शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काका-काकूंचे घर! ऐन मतदानाच्या दिवशीच अजित पवारांच्या घरी का गेला? सुप्रिया सुळेंनी सांगितले कारण
2
'माझ्याविरोधात कुणी तक्रार दिली तर...'; शिवीगाळ केल्याच्या व्हिडीओवरुन दत्ता भरणेंचा इशारा
3
“ठाकरे पिता-पुत्राला जेलमध्ये पाठवण्याची तयारी संजय राऊत करतायत”; शिंदे गटाचा दावा
4
काँग्रेसला सोडचिठ्ठी दिलेल्या राधिका खेडा, अभिनेता शेखर सुमन यांचा भाजपत प्रवेश
5
“संभ्रम निर्माण करण्यासाठी ही भेट आहे का?”; अमोल मिटकरींचा सुप्रिया सुळेंना थेट सवाल
6
Gold Silver Price: अक्षय तृतीयेपूर्वी घसरले सोन्याचे दर; आज 'इतकं' स्वस्त झालं १० ग्राम Gold 
7
दत्ता भरणेंच्या अडचणीत वाढ; सुप्रिया सुळेंकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार!
8
Baramati Lok Sabha Election 2024 : 'अजित पवार शब्दांचा पक्का, शब्द राखेल अशी आशा'; मिशी काढण्यावरून श्रीनिवास पवारांनी पुन्हा डिवचलं
9
धकधक करने लगा! अंकिताने केला माधुरीसारखाच हुबेहुब लूक, युझर्स म्हणाले, 'प्रयत्नही करु नको'
10
ज्या Naresh Goyal यांना मिळाला जामीन, एकेकाळी होता त्यांचा बोलबाला; होते देशातील १६वे श्रीमंत 
11
"वातावरण खूप चांगले आहे, आम्ही २५-२६ जागा जिंकू", मतदानानंतर बीएस येडियुरप्पांचा दावा
12
"हॅलो! मी CBI अधिकारी बोलतोय, तुमचा मुलगा..."; स्कॅमर्स 'असं' अडकवतात जाळ्यात
13
मुस्लिमांना पूर्ण आरक्षण मिळायलाच हवे; लालू प्रसाद यादव यांचं मोठं विधान
14
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात दुपारी १ वाजेपर्यंत ३१.५५ टक्के मतदान
15
“आमच्यासोबत होते म्हणून १८ जागा आल्या, आता काहीच येणार नाही”; भाजपाची ठाकरे गटावर टीका
16
किती कमाई होते?; अयोध्येत कपाळाला टिळा लावणाऱ्या पोराचं उत्तर ऐकून व्हाल हैराण
17
Video - "आमचा उमेदवार चोरीला गेला..."; माजी मंत्र्यांनी जनतेला केलं 'हे' आवाहन
18
बारामतीत नवा ट्विस्ट..! ऐन मतदानाच्या दिवशी सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी दाखल
19
मतदानादरम्यान किरण सामंत नॉट रिचेबल, कार्यकर्ते संभ्रमात, रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये मोठा ट्विस्ट
20
"मराठी 'not welcome' म्हणणाऱ्यांना मत देऊ नका", गुजराती HRच्या पोस्टनंतर रेणुका शहाणेंचं ट्वीट

हितेंद्र ठाकूरांना तुरुंगात डांबू -मुख्यमंत्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2019 12:39 AM

