शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
4
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
5
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
6
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
7
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
8
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
9
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
10
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
11
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
12
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
13
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
14
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
15
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
16
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
17
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
18
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

उत्पादन निम्मे, यंदा केवडा महागला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2019 11:12 PM

गणेशोत्सवात वाढती मागणी : एक कणीस मिळते १५० ते २०० रूपयांना

अनिरु द्ध पाटील।लोकमत न्यूज नेटवर्कडहाणू/बोर्डी : गतवर्षीच्या कमी पर्जन्यमानाचा फटका या वर्षीच्या केवडा उत्पादनावर झाला असून निम्मे पीक आल्याने किमतीत वाढ झाली आहे. स्थानिक उत्पादकांकडून शहरातील व्यापऱ्यांना विकल्या जाणाºया केवड्याच्या प्रती नगात ५० रुपयांनी वाढ होऊन त्याची किमत १५० रुपयांवर आली आहे. त्यामुळे मुंबईसह उपनगरातील फूल बाजारात किमती वाढून त्याचा फटका गणेशभक्तांना बसणार आहे. दरम्यान केवड्याऐवजी त्याच्या कोवळ्या गाभ्याची विक्री करून ग्राहकांच्या फसवणुकीची शक्यता आहे.

गणपती पूजनाकरिता शहरातील फूल बाजारात ग्राहकांकडून केवड्याला प्रचंड मागणी असते. शिवाय मागील काही वर्षांपासून केवड्याची बनं झपाट्याने कमी होत असल्याने आवक घटून किमतीत वाढ झाली आहे. मागील वर्षी आॅगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंतच पाऊस झाला होता. तर १३ सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थी होती. या उत्सवाकरिता लागणाºया केवड्याची काढणी साधारणत: कालाष्टमीपासून शेतकऱ्यांकडून केली जाते. त्यामुळे ३ सप्टेंबरपासून काढणीला प्रारंभ झाला होता. मात्र छाटणीनंतर पावसाने उघडीप दिल्याने नवीन फुटाव्याला आवश्यक पाण्याचा पुरवठा झाला नाही. त्याचा फटका या वर्षीच्या उत्पादनावर झाला आहे.

फुटवा कमी आणि पुढे-मागे आल्याने फूल केवड्यांची संख्या कमी झाली आहे. शिवाय काढणी योग्य केवडा पंधरा दिवसांपूर्वीच फुलण्यास प्रारंभ झाल्याने तो झाडवरच करपून गेला. तर काही केवडे फुलण्यास आणखी पंधरा दिवस लागतील असे केवडा उत्पादकांचे म्हणणे आहे. त्यामुळे यावर्षी पोषक पाऊस होऊनही निम्मेच उत्पादन हाती लागणार आहे. गतवर्षी शेतकºयांकडून व्यापºयांना विकल्या जाणाºया एका नगाची किंमत केवड्याच्या आकारानुसार १०० ते ११० रुपये होती. त्यामध्ये वाढ होऊन १५० रुपये करण्यात आली आहे. हाच केवडा दादर आणि उपनगरातील फूल बाजारात गेल्यावर एका पातीकरिता १५० ते २००0 रुपये दराने ग्राहकांना विकला जातो. तर वाढती मागणी लक्षात घेता आर्थिक फायद्यासाठी व्यापारी कोवळा गाभ्याची मागणी शेतकºयांकडे करून त्याद्वारे बक्कळ पैसा कमावतील. मात्र लोभापायी असे केल्यास पुढील वर्षीच्या उत्पन्नावर त्याचा परिणाम होईलच. शिवाय काही झुडपे दगावण्याची शक्यता असल्याचे मत चिखले गावातील केवडा उत्पादक अनिल किणी यांनी व्यक्त केली आहे.

येथील महिला रेल्वेने भाजीपाला नेऊन मुंबई आणि उपनगरातील सदनिकांमध्ये जाऊन विक्री करतात. गणेशोत्सव काळात त्या केवडा आणि पूजेची पत्री यांची विक्री करतात. शेतकरी या महिलांना ८० ते १०० रुपयांना याची विक्री करतात. त्यामुळे ग्राहकांना तो १५० रुपये नगाने केवडा उपलब्ध होईल.खर्चात वाढ झाल्याचा फटकाशेतीला कुंपण म्हणून केवड्याची शेतकºयांकडून लागवड होते. मात्र शेती कसण्याचे प्रमाण घटल्याने केवडा क्षेत्रात घट, मागील पाच-सहा वर्षांपासून घटत्या पावसाचाही परिणाम, बाजारात वाढत्या मागणीमुळे कोवळ्या गाभ्याची चोरी व बनाला आग लावण्याचे प्रकार, १५ ते २० फूट उंच काटेरी झुडपावर चढून शेंड्यावरचा केवडा काढणीकरिता ३ ते ४ मजुरांची आवश्यकता, मात्र मजुरी वाढल्याने उत्पादन खर्चात वाढ यामुळे केवड्याचे उत्पादन दरवर्षी झपाट्याने घटते आहे. 

गतवर्षी कमी पाऊस झाल्याने या वर्षीच्या केवडा उत्पादनात निम्म्यानी घट झाली आहे. शिवाय हंगामापूर्वीच आणि हंगामानंतर केवडा उमलण्याचा प्रकार यावर्षी घडताना दिसतोय. या सर्वांचा परिणाम होऊन प्रतिनग ५० रुपयांनी वाढ झाली आहे.

- अनिल किणी, केवडा उत्पादक शेतकरी, चिखले