शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने भारताची भीती घेतली! पीओकेमधील हॉटेल्स अन् गेस्ट हाऊसमध्ये सैन्य; मदरसे बंद
2
पाकिस्तानने अटारी, वाघा बॉर्डरचे गेट उघडले; धास्ती एवढी की पाकिस्तानींनाही घेत नव्हते...
3
श्रीराम दर्शनाची ओढ लागली, ३०० वर्षे जुनी परंपरा मोडली; हनुमानगढीचे महंत मंदिराबाहेर पडले!
4
बजाज चेतकला एप्रिल फूल बनविले; टीव्हीएस पहिल्यांदाच नंबर १, विक्रीत ओला कुठे...
5
पाकिस्तानी हवाई क्षेत्र बंद; एअर इंडियाल 5000 कोटी रुपयांचा फटका बसण्याचा अंदाज...
6
दारूच्या व्यसनाने आई आणि चुलतीचा खून; बीड जिल्हा दोन हत्येच्या घटनांनी हादरला
7
पंकजा मुंडेंना कॉल अन् पाठवला अश्लील मेसेज, पुण्यातील तरुणाला पोलिसांनी केली अटक
8
CEOs चा १ तासाचा पगार सामान्य कर्मचाऱ्याच्या वर्षाच्या पगाराइतका, एका रिपोर्टमध्ये झाले अनेक आश्चर्यकारक खुलासे
9
अन्न पुन्हा गरम करणं आरोग्यासाठी ठरतंय घातक; 'या' ५ गोष्टी टाळाल तरच ठणठणीत राहाल
10
 संतापजनक! मासिक पाळीत स्वयंपाक करणं महिलेच्या जीवावर बेतलं,नणंद आणि सासूने खून केल्याचा आरोप, दोन मुलं अनाथ
11
नवी मुंबईत ठाकरे गटाला खिंडार! माजी नगरसेवकांचे उद्धवसेनेला जय महाराष्ट्र, शिंदेसेनेत प्रवेश
12
"मॅडम येत आहेत, त्यांना..."; पोलीस असल्याचं सांगून दुकानात घुसले अन् २ लाखांचे दागिने चोरले
13
ISI कडून मिळाले आदेश, बेताब खोऱ्यात लपवली शस्त्रे; NIA च्या अहवालात धक्कादायक खुलासा
14
संजय राऊतांनी PM मोदींच्या नेतृत्वक्षमतेवर घेतली शंका; म्हणाले, “शाह यांचा राजीनामा का घेत नाही”
15
काश्मीरात सर्च ऑपरेशन सुरूच, आतापर्यत ३००० जण ताब्यात; जंगलात लपलेत पहलगाम हल्ल्याचे दहशतवादी
16
चिनी कर्मचाऱ्यांना पगारही मिळत नाहीये, ट्रम्प टॅरिफमुळे कारखाने होताहेत बंद; कामगार उतरले रस्त्यावर
17
हॉटेलमधील 'तो' पदार्थ खाणं पडलं महागात! निक्की तांबोळीला ICU मध्ये केलं दाखल, आता कशी आहे अभिनेत्रीची तब्येत?
18
"हा, आम्ही दहशतवादी पोसले पण आता..."; संरक्षण मंत्र्यानंतर बिलावल भुट्टोनेही दिली कबुली
19
Nashik Hit and Run: भावासमोरच जयश्रीने सोडला जीव, नाशिकमध्ये पिकअपने तीन वाहनांना उडवले
20
Ganga Saptami 2025: गंगा सप्तमीला 'हे' उपाय केले असता घरात येईल सुख समृद्धी!

गोरगरिबांची घरे राहिली अर्धवट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2018 00:30 IST

टप्प्यांमध्ये मिळणारे अनुदान उशिराने मिळत असल्याने गत चार वर्षांपासूनच्या योजना रेंगाळल्या आहेत.

संजय नेवे।विक्रमगड : गोर गरिबांना हक्काचे घर मिळावे म्हणून घरकुल योजना अमलात आली असली तरी कागदोपत्री अडथळे आणि अनियमित हप्त्यांमुळे तालुक्यातील अनेकांची घरे अर्धवट आहेत. टप्प्यांमध्ये मिळणारे अनुदान उशिराने मिळत असल्याने गत चार वर्षांपासूनच्या योजना रेंगाळल्या आहेत. २०१५ पासून उपलब्ध आकडेवारीमध्ये आतापर्यंत कोणत्याही वर्षी ही योजना पुर्णत्वास जाताना दिसत नाही. ग्रामीण भागातील द्रारिदय रेषेखालील अनुसुचित जाती जमातीच्या व्यक्तींना तसेच इतर प्रवर्गातील गरीब व्यक्तींचे घराचे स्वप्न पूर्ण व्हावे यासाठी केंद्र सरकारने प्रधानमंत्री आवाज योजना सुरू केली आहे.तसेच, राज्य शासनाची घरकूल योजना सुरू असून या योजने अंतर्गत तालुक्यात वर्ष २०१५-२०१६ या काळामध्ये २१७३ घरकुलाना मंजूरी मिळाली होती. त्यानुसार प्रधानमंत्री आवास योजनेतून १ लाख २० हजार रूपयाचे अनुदान देण्यात येते. तर, इंदिरा गाधी आवास योजनेतून ९५००० हजारचे अनुदान दिले जाते. त्यातील १९८५ घरकुलांचे काम पुर्ण झाले असून १८८ घरकुलांचे काम अपूर्ण आहे.आज ही घरकुले २०१५-२०१६ पासून १०० टक्के पूर्ण झालेली नाहीत. त्यात लाभार्थ्यांनी पूर्ण केली नाहीत किंवा शासकीय दिरगाई मुळे ती पूर्ण होऊ शकली नाही. याचा शोध घेणे जरूरीचे आहे. या आदिवासीभागात द्रारिदय रेषेखालील लाभार्थ्यांना घर पुर्ण करून घेणे गरजेचे आहे. या साठी वेळीत अनुदान मिळावे अशी मागणी लाभार्थ्यांनी केली आहे.२०१७-१८मध्ये एकही घरकुल पूर्ण नाहीआर्थिक वर्ष २०१६-२०१७ या काळामध्ये ८०९ घरकुलां पैकी फक्त १४३ घरांचे बांधकाम पुर्ण झाले आहे. २०१७-२०१८ या वर्षी ३१० घरकुलापैकी अजून एकही घरकुले पूर्ण झालेली नाही. ती का झाली नाहीत याबाबत चौकशी केली असता घरकुलाचे पैसे वेळेवर मिळत नाही अशी माहिती उपलब्ध झाली.या लाभार्थीना वेळेवर अनुदान मिळत नाहीत. त्यामुळे घरकुले वेळेत बांधता येत नाहीत. तसेच, पूर्णत्वाचा दाखलाही वेळेवर मिळत नाही. त्यामुळे लाभार्थी हैराण होतो. यासाठी वेळेत अनुदान मिळावे अशी मागणी माकपचे किरण गहला यांनी लोकमतशी बोलताना केली आहे.अर्धवट राहीलेली ही घरे रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून पुर्ण केली जाणार आहेत. त्यासाठी अतिरिक्त १७,२०० रूपये लेंबर मजूरी देऊन ती पुर्ण होणार आहेत.- बाबासाहेबगायकवाड,प्रकल्प अधिकारी(पं. स. विक्रमगड)

टॅग्स :Homeघर