शहरं
Join us  
Trending Stories
1
दिवाळीत एसटीने केली ३०१ कोटी रुपयांची कमाई, २७ ऑक्टोबरला केला एका दिवसात सर्वाधिक कमाईचा विक्रम 
2
लवकरच 'ट्रू कॉलर'ची सुट्टी! ट्राय अन् डॉटने घेतला मोठा निर्णय; बनावट कॉल, फसवणुकीला लगाम लागणार 
3
स्वच्छतेतून समृद्धीकडे! मोदी सरकारने कमालच केली; ३ आठवड्यात कचऱ्यातून कमावले तब्बल ३८७ कोटी
4
माणुसकीला काळिमा! पत्नीनेच ५५ वर्षीय पतीच्या प्रायव्हेट पार्टवर केला वार; कारण ऐकून बसेल धक्का
5
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची राफेलमधून सफर; २० मिनिटे पाहिली, भारताच्या नव्या योद्ध्याची ताकद...
6
दाऊद इब्राहिमचा विश्वासू दानिश ‘चिकना’ला गोव्यातून अटक; ड्रग्स सिंडिकेटवर NCBची मोठी कारवाई
7
रतन टाटांची 'टाटा' राहिली का? त्यांच्या 'या' पहिल्या खास व्यक्तीला बाहेरचा रस्ता दाखविला; कोण आहेत मिस्त्री?
8
"आता कर्ज घ्यावं लागेल..."; पाकिस्तानमध्ये एका टोमॅटोची किंमत ७५ रुपये, का वाढली महागाई?
9
"श्रेयस अय्यरची सर्जरी झालीच नाही," BCCIनी दिली वेगळीच माहिती, ताज्या अपडेटमध्ये नेमकं काय?
10
Bigg Boss 19: ये बात! महाराष्ट्रीयन भाऊने करुन दाखवलंच, प्रणित मोरे बनला 'बिग बॉस'च्या घरातील नवा कॅप्टन
11
मुलगा शिवसेनेचा आमदार! नारायण राणे म्हणतात, बाळासाहेब होते तोपर्यंतच शिवसेना होती, आजची...
12
Lenskart IPO: 'व्हॅल्युएशन'चा आकडा एवढा मोठा की वाचायला 'लेन्स'ची गरजच नाही; पण गुंतवणूकदारांना ते झेपेल का?
13
'त्या' भारतीय नागरिकाला आता होऊ शकते १० वर्षांची कैद अन् २.५ लाख डॉलर्सचा दंड! नेमकं प्रकरण काय?
14
निवडणुकांचा पत्ता नाही अन् शरद पवार गटाचा नगराध्यक्षपदाचा उमेदवार जाहीर; जयंत पाटील मैदानात
15
विवाह मुहूर्त: २०२५-२६ मध्ये फक्त ४९ दिवसच विवाह मुहूर्त; खरोखरंच करावी लागणार लगीन 'घाई'
16
कॅनडात भारतीय वंशाच्या उद्योगपतीची गोळ्या झाडून हत्या; लॉरेन्स बिश्नोई टोळीने घेतली जबाबदारी
17
निवडणूक बिहारमध्ये, चर्चा महाराष्ट्राच्या एकनाथ शिंदेंची; एनडीएला डिवचण्यासाठी विरोधकांकडून 'शिंदे मॉडेल'चा उल्लेख
18
आधी सिनेमातून काढलं अन् आता...; 'कल्कि'च्या मेकर्सची दीपिकाविरोधात पुन्हा खेळी; चाहते संतापले
19
सगळं संपलं असं वाटतंय? हातातून सर्व निसटून जातंय? स्वामींचे ‘हे’ शब्द नक्कीच प्रेरणा देतील!
20
प्रकट दिन २०२५: स्वामी अन् शंकर महाराजांची भेट कशी झाली? ब्रह्मांडनायक गुरुचा अद्भूत शिष्य

आश्रमशाळेत कच्च्या चपात्या, बेचव भाजी अन् अळणी भात; विद्यार्थ्यांनी मांडले जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांसमोर वास्तव

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2024 12:37 IST

या आश्रमशाळेतील मुलांच्या जेवणासाठी तालुकास्तरावरच किचन सुरू करण्यात यावे, अशी सूचना निकम यांनी केली आहे.

पालघर : आश्रमशाळेतील मुलांना निकृष्ट दर्जाचे जेवण दिले जात असून कच्च्या चपात्या, बेचव भाजी आणि अळणी भात मिळत असल्याची माहिती विद्यार्थ्यांनी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रकाश निकम यांच्यासमोरच दिली. या आश्रमशाळेतील मुलांच्या जेवणासाठी तालुकास्तरावरच किचन सुरू करण्यात यावे, अशी सूचना निकम यांनी केली आहे.

डहाणू आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत पालघर, डहाणू, तलासरी आणि वसई अशा चार तालुक्यांतील ३३ आश्रमशाळांमधून १,७०० विद्यार्थ्यांना बोईसर-कांबळगाव येथील सेंट्रल किचनमधून दररोज सकाळचा नाष्टा व दोनवेळचे जेवण पुरविले जाते. मंगळवारी ३३२ विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा झाल्याने त्यांना जिल्ह्यातील विविध शासकीय रुग्णालयांत दाखल करण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर बुधवारी अध्यक्ष निकम यांनी कासा येथे ग्रामीण रुग्णालयात जाऊन विद्यार्थ्यांची भेट घेऊन तब्येतीची विचारपूस केली आणि रणकोळ आश्रमशाळेत जाऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

कांबळगाव येथील सेंट्रल किचनची पाहणी करताना विद्यार्थ्यांसाठी बनवण्यात येणाऱ्या जेवणाची चव, प्रत कशी असते हे प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी अध्यक्षांनी विद्यार्थ्यांसोबत जेवण केले. यावेळी आजचे जेवण चांगले असून अन्य वेळी मिळणाऱ्या जेवणात मशिनवर बनवलेली कच्ची चपाती, पाण्यासारखी डाळ-भाजी, अळणी भात असे बेचव जेवण मिळत असल्याची भावना विद्यार्थ्यांनी दबक्या आवाजात आपल्याकडे व्यक्त केल्याचे निकम यांनी सांगितले. मध्यरात्री बनविलेले जेवण हे सेंट्रल किचनपासून सुमारे ५० ते ६० किलोमीटरच्या परिसरात असलेल्या आश्रमशाळांना वाहनातून वितरित केले जात असल्याने या अन्नावर त्याचा विपरीत परिणाम होत असावा, अशी शंका अध्यक्षांनी व्यक्त केली. 

परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यात यशडहाणू आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत ३१ आश्रमशाळांतील ३३२ विद्यार्थ्यांवर जेवणातून विषबाधा झाल्याने त्यांना विविध रुग्णालयांत दाखल केले होते. त्यांच्यावर योग्य उपचार करणे आणि परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यात डहाणूचे प्रकल्पाधिकारी सत्यम गांधी यांना यश आले आहे. ३३२ दाखल विद्यार्थ्यांपैकी १९ विद्यार्थ्यांवर उपचार सुरू असून त्यांना संध्याकाळपर्यंत घरी सोडण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रफुल पाटील यांनी केली. 

टॅग्स :Studentविद्यार्थीfoodअन्नSchoolशाळा