शहरं
Join us  
Trending Stories
1
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
2
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
3
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
4
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
5
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
6
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
7
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
8
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
9
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
10
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
11
काश्मीरमध्ये ‘चिल्ला-ए-कलां’ प्रारंभ; प्रचंड थंडीच्या मोसमाची सुरुवात
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

मच्छीमारांना बसत आहेत मत्स्य दुर्भिक्षाचे चटके; कोळीबांधव आर्थिक संकटात 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2020 23:04 IST

आर्थिक संकट : वादळे, अतिवृष्टी, अवकाळी पावसाचा हंगामाला बसला फटका

आशीष राणेवसई : मच्छी खाणाऱ्या खवय्यांसाठी पापलेट मासा हवा असतो, मात्र अलीकडे समुद्रात पापलेट दिसेनासे झाले आहे. मेहनत करूनही मोठ्या पापलेटच्या तुलनेत केवळ छोटी पापलेट जाळ्यात अडकू लागल्याने मच्छीमार हवालदिल झाले असून आर्थिक चिंतेत अडकले आहेत.

मासेमारीच्या हंगामाच्या सुरुवातीलाच वादळे, अतिवृष्टी, खराब हवामान, अवकाळी पाऊस आदीबाबतीत मासळीचे भाव गडगडले. त्यामुळे समस्त मच्छीमार समाजात निराशा पसरली असताना त्यात मोठे उत्पन्न देणाºया मासळीच्या दुर्भिक्ष्यामुळे मच्छी दुष्काळाचे संकट किनारपट्टीवर घोंगावू लागले आहे. दरम्यान, नव्या हंगामाच्या पहिल्या चार महिन्यात पुरेशा प्रमाणात उपलब्ध होणारे मोठे पापलेट आता समुद्रात मिळेनासे झाले आहे. मच्छीमार बांधव सांगतात की, छोट्या पापलेटला बाजारात भाव मिळत नसल्यामुळे मच्छीमारांचे अर्थकारण कोलमडले आहे.

पावसाळी मासेमारी बंदीनंतर गतवर्षी आॅगस्ट महिन्यात मासेमारीच्या नव्या हंगामाला सुरु वात झाली. हंगामाच्या सुरुवातीपासूनच ते साधारणत: नोव्हेंबरपर्यंत सुपर, एक नंबर, दोन नंबर अशा प्रतवारीतील मोठ्या आकाराचे पापलेट पुरेशा प्रमाणात उपलब्ध होतात. त्यातून मच्छीमारांना चांगले उत्पन्न मिळते. त्यामुळे पहिल्याच हंगामात जास्तीत जास्त मोठे पापलेट मिळवूनत्याद्वारे मिळणाºया उत्पन्नातून वर्षभरातील खर्चाची बेगमी करण्याचे मच्छीमारांचे प्रयत्न असतात. मात्र डिसेंबरपर्यंत मोठे पापलेट मिळेल या भरवशावर राहिलेल्या मच्छीमारांना या वेळी अगदी छोट्या आकाराची पापलेट जाळ्यात मिळत आहेत. आज वसई, नायगाव व अर्नाळा आदी ठिकाणी घाऊक मासळी बाजारात विक्र ीसाठी येणाºया मासळीमध्ये मोठे पापलेट खूपच कमी आणि छोट्या आकाराच्या पापलेटचे प्रमाण जास्त दिसून येते. परंतु या छोट्या पापलेटला अपेक्षित भाव मिळत नसल्याने बºयाच वेळेला मिळेल त्या भावात या माशांची विक्री करावी लागत आहे.मच्छीच्या वाढीस पुरेसा वेळ मिळावामासळीच्या वाढीला पुरेसा वेळ दिला जात नाही. त्यामुळे ही परिस्थिती उद्भवली आहे. गेल्या कित्येक वर्षापासून १५ मे ते १५ आॅगस्ट अशी तीन महिने मासेमारी बंद ठेवण्याची मागणी मच्छीमारांनी शासनाकडे केली आहे, मात्र या मागणीकडे शासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप स्थानिक मच्छीमार करीत आहेत.