शहरं
Join us  
Trending Stories
1
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
2
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
3
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
4
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
5
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
6
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
7
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
8
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
9
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
10
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
11
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
12
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
13
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
14
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
15
टी२० क्रिकेटमध्ये ऋषभ पंत अपयशी का ठरतोय? चेतेश्वर पुजाराने सांगितलं त्यामागचं कारण!
16
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
17
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
18
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
19
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
20
शिमला कराराने सुटलेले भारत-पाकिस्तानमधील वाद; आता पाक देतोय रद्द करण्याची धमकी...

धो-धो पाऊस, पुराने वेढलेली नदी आणि.... ‘त्या’ दहा कामगारांना आणले मृत्यूच्या दाढेतून

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2022 07:33 IST

एनडीआरएफनं वैतरणेत उतरवली बोट, १६ तासांचा लढा झाला यशस्वी

हितेन नाईकपालघर : डोक्यावर धो-धो कोसळणारा पाऊस, पायाखाली पुराने वेढलेली वैतरणा नदी आणि समोर रात्रीचा काळाकुट्ट अंधार. अंगावर काटा आणणाऱ्या परिस्थितीत जीव मुठीत घेऊन १० कामगार रात्रभर डोळ्यांत तेल घालून मदतीकडे आस लावून  कुडकुडत होते. समोर मृत्यू दिसत असतानाही कोणीतरी येईल आणि मृत्यूच्या दाढेतून सहीसलामत आपल्याला घेऊन जाईल, हीच इच्छाशक्ती उराशी बाळगत त्यांनी सोळा तास निकराने लढा दिला आणि जगण्यासाठी सुरू असलेला त्यांचा हा संघर्ष यशस्वी झाला. सकाळी एक बोट त्यांच्या दिशेने येताना दिसली आणि अगदी कंठाशी आलेल्या त्यांच्या जिवात जीव आला. देवदूतासारखे धावून आलेल्या एनडीआरएफच्या टीमनेही प्रयत्नांची पराकाष्ठा करीत या दहा कामगारांची सुखरूप सुटका करीत शेवट गोड केेला.   

पालघरच्या वैतरणा नदीत बुधवारी रात्री अडकलेल्या जीआर इन्फ्रास्ट्रक्चरच्या १० कामगारांचा हा अनुभव थरारक असाच ठरला. रात्री मुसळधार पावसाचा कमी झालेला जोर आणि समुद्राला लागलेल्या ओहोटीमुळे नदीचा प्रवाह कमी झाल्याने एनडीआरएफ टीमचे काम सुलभ झाल्याने कामगारांचे जीव वाचविण्यात त्यांना यश आले. 

मुंबई-वडोदरा राष्ट्रीय महामार्गाचे काम मागील काही वर्षांपासून सुरू असून, ह्या कामाचा ठेका घेतलेल्या जीआर इन्फ्रास्ट्रक्चरने बहाडोली गावात मोठा प्रकल्प उभारला आहे. बहाडोली गावाच्या पूर्वेला असलेल्या वैतरणा नदीत पूल उभारण्यासाठी खांब उभारण्याचे काम मुसळधार पाऊस आणि नदीला मोठ्या प्रमाणात पूर आला असतानाही सुरू होते.

कामगारांच्या जीविताची काळजी न घेता त्यांना धोकादायक परिस्थितीत नदीत उतरविण्याची हीच जोखीम १० कामगारांच्या जीविताला धोका निर्माण करणारी ठरली. बुधवारी रात्री मुंबईच्या कोस्ट गार्डकडे नदीत फसलेल्या कामगारांच्या सुटकेसाठी हेलिकॉप्टरची मागितलेली मदत मुसळधार पाऊस, रात्रीची घटना आणि नदीच्या धोकादायक प्रवाहामुळे शक्य नसल्याचे कोस्टगार्डने कळविले होते. दुसरीकडे, एनडीआरएफकडे असलेल्या साधनसामग्रीच्या मर्यादा लक्षात घेता रात्रभर सुरू असलेले प्रयत्न अपुरे पडत होते. स्थानिक मच्छीमारांच्या बोटीची मदतही  मिळू शकत नसल्याने अखेर जिल्हा प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून होते. 

स्थानिक पोलिसांचे सहकार्य महत्त्वपूर्णजिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. किरण महाजन, उपजिल्हाधिकारी सुरेंद्र नवले, प्रांताधिकारी धनाजी तोरस्कर, तहसीलदार सुनील शिंदे, उपविभागीय पोलीस अधिकारी नीता पाडवी यांनी माहिती मिळताच घटनास्थळाकडे धाव घेत व्यवस्था उभारण्याच्या सूचना दिल्या. पहाटे पावसाचे कमी झालेले प्रमाण आणि समुद्राला आलेली ओहोटी यामुळे नदीचा प्रवाह कमी झाल्यानंतर एनडीआरएफने नदीत बोटी उतरविल्या.

टॅग्स :Rainपाऊसpalgharपालघर