शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरून जाताय? आज तातडीचा विशेष ब्लॉक, एक तासासाठी वाहतूक राहणार बंद 
2
IND vs PAK सामन्यानंतर हस्तांदोलन न करण्यावर अखेर BCCI ने सोडलं मौन, काय म्हणाले?
3
Akola: रेल्वेतून उतरताना घसरला आणि मृत्यूच्या जबड्यातच अडकला; मूर्तिजापूर रेल्वे स्थानकावर थरकाप उडवणारी घटना
4
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडणार?; राज्य निवडणूक आयोगाचा सुप्रीम कोर्टात अर्ज
5
विश्वासघातकी मैत्रिण! कॉल करून भेटायला बोलावलं अन् खोलीत डांबलं; शाळकरी मुलीसोबत नको ते घडलं...
6
नेपाळनंतर आता आणखी एका देशात सत्तांतर?; भारताच्या मित्र देशात सैन्य अलर्टवर, लोक रस्त्यावर उतरले
7
पब्लिक टॉयलेटमधील हँड ड्रायर बिघडवताहेत आरोग्य; आजारांना आमंत्रण, कोणाला जास्त धोका?
8
धनंजय मुंडेंनी माफी मागावी! ‘वंजारा-बंजारा एकच’ वक्तव्यावरून बंजारा समाज आक्रमक
9
Video: बुडत्याला काडीचा आधार! कुणी खांबावर चढून, तर कुणी झाडाच्या फांदीला लटकून वाचवला जीव...
10
बँकांमध्ये बदलल्या जातात कापलेल्या-फाटलेल्या नोटा, परंतु 'या'साठी मिळू शकतो नकार; काय आहे RBI चा नियम?
11
Robin Uthappa: माजी क्रिकेटपटू रॉबिन उथप्पाला ईडीचे समन्स, ऑनलाइन बेटिंग प्रकरणात चौकशी!
12
९० लाख रोख अन् १ कोटीचे सोन्याचे दागिने... महिला अधिकाऱ्याच्या घरी सापडलं कोट्यवधींचं घबाड
13
IPO News: १८ सप्टेंबरला उघडणार 'या' कंपनीचा ५६०.२९ कोटी रुपयांचा IPO; काय आहेत डिटेल्स?
14
अंत्ययात्रा काढली, चितेवर ठेवलं, पण मुखाग्नी देणार तोच जिवंत झाली महिला, आता अशी आहे प्रकृती
15
इंदिरा एकादशी २०२५: पितरांना मोक्ष देणारी इंदिरा एकादशी; तुळशीचा 'असा' वापर आठवणीने टाळा
16
'श्रीयुत गंगाधर टिपरे' मालिकेचा इंटरेस्टिंग किस्सा, आबांच्या भूमिकेतील दिलीप प्रभावळकर म्हणाले...
17
"आम्ही इन्कम टॅक्सकडून आलोय…’’, सांगलीत वॉरंट दाखवत डॉक्टरच्या घरातील कोट्यवधीचा ऐवज लुटला 
18
"हा तर 'पोपटवाडी' संघ..."; IND vs PAK सामन्यानंतर सुनील गावसकरांनी उडवली पाकिस्तानची खिल्ली
19
एक घर अन् ४२७१ मतदार! निवडणूक तोंडावर अन् AIने केली पोलखोल; कुठे घडला हा प्रकार?
20
निसर्गाचा प्रकोप! डेहरादूनमध्ये ढगफुटीमुळे विध्वंस; सहस्त्रधारा, तपकेश्वरचे धडकी भरवणारे Video

पीक विम्यासाठी शेतकऱ्यांचे शासकीय कार्यालयात हेलपाटे

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2019 00:21 IST

अवकाळी पावसाने भात उत्पादक शेतकऱ्यांचे होत्याचे नव्हते करुन टाकले आहे.

