शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

शिक्षक दिन : समाजातील मानाचे स्थान शिक्षकांच्या संस्कारांमुळेच

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2019 00:17 IST

आयटी क्षेत्र ते भारतीय प्रशासकीय सेवा असा प्रवास करणारे स. जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांना घडवणारे शिक्षक कोण?

डहाणू/बोर्डी : भौतिकशास्त्राच्या शिक्षकाचे प्रभावी व्यक्तिमत्व आणि अध्यापन शैलीमुळे ते आवडू लागले. त्यामुळेच पुढे या विषयाची गोडी निर्माण होऊन आयटी क्षेत्राकडे ओढलो गेलो. तेथे गणित हा विषय आवडू लागला. त्यानंतर इंडियन सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये भवितव्य घडविण्याच्या स्वप्नांची बीजे रोवली गेली. हा अभ्यासक्रम पूर्ण करून आयएएस परीक्षेची तयारी केली. त्यामध्ये यश मिळाले. आज समाजात आणि माझ्या शाळेत मला मानाचे स्थान मिळाले आहे. त्याचे एकमेव कारण म्हणजेच शिक्षकांनी दिलेली शिकवण हेच आहे, असे डहाणूचे प्रांत अधिकारी सौरभ कटियार यांना वाटते. एका सामान्य घरातून आयएएस होण्याचं स्वप्न साकारलं ते केवळ शिक्षकांमुळेच!उच्च शिक्षणाचे सर्व श्रेय शिक्षकांचेचलखनौ येथे शालेय तर कानपूरला आयटी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. अभ्यासाव्यतिरिक्त राबविल्या जाणाऱ्या उपक्र मांमध्ये सहभाग घेऊन अष्टपैलू व्यक्तिमत्त्व घडले जाते. त्यामुळेच विविध आव्हानं सक्षमपणे पेलली जाऊ शकतात, ही महत्त्वपूर्ण शिकवण महाविद्यालयातील शिक्षकांमुळे आत्मसात करता आली. तर घरापासून लांब वसतिगृहातील अनुभव हा खºयाअर्थी जीवनानुभव ठरला.मी लखनौ पब्लिक स्कूल मधून पहिली ते बारावी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. शालेय जीवनात मला सलब नावाच्या शिक्षकांनी प्रभावित केले. त्यांचे व्यक्तिमत्त्व आणि अध्यापनाची पद्धत खूपच वेगळी होती. भौतिकशास्त्रासारखा कठीण विषय त्यामुळे आवडू लागला. ही केवळ माझी एकट्याची नव्हे तर सहअध्यायी असलेल्यांचीही भावना होती. विद्यार्थ्यांनी जास्तीत-जास्त प्रश्न विचारले पाहिजेत, त्यांचे निरसन करण्याकरिता शाळा सुटल्यानंतरचा वेळही ते विद्यार्थ्यांना द्यायचे.अनौपचारिक शिक्षणाच्या ज्ञानातून केले समृद्धपाठ्यपुस्तकातील विषयांसह जीवनातील विविध प्रसंगातून त्यांनी अनौपचारिक शिक्षणाचे ज्ञान देऊन समृद्ध केले. शाळेत शिक्षकांबरोबर असणारे संबंध आणि कॉलेज जीवनातील वातावरणात जाणवणारा मोकळेपणा या संवादातून आज प्रत्यक्ष काम करताना जी गुंतागुंतीची गणिते उभी राहतात, त्यांची सोडवणूक करताना ती शिदोरी उपयोगी ठरते आहे. विद्यार्थ्यांनी केवळ अभ्यास एके अभ्यास असे न वागता सर्व उपक्र मात सहभागी होण्याचे महत्त्व ते अधोरेखित करतात.वसतीगृहात शिकत असताना तेथे दिले जाणारे जेवण निकृष्ट दर्जाचे होते. यावेळी विद्यार्थ्यांनी एकत्रित येऊन याविरु द्ध आवाज उठविण्याचे ठरविले. त्यानंतर कॉलेजात मोर्चा काढण्याचे ठरविले. अन्य विद्यार्थ्यांसह त्यामध्ये सहभागी झालो. त्याची दखल कॉलेज प्रशासनाने घेतली आणि आमची मागणी पूर्ण झाल्यानंतर चांगल्या दर्जाचे जेवण मिळू लागले. सर्वसामान्य घरातून आलेल्या सौरभ यांनी २०१६ मध्ये प्रशासकीय सेवेत यश संपादन केले, त्यात कुटुंबियांप्रमाणेच शिक्षकांचा मोठा वाटा आहे. आजही जेव्हा वेळ मिळतो तेव्हा शाळेत जाऊन शिक्षकांना भेटतो. ते क्षण खूप आनंदी असतात. आज मृदुल सर हयात नाहीत, त्यांच्या आठवणीने डोळे पाणावतात. या सर्वांच्या आठवणींशिवाय आयुष्याचे वर्तुळ पूर्णत्वास येऊ शकत नाही.

कॉलेजात मागण्यांकरिता काढला होता मोर्चा

टॅग्स :Vasai Virarवसई विरारEducationशिक्षणTeacherशिक्षकTeachers Dayशिक्षक दिन