शहरं
Join us  
Trending Stories
1
धगधगतं फ्रान्स! लाखो लोक रस्त्यावर उतरले, काही ठिकाणी दगडफेक; रेल्वे, मेट्रो, बस, शाळा बंद
2
काकासोबत असलेल्या प्रशिकवर बिबट्याची झडप, घरापासून ५० मीटरवर सापडला मृतदेह
3
रेपचा व्हिडिओ, पत्नीची आयडिया; पती विधवा महिलांसोबत बनवायचा संबंध, आरोपीचा खळबळजनक खुलासा
4
अजबच! फ्रेंड रिक्वेस्ट रिजेक्ट केल्याने तरुणी संतापली, अपहरण करून तरुणाला मारहाण केली, त्यानंतर...
5
हॉर्लिक्स, विक्स, झंडू बाम, डायपर, टुथपेस्ट... सर्वकाही स्वस्त; दिग्गज कंपन्यांनी जारी केली नवी लिस्ट
6
"एकटं वाटलं की मी सिद्धिविनायक मंदिरात जाऊन बसते...", रिंकूने सांगितलं कारण, म्हणाली...
7
Mumbai Crime: घाटकोपर रेल्वे स्थानकाबाहेर सापडला ३५ वर्षाच्या माणसाचा मृतदेह; कोणामुळे गेला जीव?
8
‘टॅरिफ’मुळे प्लास्टिक उद्योग अडचणीत; ३ वर्षांत भारतातून इतर देशांमध्ये चौपटीने निर्यात वाढविण्याचे लक्ष्य
9
गोपीचंद पडळकरांचे वादग्रस्त विधान: अजित पवारांनी टोचले कान; म्हणाले, 'भाजपची जबाबदारी फडणवीसांची'
10
"आम्ही मित्र बनलो अन्..." १९ वर्षीय मॉडलनं का उचललं टोकाचं पाऊल?; बॅगेतील चिठ्ठीमुळे उघडलं रहस्य
11
शेअर बाजाराच्या तेजीला ब्रेक; Sensex १४७ अंकांनी आपटला, निफ्टीतही घसरण; 'हे' प्रमुख स्टॉक्स घसरले
12
यूएई सामन्याआधी केलेलं नाटक पाकिस्तानच्या अंगलट, आयसीसीनं पाठवला ईमेल!
13
रुममेटशी भांडण, पोलिसांनी थेट झाडल्या गोळ्या, अमेरिकेत भारतीय इंजिनियरचा मृत्यू  
14
बँक खात्यात पैसे नाही, टेन्शन कशाला? आता करा UPI पेमेंट, पुढच्या महिन्यात पैसे भरा; 'यांनी' आणलं जबरदस्त फीचर
15
आधी गोलंदाजीवर ठोकले गेले ५ षटकार, मग वडिलांचं निधन, श्रीलंकन क्रिकेटपटूवर कोसळला दु:खाचा डोंगर   
16
Nilon's Success Journey: लोणचं खायला घालून कंपनीनं कमावले ४०० कोटी; छोट्या किचनमधून झाली सुरुवात, आज परदेशातही आहे व्यवसाय
17
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानवर रात्री १.३० वाजताच स्ट्राइक का केले?; CDS चौहान यांचा खुलासा
18
फायद्याची बातमी! पेन्शनचा १००% पैसा टाका इक्विटीत; १ ऑक्टोबरपासून लागू होणार नवा नियम; पैसे कुठे आणि किती वाढत आहेत हे समजणे सोपे होणार
19
..तर महाराष्ट्रात एक नवीन 'खिचडी' पकेल! एकत्र राहण्यासाठी वरून खूपच दबाव आला तर बंडखोरीचे पेव फुटेल
20
आयफोन १७ च्या खरेदीवर ईएमआय किती येईल? जाणून घ्या बँक आणि कॅशबॅक ऑफर्स!

अर्नाळा किल्लावासीयांच्या पदरी घोर निराशा, जेट्टीचे काम कासवगतीने

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2020 00:51 IST

भारताला स्वातंत्र्य मिळून सात दशकांहून अधिक काळ लोटला, मात्र या प्रदीर्घ काळात अनेक भागांत स्वातंत्र्याची पहाट खऱ्या अर्थाने अद्याप पोहोचलेली नाही. याचा प्रत्यय विरार पश्‍चिमेच्या समुद्रातील अर्नाळा किल्लावासीयांना येत आहे.

- सुनील घरत पारोळ - भारताला स्वातंत्र्य मिळून सात दशकांहून अधिक काळ लोटला, मात्र या प्रदीर्घ काळात अनेक भागांत स्वातंत्र्याची पहाट खऱ्या अर्थाने अद्याप पोहोचलेली नाही. यामुळे आजही मोठ्या जनजीवनाला यातनामय जीवन जगावे लागत आहे. याचा प्रत्यय विरार पश्‍चिमेच्या समुद्रातील अर्नाळा किल्लावासीयांना येत आहे.या ठिकाणच्या ग्रामस्थांना समुद्रातून बोटीने प्रवास करून शहरात यावे लागते. संध्याकाळी ७ नंतर बोट बंद होत असल्याने किल्ल्याबाहेर पडताना नागरिकांना वेळेचे भान ठेवावे लागते. अन्यथा पूर्ण रात्र किनारपट्टीवर घालवण्याशिवाय गत्यंतर उरत नाही. अर्नाळा किल्लावासीयांसाठी मागील ४ वर्षांपासून समुद्रीमार्गे जेट्टी (पूल) बांधण्याचे काम सुरू आहे. मात्र हे काम अत्यंत कासवगतीने सुरू असल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. धूपप्रतिबंधक बंधारा बांधून मंजूर होऊन काम सुरूदेखील करण्यात आले आहे. पण काम संथगतीने सुरू असल्याने पुढील वर्षीच्या पावसाळ्यात येथील आणखी २० ते २५ घरे समुद्र गिळंकृत करण्याची भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.माजी खासदार तथा माजी केंद्रीय पेट्रोलियम मंत्री राम नाईक यांनी अर्नाळा किल्ला परिसरात असलेले काळोखाचे साम्राज्य पूर्णपणे नाहीसे करून विजेची सोय उपलब्ध करून दिली. त्याआधी बेरोजगारी आणि अज्ञानाच्या दरीत खितपत पडलेला अर्नाळा किल्ला परिसरातील तरुण वर्ग आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक बाबतीत प्रगती करू लागला आहे. वसई तालुक्यात होणारे महोत्सव, तरुणांना चालना देणारे उपक्रम या सर्वांत अर्नाळा किल्ला परिसरातील तरुण-तरुणी हिरिरीने सहभाग घेऊन अर्नाळा किल्ला परिसराचे नाव उज्ज्वल करू लागले आहेत. मात्र अर्नाळा किल्ला परिसरातून बाहेरच्या जगात पाय ठेवताना येथील ग्रामस्थांना वेळेचे भान ठेवावे लागत आहे. संध्याकाळी सातनंतर अर्नाळा किनारपट्टीवर पोहोचल्यानंतर बोटीअभावी नागरिकांना किनाऱ्यावरच थांबावे  लागते. दरम्यान, येथील धूपप्रतिबंधक बंधाऱ्याचे बांधकामही संथगतीने सुरू असल्यानेच नागरिकांच्या घरांची दरवर्षी पडझड होते, असाही आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार