास योजनेतून १ लाख २० हजार रूपयाचे अनुदान देण्यात येते. तर, इंदिरा गाधी आवास योजनेतून ९५००० हजारचे अनुदान दिले जाते. त्यातील १९८५ घरकुलांचे काम पुर्ण झाले असून १८८ घरकुलांचे काम अपूर्ण आहे.आज ही घरकुले २०१५-२०१६ पासून १०० टक्के पूर्ण झालेली नाहीत. त्यात लाभार्थ्यांनी पूर्ण केली नाहीत किंवा शासकीय दिरगाई मुळे ती पूर्ण होऊ शकली नाही. याचा शोध घेणे जरूरीचे आहे. या आदिवासीभागात द्रारिदय रेषेखालील लाभार्थ्यांना घर पुर्ण करून घेणे गरजेचे आहे. या साठी वेळीत अनुदान मिळावे अशी मागणी लाभार्थ्यांनी केली आहे.२०१७-१८मध्ये एकही घरकुल पूर्ण नाहीआर्थिक वर्ष २०१६-२०१७ या काळामध्ये ८०९ घरकुलां पैकी फक्त १४३ घरांचे बांधकाम पुर्ण झाले आहे. २०१७-२०१८ या वर्षी ३१० घरकुलापैकी अजून एकही घरकुले पूर्ण झालेली नाही. ती का झाली नाहीत याबाबत चौकशी केली असता घरकुलाचे पैसे वेळेवर मिळत नाही अशी माहिती उपलब्ध झाली.या लाभार्थीना वेळेवर अनुदान मिळत नाहीत. त्यामुळे घरकुले वेळेत बांधता येत नाहीत. तसेच, पूर्णत्वाचा दाखलाही वेळेवर मिळत नाही. त्यामुळे लाभार्थी हैराण होतो. यासाठी वेळेत अनुदान मिळावे अशी मागणी माकपचे किरण गहला यांनी लोकमतशी बोलताना केली आहे.अर्धवट राहीलेली ही घरे रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून पुर्ण केली जाणार आहेत. त्यासाठी अतिरिक्त १७,२०० रूपये लेंबर मजूरी देऊन ती पुर्ण होणार आहेत.- बाबासाहेबगायकवाड,प्रकल्प अधिकारी(पं. स. विक्रमगड)

टॅग्स :Homeघर