शहरं
Join us  
Trending Stories
1
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
2
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
3
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
4
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
5
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
6
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
7
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
8
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
9
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
10
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
11
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
12
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
13
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
14
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
15
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
16
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
17
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
18
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
19
'हार मानणार नाही..'; कार्तिक आर्यनच्या 'चंदू चँपियन'चा ट्रेलर, मराठमोळ्या हेमांगी कवीने वेधलं लक्ष
20
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास

पालघर जिल्ह्यांत मुलींची बाजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 08, 2019 11:57 PM

वसई तालुक्याचा निकाल सर्वाधिक ७९.७७ । विक्रमगड सर्वात कमी ४७.६० टक्के

पालघर : पालघर जिल्ह्याचा दहावीचा निकाल ७१.७५ लागला असून यामध्ये मुलींनी बाजी मारली आहे. जिल्ह्यातील मुलींची उत्तीर्णतेची टक्केवारी ७५ टक्के आहे तर मुलांची टक्केवारी ६८.९२ आहे, या परीक्षेत ८ तालुक्यामधून बसलेल्या ५७ हजार ९२२ विद्यार्थ्यांपैकी ४१ हजार ५९८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

वाडा तालुक्यातून ३२६६ मुले परीक्षेला बसले होते यापैकी २००८ मुले उत्तीर्ण झाले असून त्याची टक्केवारी ६१.३९ इतकी आहे. मोखाडा तालुक्यातून १२८४ विद्यार्थी परीक्षेला बसले होते त्यापैकी ७६० मुले उत्तीर्ण झाले असून त्याची टक्केवारी ५९.१९ आहे. विक्रमगड तालुक्यातून २९३७ विद्यार्थी परीक्षेला बसले होते पैकी १,३९८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत त्यांची टक्केवारी ४७.६ आहे. जव्हार तालुक्यातून २२४६ विद्यार्थी परीक्षेस बसले होते तर यातून १२७७ मुले उत्तीर्ण झाले या तालुक्याची टक्केवारी ५६.८६ आहे. तलासरी तालुक्यातून ४ हजार ७१ विद्यार्थी परीक्षेला बसले होते यापैकी २३०९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून या तालुक्याची टक्केवारी ५६.७२ इतकी आहे. डहाणू तालुक्यातून पाच हजार ९२८ विद्यार्थी परीक्षेला बसले होते यापैकी ३७७२ विद्यार्थी पास झाले या तालुक्याची टक्केवारी ६३.५३ इतकी आहे तर पालघर तालुक्यातून ८१७० मुलांनी दहावीची परीक्षा दिली. यामध्ये ६०९० विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून या तालुक्याची टक्केवारी ७४.५ आहे.जिल्ह्यामध्ये पालघर तालुका हा टक्केवारीमध्ये द्वितीय क्रमांकावर आहे तर वसई तालुक्यात सर्वाधिक विद्यार्थी परीक्षेस बसले होती त्यांची आकडेवारी तीस हजार वीस इतकी असून यामध्ये २३ हजार ९४८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून या तालुक्याची टक्केवारी ७९.७७ टक्के तर इतकी आहे. वाडा तालुक्यातील ३३ शाळा मोखाडा तालुक्यातील १८ शाळा विक्रमगड तालुक्यातील २७ जव्हार तालुक्यातील ३४ तलासरी तालुक्यातील ४३ डहाणू ३५६ पालघर मधील ८८ वसई मधील २५२ अशा आठही तालुक्यातील एकूण ५५१ शाळांमधून ४१ हजार ५९८ विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत.आठही तालुक्यातून २१ हजार ५७८ मुले तर १९ हजार ९८१ मुली असे एकूण ४१ हजार ५९८ विद्यार्थी या परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत यामध्ये आठही तालुक्यांची जिल्ह्याची मुलांची आकडेवारी ही ६८.९२ असून मुलींची आकडेवारी ही ७५.०८ आहे.तालुकानिहाय निकालतालुका टक्केवारीवसई ७९.७७ %पालघर ७४.५ %डहाणू ६३.५३ %वाडा ६१.३९ %मोखाडा ५९.१९ %जव्हार ५६.८६ %तलासरी ५६.७२ %विक्रमगड ४७.६० %

टॅग्स :palgharपालघर