शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

धो-धो पाऊस, पुराने वेढलेली नदी आणि.... ‘त्या’ दहा कामगारांना आणले मृत्यूच्या दाढेतून

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2022 07:33 IST

एनडीआरएफनं वैतरणेत उतरवली बोट, १६ तासांचा लढा झाला यशस्वी

हितेन नाईकपालघर : डोक्यावर धो-धो कोसळणारा पाऊस, पायाखाली पुराने वेढलेली वैतरणा नदी आणि समोर रात्रीचा काळाकुट्ट अंधार. अंगावर काटा आणणाऱ्या परिस्थितीत जीव मुठीत घेऊन १० कामगार रात्रभर डोळ्यांत तेल घालून मदतीकडे आस लावून  कुडकुडत होते. समोर मृत्यू दिसत असतानाही कोणीतरी येईल आणि मृत्यूच्या दाढेतून सहीसलामत आपल्याला घेऊन जाईल, हीच इच्छाशक्ती उराशी बाळगत त्यांनी सोळा तास निकराने लढा दिला आणि जगण्यासाठी सुरू असलेला त्यांचा हा संघर्ष यशस्वी झाला. सकाळी एक बोट त्यांच्या दिशेने येताना दिसली आणि अगदी कंठाशी आलेल्या त्यांच्या जिवात जीव आला. देवदूतासारखे धावून आलेल्या एनडीआरएफच्या टीमनेही प्रयत्नांची पराकाष्ठा करीत या दहा कामगारांची सुखरूप सुटका करीत शेवट गोड केेला.   

पालघरच्या वैतरणा नदीत बुधवारी रात्री अडकलेल्या जीआर इन्फ्रास्ट्रक्चरच्या १० कामगारांचा हा अनुभव थरारक असाच ठरला. रात्री मुसळधार पावसाचा कमी झालेला जोर आणि समुद्राला लागलेल्या ओहोटीमुळे नदीचा प्रवाह कमी झाल्याने एनडीआरएफ टीमचे काम सुलभ झाल्याने कामगारांचे जीव वाचविण्यात त्यांना यश आले. 

मुंबई-वडोदरा राष्ट्रीय महामार्गाचे काम मागील काही वर्षांपासून सुरू असून, ह्या कामाचा ठेका घेतलेल्या जीआर इन्फ्रास्ट्रक्चरने बहाडोली गावात मोठा प्रकल्प उभारला आहे. बहाडोली गावाच्या पूर्वेला असलेल्या वैतरणा नदीत पूल उभारण्यासाठी खांब उभारण्याचे काम मुसळधार पाऊस आणि नदीला मोठ्या प्रमाणात पूर आला असतानाही सुरू होते.

कामगारांच्या जीविताची काळजी न घेता त्यांना धोकादायक परिस्थितीत नदीत उतरविण्याची हीच जोखीम १० कामगारांच्या जीविताला धोका निर्माण करणारी ठरली. बुधवारी रात्री मुंबईच्या कोस्ट गार्डकडे नदीत फसलेल्या कामगारांच्या सुटकेसाठी हेलिकॉप्टरची मागितलेली मदत मुसळधार पाऊस, रात्रीची घटना आणि नदीच्या धोकादायक प्रवाहामुळे शक्य नसल्याचे कोस्टगार्डने कळविले होते. दुसरीकडे, एनडीआरएफकडे असलेल्या साधनसामग्रीच्या मर्यादा लक्षात घेता रात्रभर सुरू असलेले प्रयत्न अपुरे पडत होते. स्थानिक मच्छीमारांच्या बोटीची मदतही  मिळू शकत नसल्याने अखेर जिल्हा प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून होते. 

स्थानिक पोलिसांचे सहकार्य महत्त्वपूर्णजिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. किरण महाजन, उपजिल्हाधिकारी सुरेंद्र नवले, प्रांताधिकारी धनाजी तोरस्कर, तहसीलदार सुनील शिंदे, उपविभागीय पोलीस अधिकारी नीता पाडवी यांनी माहिती मिळताच घटनास्थळाकडे धाव घेत व्यवस्था उभारण्याच्या सूचना दिल्या. पहाटे पावसाचे कमी झालेले प्रमाण आणि समुद्राला आलेली ओहोटी यामुळे नदीचा प्रवाह कमी झाल्यानंतर एनडीआरएफने नदीत बोटी उतरविल्या.

टॅग्स :Rainपाऊसpalgharपालघर