वाडा : अवकाळी पावसाने भात उत्पादक शेतकऱ्यांचे होत्याचे नव्हते करुन टाकले आहे. नुकसानीचे पंचनामेही झाले, मात्र नुकसानभरपाईबाबत शासन पातळीवर काहीच हालचाली दिसून येत नसल्याने शेतकरी पीक विम्याची रक्कम तरी मिळावी यासाठी शासनाच्या कृषी कार्यालयात, तहसीलदार आणि कर्ज घेतलेल्या बँकेच्या अधिका-यांकडे हेलपाटे मारत असताना दिसून येत आहेत.वाडा तालुक्यातील शेतकºयांचे भात हे एकमेव पीकअसून ते निसर्गावरच अवलंबून आहे. गतवर्षी येथील शेतकºयांना दुष्काळाला तोंड द्यावे लागले होते. तर यावर्षी शेतकरी ओल्या दुष्काळात भरडला गेला आहे. नुकसानीचे पंचनामे झालेले असले तरी मदतीबाबत कुठलीच माहिती शेतकºयांना मिळत नसल्याने शेतकरी साशंक झाला आहे. गेल्या वर्षी मोठ्या प्रमाणावर नुकसान होऊनही नाही सरकारची मदत मिळाली, नाही विमा कंपनीकडून विम्याची रक्कम मिळाली. त्यामुळे यंदाही भरपाईपासून वंचित रहावे लागते की काय, अशी भीती शेतकºयांना भेडसावते आहे.वाडा तालुक्यातील ५६४७ शेतकºयांनी न्यू इंडिया इन्शुरन्स या कंपनीकडून विमा काढला आहे. तर काही शेतकºयांनी सेवा सहकारी संस्थाकडून कर्ज घेतानाच विम्याची रक्कम भरलेली आहे. नुकसान भरपाईबाबत शासन आणि प्रशासन पातळीवर काहीच हालचाली दिसून येत नाहीत. भरपाई मिळण्यासाठी शेतक-यांनी कुठले कागदपत्र, पुरावे कुठे सादर करावेत याबाबत माहिती मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल झालेले आहेत.भरपाई संदर्भात कुठल्याच शासकीय कार्यालयात स्वतंत्र कक्ष सुरु करण्यात आला नसल्याने शेतकरी आता नुकसान झालेल्या भातपिकाचे फोटो, जमिनीचे सातबाराचे उतारे, विमा भरल्याची पावती तसेच अन्य पुराव्याचे कागदपत्र घेऊन तालुका कृषी अधिकारी कार्यालय, तलाठी कार्यालय, तहसीलदार कार्यालयाचे उंबरठे झिजवितांना दिसून येत आहेत.वाडा तालुक्यातील २१ हजार ६५० बाधित शेतकरी असून त्याचे एकूण १० हजार ३० हेक्टर क्षेत्रावरील भात पिकाचे ८० ते ९० टक्के नुकसान झालेले आहे. अलिकडेच (१६ नोव्हेंबर) राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी खरीप पिकासाठी प्रती हेक्टरी आठ हजार तर फळबागासाठी १८ हजार रुपये प्रति हेक्टर मदत जाहीर केली आहे. मात्र, ही मदत अत्यंत तुटपुंजी असल्याचे सांगत, शेतकºयांनी नाराजी व्यक्त केली आहे.ही मदत दोन हेक्टरपर्यंतच दिली जाणार आहे. राज्यपालांच्या निर्णयानुसार शेतकºयांना फक्त एकरी ३२०० रुपये नुकसानभरपाई म्हणजे शेतकºयांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे हे काम आहे, अशी तिखट प्रतिक्रि या येथील शेतकरी नेते तथा कुणबीसेना प्रमुख विश्वनाथ पाटील यांनी व्यक्त केली आहे.वाडा तालुक्यात खरीप पिकाचा विमा घेतलेल्या शेतकºयांची संख्या जास्त असल्याने येथे विमा कंपनीचे दोन स्वतंत्र्य अधिकाºयांची नेमणूक केली आहे.-प्रवीण गवांदे, उपविभागीयकृषि अधिकारी, वाडाखरीप पिकाचा विमा काढताना आॅन लाईन सातबारा व अन्य कागदपत्र दिलेले असतानाही पुन्हा-पुन्हा वेगवेगळे कागदपत्र व नुकसानीचे पुरावे मागितले जात आहेत.- नारायण परशुराम पाटील,शेतकरी, पीक, ता.वाडा

टॅग्स :FarmerशेतकरीCrop Insuranceपीक विमाpalgharपालघर