वसईतील घोटाळ्यांची एसआयटी चौकशी; विरारच्या प्रचारसभेत फडणवीसांचा ह्ल्लाबोल

वसई : वसई विरार मधील घोटाळ्यांची विशेष तपास पथकामार्फत चौकशी करून वसईचे आमदार हितेंद्र ठाकूर यांना तुरु ंगात पाठवले जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. पालघर लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजप महायुतीचे उमेदवार राजेंद्र गावित यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री सोमवारी विरार मध्ये आले होते. यावेळी त्यांनी सत्ताधारी बहुजन विकास आघाडीच्या कारभारावर जोरदार टीका केली.पालघर लोकसभा मतदारसंघातील प्रचार ऐन रंगात आला असून सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरारच्या मनवेल पाडा येथे जाहीर सभा घेतली. मागील वर्षी झालेल्या पोटनिवडणुकीत मुख्यमंत्र्यांनी वसईचे आमदार हितेंद्र ठाकूर यांची खालच्या पातळीवर टीका केली होती. त्यामुळे यंदा काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष होते. आपल्या अर्ध्या तासांच्या भाषणाची सुरवात फडणवीस यांनी वसईचे आमदार हितेंद्र ठाकूर यांच्यावर नाव न घेता केली. मी सक्तवसुली संचलनालयाच्या (ईडी) चौकशीला तसेच तुरूंगात जायलाही घाबरत नाही असे ठाकूर यांनी सांगितले होते. त्याचा संदर्भ देत तुमची वेळ आली की तुम्हाला तुरुंगात पाठवू, कोठडीत पुष्कळ जागा आहे असे ते म्हणाले.वसई विरार मधील बांधकाम व्यावासयिकांकडून घेतला जाणारा फंड हा झोलझाल फंड आहे, अशी टीका त्यांनी केली. वसईत लाखो अधिकृत घरांना मंजुरी दिली असून यापुढे कुणालाही झोलझाल फंड देण्याची गरज नाही, असे ते म्हणाले. वसई विरार मधील सर्व घोटाळ्यांची चौकशी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करून केली जाईल अशी घोषणा त्यांनी केली. वसई विरार मध्ये नळजोडणीसाठीही भ्रष्टाचार केला जात आहे. त्यामुळे आचारसंहिता संपल्यावर सर्व नळजोडणी प्रक्रि या आॅनलाईन केली जाणार असल्याची घोषणा त्यांनी केली. वसईतील गावे वगळ्याबाबत न्यायालयात सरकारतर्फे प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आले आहे. हा मुद्दा न्यायालयात प्रलंबित आहे. मात्र याबाबतीत जे वसईकरांचं मत आहे, तेच सरकारचं मत आहे, असे ते म्हणाले. आपल्या भाषणात फडणवीस यांनी मोदी सरकारने केलेल्या विकास कामांचा आढावा घेतला. ५६ पक्षांच्या आघाडीवर महाखिचडी अशी टीका केली. भाजप हा देशप्रेमींचा पक्ष आहे तर ५६ पक्षांची आघाडी महाखिचडीचे सरकार आहे असे सांगितले.निवडणूकीनंतर नळ कनेक्शन करणार आॅनलाईनपोटनिवडणुकीत सेना भाजपा एकत्र नव्हती त्यावेळीही पालघर मधील लोकांनी शिवसेना आणि बिजेपीमध्ये मतदान करून बविआला तिसऱ्या स्थानावर पाठवले होते. यावेळच्या निवडणुकीत वाघ आणि सिंह एकत्र आल्यानंतर कोल्हे आणि लांडगे एकत्र आले तरी आता पालघरची लढाई विरोधक जिंकू शकत नाही. त्यांची निशाणी शिट्टी होती त्यांची निशाणीच आता गुल झाली आहे.आता या लोकांना जागा दाखवायची वेळ आली असल्याने त्यांना त्याची जागा दाखवा असे मुख्यमंत्र्यांनी आवाहन केले आहे. देश स्वतंत्र झाला पण वसई विरार मधील लोकांना स्वातंत्र्य नाही, त्यांना जखडून ठेवले आहे, त्यामुळे ही लढाई देशाची नसून वसई विरारच्या मुक्तीची लढाई आहे. येथील प्रत्येक झोलझाल योजनेचा योग्य ती चौकशी करून त्यांची पोलखोल करू असे सांगितले.जेलमध्ये भरपूर जागा असून ते दोषी आढळले तर त्यांच्यावर योग्य ती कारवाई करून त्यांची रवानगी जेलमध्ये करण्यात येईल. पाण्यासाठी पैसे मागितले जातात यामुळे पाण्याचे कनेक्शन आॅनलाइन केले जाणार आहे. निवडणूक झाल्यानंतर आचारसंहिता संपल्यावर तशी आॅर्डर काढली जाणार असल्याचे सांगितले. २९ गावे वगळण्यासाठी नक्कीच मदत करणार असेही शेवटी सांगितले.होय मी गुंड आहे -हितेंद्र ठाकूरनालासोपारा : शनिवारी कासा, वाणगाव, मनोर याठिकाणी प्रचार सभेच्या दरम्यान बविआचे अध्यक्ष आणि आमदार हितेंद्र ठाकूर यांनी उघडपणे मी गुंड आहे, असे विधान केले असून उद्धव ठाकरे यांनी वसईमधील गुंडगिरी मोडण्याचे सांगितले असेल तर मी षंढ नसून गुंडा आहे असे म्हटल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर दोन दिवस फिरत असून तसेच मी ईडीला घाबरत नसून मी काही शिवसेना आणि उद्धव ठाकरे नाही असेही प्रत्येक ठिकाणी ते सांगत होते.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019palghar-pcपालघरDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसHitendra Thakurहितेंद्र ठाकूर