शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
2
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
3
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
4
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
5
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
6
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
7
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
8
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
9
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
10
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
11
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
12
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
13
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
14
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
15
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
16
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
17
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
18
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची
19
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...
20
भाजपच्या फायरब्रँड नेत्याने सोडला पक्ष; टी राजा सिंह यांचा राजीनामा, नाराजीचे कारण समोर

मच्छीमारांना बसत आहेत मत्स्य दुर्भिक्षाचे चटके; कोळीबांधव आर्थिक संकटात 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2020 23:04 IST

आर्थिक संकट : वादळे, अतिवृष्टी, अवकाळी पावसाचा हंगामाला बसला फटका

आशीष राणेवसई : मच्छी खाणाऱ्या खवय्यांसाठी पापलेट मासा हवा असतो, मात्र अलीकडे समुद्रात पापलेट दिसेनासे झाले आहे. मेहनत करूनही मोठ्या पापलेटच्या तुलनेत केवळ छोटी पापलेट जाळ्यात अडकू लागल्याने मच्छीमार हवालदिल झाले असून आर्थिक चिंतेत अडकले आहेत.

मासेमारीच्या हंगामाच्या सुरुवातीलाच वादळे, अतिवृष्टी, खराब हवामान, अवकाळी पाऊस आदीबाबतीत मासळीचे भाव गडगडले. त्यामुळे समस्त मच्छीमार समाजात निराशा पसरली असताना त्यात मोठे उत्पन्न देणाºया मासळीच्या दुर्भिक्ष्यामुळे मच्छी दुष्काळाचे संकट किनारपट्टीवर घोंगावू लागले आहे. दरम्यान, नव्या हंगामाच्या पहिल्या चार महिन्यात पुरेशा प्रमाणात उपलब्ध होणारे मोठे पापलेट आता समुद्रात मिळेनासे झाले आहे. मच्छीमार बांधव सांगतात की, छोट्या पापलेटला बाजारात भाव मिळत नसल्यामुळे मच्छीमारांचे अर्थकारण कोलमडले आहे.

पावसाळी मासेमारी बंदीनंतर गतवर्षी आॅगस्ट महिन्यात मासेमारीच्या नव्या हंगामाला सुरु वात झाली. हंगामाच्या सुरुवातीपासूनच ते साधारणत: नोव्हेंबरपर्यंत सुपर, एक नंबर, दोन नंबर अशा प्रतवारीतील मोठ्या आकाराचे पापलेट पुरेशा प्रमाणात उपलब्ध होतात. त्यातून मच्छीमारांना चांगले उत्पन्न मिळते. त्यामुळे पहिल्याच हंगामात जास्तीत जास्त मोठे पापलेट मिळवूनत्याद्वारे मिळणाºया उत्पन्नातून वर्षभरातील खर्चाची बेगमी करण्याचे मच्छीमारांचे प्रयत्न असतात. मात्र डिसेंबरपर्यंत मोठे पापलेट मिळेल या भरवशावर राहिलेल्या मच्छीमारांना या वेळी अगदी छोट्या आकाराची पापलेट जाळ्यात मिळत आहेत. आज वसई, नायगाव व अर्नाळा आदी ठिकाणी घाऊक मासळी बाजारात विक्र ीसाठी येणाºया मासळीमध्ये मोठे पापलेट खूपच कमी आणि छोट्या आकाराच्या पापलेटचे प्रमाण जास्त दिसून येते. परंतु या छोट्या पापलेटला अपेक्षित भाव मिळत नसल्याने बºयाच वेळेला मिळेल त्या भावात या माशांची विक्री करावी लागत आहे.मच्छीच्या वाढीस पुरेसा वेळ मिळावामासळीच्या वाढीला पुरेसा वेळ दिला जात नाही. त्यामुळे ही परिस्थिती उद्भवली आहे. गेल्या कित्येक वर्षापासून १५ मे ते १५ आॅगस्ट अशी तीन महिने मासेमारी बंद ठेवण्याची मागणी मच्छीमारांनी शासनाकडे केली आहे, मात्र या मागणीकडे शासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप स्थानिक मच्छीमार करीत आहेत.