शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

पीक विम्यासाठी शेतकऱ्यांचे शासकीय कार्यालयात हेलपाटे

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2019 00:21 IST

अवकाळी पावसाने भात उत्पादक शेतकऱ्यांचे होत्याचे नव्हते करुन टाकले आहे.

वाडा : अवकाळी पावसाने भात उत्पादक शेतकऱ्यांचे होत्याचे नव्हते करुन टाकले आहे. नुकसानीचे पंचनामेही झाले, मात्र नुकसानभरपाईबाबत शासन पातळीवर काहीच हालचाली दिसून येत नसल्याने शेतकरी पीक विम्याची रक्कम तरी मिळावी यासाठी शासनाच्या कृषी कार्यालयात, तहसीलदार आणि कर्ज घेतलेल्या बँकेच्या अधिका-यांकडे हेलपाटे मारत असताना दिसून येत आहेत.वाडा तालुक्यातील शेतकºयांचे भात हे एकमेव पीकअसून ते निसर्गावरच अवलंबून आहे. गतवर्षी येथील शेतकºयांना दुष्काळाला तोंड द्यावे लागले होते. तर यावर्षी शेतकरी ओल्या दुष्काळात भरडला गेला आहे. नुकसानीचे पंचनामे झालेले असले तरी मदतीबाबत कुठलीच माहिती शेतकºयांना मिळत नसल्याने शेतकरी साशंक झाला आहे. गेल्या वर्षी मोठ्या प्रमाणावर नुकसान होऊनही नाही सरकारची मदत मिळाली, नाही विमा कंपनीकडून विम्याची रक्कम मिळाली. त्यामुळे यंदाही भरपाईपासून वंचित रहावे लागते की काय, अशी भीती शेतकºयांना भेडसावते आहे.वाडा तालुक्यातील ५६४७ शेतकºयांनी न्यू इंडिया इन्शुरन्स या कंपनीकडून विमा काढला आहे. तर काही शेतकºयांनी सेवा सहकारी संस्थाकडून कर्ज घेतानाच विम्याची रक्कम भरलेली आहे. नुकसान भरपाईबाबत शासन आणि प्रशासन पातळीवर काहीच हालचाली दिसून येत नाहीत. भरपाई मिळण्यासाठी शेतक-यांनी कुठले कागदपत्र, पुरावे कुठे सादर करावेत याबाबत माहिती मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल झालेले आहेत.भरपाई संदर्भात कुठल्याच शासकीय कार्यालयात स्वतंत्र कक्ष सुरु करण्यात आला नसल्याने शेतकरी आता नुकसान झालेल्या भातपिकाचे फोटो, जमिनीचे सातबाराचे उतारे, विमा भरल्याची पावती तसेच अन्य पुराव्याचे कागदपत्र घेऊन तालुका कृषी अधिकारी कार्यालय, तलाठी कार्यालय, तहसीलदार कार्यालयाचे उंबरठे झिजवितांना दिसून येत आहेत.वाडा तालुक्यातील २१ हजार ६५० बाधित शेतकरी असून त्याचे एकूण १० हजार ३० हेक्टर क्षेत्रावरील भात पिकाचे ८० ते ९० टक्के नुकसान झालेले आहे. अलिकडेच (१६ नोव्हेंबर) राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी खरीप पिकासाठी प्रती हेक्टरी आठ हजार तर फळबागासाठी १८ हजार रुपये प्रति हेक्टर मदत जाहीर केली आहे. मात्र, ही मदत अत्यंत तुटपुंजी असल्याचे सांगत, शेतकºयांनी नाराजी व्यक्त केली आहे.ही मदत दोन हेक्टरपर्यंतच दिली जाणार आहे. राज्यपालांच्या निर्णयानुसार शेतकºयांना फक्त एकरी ३२०० रुपये नुकसानभरपाई म्हणजे शेतकºयांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे हे काम आहे, अशी तिखट प्रतिक्रि या येथील शेतकरी नेते तथा कुणबीसेना प्रमुख विश्वनाथ पाटील यांनी व्यक्त केली आहे.वाडा तालुक्यात खरीप पिकाचा विमा घेतलेल्या शेतकºयांची संख्या जास्त असल्याने येथे विमा कंपनीचे दोन स्वतंत्र्य अधिकाºयांची नेमणूक केली आहे.-प्रवीण गवांदे, उपविभागीयकृषि अधिकारी, वाडाखरीप पिकाचा विमा काढताना आॅन लाईन सातबारा व अन्य कागदपत्र दिलेले असतानाही पुन्हा-पुन्हा वेगवेगळे कागदपत्र व नुकसानीचे पुरावे मागितले जात आहेत.- नारायण परशुराम पाटील,शेतकरी, पीक, ता.वाडा

टॅग्स :FarmerशेतकरीCrop Insuranceपीक विमाpalgharपालघर