शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: तोंडाला रुमाल बांधून आला अन् धाड, धाड; धारावीत भर बाजारात महिलेवर गोळीबार!
2
हिंजवडीत इमारतीवरून उडी मारून आयटी अभियंत्याची आत्महत्या, चिठ्ठीत लिहिले...
3
Badlapur: बदलापुरात रासायनिक कंपनीत आग!
4
Russia Ukraine War: 'रशियाकडे युद्ध थांबवण्याची शेवटची संधी' डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतिन यांना इशारा!
5
मनसे कार्यकर्त्यांकडून कोचिंग सेंटरच्या संचालकाला मारहाण, कल्याण येथील व्हिडीओ व्हायरल
6
Sangli: नागपंचमीनिमित्त सांगलीत भाविकांना जिवंत नागांचे दर्शन घडणार, खेळावर बंदी कायम!
7
निशिकांत दुबेंना घेराव घातल्यानं राज ठाकरेंकडून वर्षा गायकवाड यांचे कौतुक, म्हणाले...
8
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
9
तब्बल ३८ तास बंद राहिला टोलनाका, तरीही २४ हजार लोकांनी प्रामाणिकपणे भरला टोल     
10
How To Deal With Heart Attack: घरात एकटे असताना 'हार्ट अटॅक' आला तर स्वत:चा जीव कसा वाचवाल? डॉक्टरांनी सांगितल्या 'या' सोप्या टिप्स
11
'नागपूरची लेक' वर्ल्ड चॅम्पियन दिव्या देशमुखला नितीन गडकरींचा 'व्हिडीओ कॉल', काय झाल्या गप्पा?
12
"महाराष्ट्राकडे 'बुद्धी आणि बळ' दोन्ही ओतप्रोत, ते जेव्हा..."; राज ठाकरेंकडून दिव्या देशमुखचं कौतुक
13
Pune Crime: 'छातीत दुखतंय', इंजिनिअर तरुण मीटिंग रुममधून उठला अन् सातव्या मजल्यावरून मारली उडी
14
वयोवृद्ध महिलेच्या खुनाचे रहस्य उलगडले, सावत्र मुलाला व पतीला अटक, गुन्हे शाखा दोनची कामगिरी
15
नागपुरला मिळाले ३५ वे पोलीस ठाणे; खापरखेडा पोलीस ठाणे आता नागपुरच्या कार्यकक्षेत
16
'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
17
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
18
"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
19
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
20
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा

आश्रमशाळेत कच्च्या चपात्या, बेचव भाजी अन् अळणी भात; विद्यार्थ्यांनी मांडले जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांसमोर वास्तव

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2024 12:37 IST

या आश्रमशाळेतील मुलांच्या जेवणासाठी तालुकास्तरावरच किचन सुरू करण्यात यावे, अशी सूचना निकम यांनी केली आहे.

पालघर : आश्रमशाळेतील मुलांना निकृष्ट दर्जाचे जेवण दिले जात असून कच्च्या चपात्या, बेचव भाजी आणि अळणी भात मिळत असल्याची माहिती विद्यार्थ्यांनी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रकाश निकम यांच्यासमोरच दिली. या आश्रमशाळेतील मुलांच्या जेवणासाठी तालुकास्तरावरच किचन सुरू करण्यात यावे, अशी सूचना निकम यांनी केली आहे.

डहाणू आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत पालघर, डहाणू, तलासरी आणि वसई अशा चार तालुक्यांतील ३३ आश्रमशाळांमधून १,७०० विद्यार्थ्यांना बोईसर-कांबळगाव येथील सेंट्रल किचनमधून दररोज सकाळचा नाष्टा व दोनवेळचे जेवण पुरविले जाते. मंगळवारी ३३२ विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा झाल्याने त्यांना जिल्ह्यातील विविध शासकीय रुग्णालयांत दाखल करण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर बुधवारी अध्यक्ष निकम यांनी कासा येथे ग्रामीण रुग्णालयात जाऊन विद्यार्थ्यांची भेट घेऊन तब्येतीची विचारपूस केली आणि रणकोळ आश्रमशाळेत जाऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

कांबळगाव येथील सेंट्रल किचनची पाहणी करताना विद्यार्थ्यांसाठी बनवण्यात येणाऱ्या जेवणाची चव, प्रत कशी असते हे प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी अध्यक्षांनी विद्यार्थ्यांसोबत जेवण केले. यावेळी आजचे जेवण चांगले असून अन्य वेळी मिळणाऱ्या जेवणात मशिनवर बनवलेली कच्ची चपाती, पाण्यासारखी डाळ-भाजी, अळणी भात असे बेचव जेवण मिळत असल्याची भावना विद्यार्थ्यांनी दबक्या आवाजात आपल्याकडे व्यक्त केल्याचे निकम यांनी सांगितले. मध्यरात्री बनविलेले जेवण हे सेंट्रल किचनपासून सुमारे ५० ते ६० किलोमीटरच्या परिसरात असलेल्या आश्रमशाळांना वाहनातून वितरित केले जात असल्याने या अन्नावर त्याचा विपरीत परिणाम होत असावा, अशी शंका अध्यक्षांनी व्यक्त केली. 

परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यात यशडहाणू आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत ३१ आश्रमशाळांतील ३३२ विद्यार्थ्यांवर जेवणातून विषबाधा झाल्याने त्यांना विविध रुग्णालयांत दाखल केले होते. त्यांच्यावर योग्य उपचार करणे आणि परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यात डहाणूचे प्रकल्पाधिकारी सत्यम गांधी यांना यश आले आहे. ३३२ दाखल विद्यार्थ्यांपैकी १९ विद्यार्थ्यांवर उपचार सुरू असून त्यांना संध्याकाळपर्यंत घरी सोडण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रफुल पाटील यांनी केली. 

टॅग्स :Studentविद्यार्थीfoodअन्नSchoolशाळा