शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
3
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
4
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
5
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
6
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
7
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे
8
भारताला मिळणार संधी! अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ इंडिया मेड आयफोन; चीनला झटका
9
पहलगाम हल्ल्यानंतर चक्र फिरली! बॉलिवूड अभिनेत्रीच्या सिनेमावर आता पाकिस्तानात बंदी, ९ मे रोजी होणार होता रिलीज
10
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
11
Pahalgam Terror Attack : "लहान मुलं आईपासून कशी दूर राहतील?; एकटं पाकिस्तानला पाठवणं अशक्य, हे खूप वेदनादायक"
12
२६ वर्ष पोलीस सेवेनंतरही कॉन्स्टेबलला भारत सोडण्याचे आदेश; हायकोर्टानं थांबवले, प्रकरण काय?
13
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी
14
“जातनिहाय जनगणना निर्णय फसवा, जनतेची दिशाभूल करणारा, सरकारी भूमिका दुटप्पी”: प्रकाश आंबेडकर
15
मध्यरात्री भारत-पाकिस्तानात खणखणला फोन; तणाव कमी करण्यासाठी कुणी घेतला पुढाकार?
16
Bhendwal Bhavishyvani 2025: शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
17
मलायकाला अटक होणार? कोर्टात हजर न झाल्यास अजामीनपात्र वॉरंट निघणार; नक्की प्रकरण काय?
18
युट्यूबच्या माध्यमातून गुंतवणूकदारांची दिशाभूल, सेबीची मोठी कारवाई; शेअरमध्ये गुंतवणूकीचा दिलेला सल्ला
19
गुरु-राहु-केतु गोचर: ७ राशींना मे महिना दमदार, अचानक धनलाभ; पैसा राहील, धनलक्ष्मी प्रसन्न!
20
माहिरा खान ते हानिया आमिर, पाकिस्तानी कलाकारांचे इन्स्टाग्राम अकाऊंट भारताकडून 'बॅन'

विक्रमगडात २५ गावी एक गाव एक गणपती, ४६ वर्षांपासून सुरु आहे अखंड परंपरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2017 03:47 IST

या शहरानजीकचे आपटी बुद्रुक हे गाव गेल्या ४६ वर्षापासून एक गाव एक गणपती ही संकल्पना यशस्वीरीत्या राबवित आहे़ संपूर्ण गावात एकाच गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करुन आपटी बु़ गावाने ऐक्याचा संदेश दिला आहे़

- राहुल वाडेकर ।विक्रमगड : या शहरानजीकचे आपटी बुद्रुक हे गाव गेल्या ४६ वर्षापासून एक गाव एक गणपती ही संकल्पना यशस्वीरीत्या राबवित आहे़ संपूर्ण गावात एकाच गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करुन आपटी बु़ गावाने ऐक्याचा संदेश दिला आहे़ तर गणेशोत्सवापूर्वी पोलिस निरिक्षक रंजीत पवार यांनी तालुक्यातील गाव खेड्यापाड्यात एक गाव एक गणपती संकल्पना राबविण्याचे आवाहन केले होते़ त्यानुसार तालुक्यात अनेक गावात ही संकल्पना राबविली जात असून यावर्षी एक गाव एक गणपतीमध्ये वाढ झाली आहे़ तालुक्यात एकंदरीत २५ ठिकाणी ही संकल्पना राबविली जात आहे़विक्रमगड मुख्यबाजारपेठे (शहरापासून) ८ कि़ मी अंतरावर हे गाव आहे़ एक गाव एक गणपती ही संकल्पना गावकरी सार्वजनिक नवतरुण मित्र मंडळाच्या माध्यमातून ४६ वर्षे भक्तीभावाने व एकोप्याने राबवित आहेत़ गणेशोत्सवा मागील लोकमान्यांचा उद्देश गावकºयांनी सफल करुन दाखविला आहे व त्याअनुषंगाने इतर गावांनीही ही संकल्पना राबविण्यास सुरुवात केली असून दरवर्षी त्यात वाढ होते आहे.१९७० साली गावातील आदिवासी बांधव नवतरुण शिक्षक व प्रतिष्ठीत नागरिक यांनी गावात एकाच गणेशमूर्तीची स्थापना केली व आज त्यांस ४६ वर्षे झाली आहेत. यातून गावातील एकजूटही कायम राहीली असे नवतरुण मंडळांचे अध्यक्ष विठठल पंळज्या उंबरसाडा यांनी लोकमतला सांगीतले़ त्याला सरपंच, पोलिस पाटील यांनीही ही संकल्पना उचलून धरली़ या अनुषंगाने सरपंच, पोलीस पाटील, गावातील प्रतिष्ठीत नागरिक यांनी नव तरुण मित्र मंडळ स्थापन करुन एक गाव एक गणपती ही संकल्पना प्रत्यक्षात उतरवली, गावातील सर्व गावकरी एकत्रित येऊन हा गणशोत्सव साजरा करतात़ या गावाची लोकसंख्या १५०० च्या आसपास असून गणेशोत्सवात गौरी नाच, ढोल नाच, तारपा नृत्य असे विविध कार्यक्रम आयोजिले जातात. याचा खर्च मंडळाच्या फंडातुन केला जातो़ संपूर्ण गावात एकच गणपती असल्यामुळे सर्व गावकरी पूजा, आरतीला एकत्र जमतात व महाप्रसादाचा लाभ घेतात़ यामुळे गावातील एकोपा कायम असून या गावाने सामाजिक एकात्मतेचा आदर्श उभा केला आहे़ या सात दिवसांच्या गणेशोत्सवाचा आनंदाने गावातील सर्व वातावरण भक्तीमय, प्रसन्न स्वच्छ, सुंदर राहाते़त्याचप्रमाणे या आदर्शाचा दुसरा भाग म्हणजे तालुक्यातील झडपोली, गावितपाडा, सवादे, खुडेद आदी २५ गावात एक गाव एक गणपतीची संकल्पना राबविली जात असून या गणेशोत्सवात विविध कार्यक्रम घेवून हा उत्सव मोठया भक्तीभावाने सर्वत्र साजरा केला जातो. वर्गणी ठरविणे, देणे, कार्यक्रमाचे आयोजन, नियोजन आगमन आणि विसर्जनाची मिरवणूक या सगळ््यामध्ये संपूर्ण गावकºयांचे सहकार्य असल्याने हा उत्सव वेगळ््याच सहकार्याच्या आणि भक्तीच्या वातावरणात पार पडतो.आम्ही गावामध्ये एक गाव गणपती साकारला आहे. त्याला आता ४६ वर्षे झाली आहेत. यामुळे गावात एकोपा राहातो. वातावरण भक्तीमय राहून कोणतेही तंटे, वाद, भानगडी होत नाहीत व सर्वाच एकमेकांशी चांगले संबंध जुळून गावातील शांतता कायम राहते. -विठ्ठल उंबरसाडा, अध्यक्ष

टॅग्स :Ganeshotsavगणेशोत्सव