शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

डहाणू, जव्हार येथे जोरदार अवकाळी पाऊस

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2019 06:15 IST

शेतकऱ्यांचे नुकसान, कृषी विभागाकडून पंचनामे करण्याची मागणी

कासा : डहाणू तालुक्यातील कासा भागात मंगळवारी जोरदार पाऊस झाला. नाले, ओहोळ यांना पूर आला आहे. शेते पाण्याने भरली आहेत. त्यामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून कापलेली पीक पाण्याखाली गेली आहेत.

तालुक्यातील कासा भागात दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास पावसाने पुन्हा जोरदार हजेरी लावली. तब्बल अडीच ते तीन तास ढगांच्या गडगडाटासह पाऊस झाला. कासा भागातील कासा, चारोटी, वाघाडी, वेती, वरोती, तवा, पेठ, आंबेदा, नानीवली, उर्से, साये, निकावली, म्हसड, आंबिवली, महालक्ष्मी, खाणीव, सोनाळे आदी गावामध्ये शेतकऱ्यांनी कापलेल्या भाताची कडपे पाण्यावर तरंगू लागली आहेत तर काही वाहून गेली आहेत. परिणामी पावसाने शेतीचे मोठे नुकसान झाले.

कासा भागात कापलेली भात पीक सहा सात दिवसापासून शेतातच आहेत. पाच दिवसात काही प्रमाणात पाऊस झाल्याने तेव्हा दाणे रुजले आहेत तर कडपे कुजायला लागली आहेत. सोमवारी दिवसभर उघाड दिल्याने शेतातील कडपे सुकण्यासाठी शेतकºयांनी पलटी केली तर काही शेतकºयांनी मंगळवारी सकाळपर्यंत भात कापणी केली. मात्र मंगळवारी दुपारी तीन वाजेनंतर पावसाने जोरदार सुरु वात केली अडीच ते तीन तास पाऊस झाला. त्यामुळे पूर आला असून शेते पाण्याने भरली आहेत.

अवकाळी पावसामुळे शेतकरी संकटात

मोखाडा : तालुक्यात जिल्ह्यात परतीचा पाऊस धो-धो बरसत असल्याने हळव्या भातपिकाला नुकसानीचा फटका बसला आहे. गेल्या सात - आठ दिवसांपासून जिल्ह्यात ठिकठिकाणी सुरू असलेल्या परतीच्या पावसामुळे शेतीची दाणादाण उडवली आहे. दुपारनंतर आकाशात ढगाळ पावसाळी वातावरण तयार होऊन जोरदार पाऊस पडत आहे.

पालघर जिल्ह्यात एक लाख ६ हजार ३६४ हेक्टर क्षेत्र असून त्यापैकी १ लाख १ हजार क्षेत्रात प्रत्यक्ष पेरणी करण्यात आली होती. यामधील ७३ हजार हेक्टर क्षेत्रावर भात लागवड करण्यात आली आहे. यामधील २ हजार ३७ हेक्टरमध्ये भात लागवड करण्यात आली आहे. हळव्या जातीतील भात पीक कापणीसाठी तयार झाली आहेत.पावसाळा भर रुसवे फुगवे दाखवून शेतकºयांना चिंतेत टाकलेल्या पावसाने जाता जाता नागली, वरई या पिकाला काही अंशी आधार दिल्याने शेतातील पिके सावरली असून हळूहळू शेतकºयाने तयार झालेले भात पीक खळ्यावर आणण्यासाठी लगबग सुरु केली, परंतु पावसाच्या लहरीपणामुळे शेतात उभारलेले भात पीक व कापणी केलेल्या कडप्यांची नासाडी होऊन भाताचे दाणे काळे पडण्याची शक्यता आहे.

परतीच्या पावसाचा फटका

जव्हार : जव्हार हा ९९ टक्के आदिवासी तालुका असून येथील खेडापाड्यातील आदिवासी बांधव शेतीवर आणि मजुरीवर अवलंबुन असतो. मात्र आॅक्टोबरमध्ये परतीचा पाऊस पडत असल्यामुळे शेतकºयांच्या पिकांवर पाऊस पडल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले.च्पावसाळा सप्टेंबर अखेर संपतो. मात्र यंदा आॅक्टोबरच्या अंतिम आठवड्यातही जोरदार पाऊस असून यामुळे येथील शेतकºयांच्या भात, नागली, वरई, उडीद, तूर आदी पिकांचे नुकसान झाले आहे. तसेच वर्षभरात शासनाकडूनही कुठल्याही प्रकारचा रोजगार मिळत नाही.

रोजगार नसला तरी शेतीतील पीक खाऊन जगणारा आदिवासी संकटात सापडला आहे. या पावसामुळे शेतीचे खूप नुकसान झाले आहे. दरम्यान, एकीकडे शासनाकडून रोजगार नाही तर दुसरीकडे अस्मानी संकट, या कचाट्यात शेतकरी सापडला आहे.

डहाणूत भातपिकांचे नुकसान

डहाणू : डहाणू तालुक्यात चार-पाच दिवसापासून परतीच्या पावसाची रिपरिप सुरू असून शेतकºयांनी तयार भातपिकाची कापणी मोठ्या प्रमाणावर केली होती. मात्र, ती कालपासून सुरू असलेल्या पावसाने पूर्ण भिजून गेली. त्यामुळे डहाणू तालुक्यातील शेतकºयांचे करोडोचे नुकसान झाले आहे. या नुकसान झालेल्या भात पिकाचे सरकारने पंचनामे करून शेतकºयांना नुकसान भरपाई देण्याची मागणी आहे.

काही दिवसांपासून डहाणूत वादळी वाºयासह परतीच्या पावसाची रिपरिप सुरू आहे. त्यामुळे रोगांनी खाल्लेली भात पिके, शेतकºयांनी कापणी करून ती खाचरात सुकण्यासाठी टाकली होती. परंतु भात खाचरात पाणी भरल्याने भिजून त्यावर अंकुराच्या माळा येऊ लागल्या आहेत. त्यामुळे शेतकºयांचे करोडोचे नुकसान झाले आहे. चिकू बागायतदार शेतकºयांना या पावसाचा फटका बसला आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी