शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

मच्छीमारांना बसत आहेत मत्स्य दुर्भिक्षाचे चटके; कोळीबांधव आर्थिक संकटात 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2020 23:04 IST

आर्थिक संकट : वादळे, अतिवृष्टी, अवकाळी पावसाचा हंगामाला बसला फटका

आशीष राणेवसई : मच्छी खाणाऱ्या खवय्यांसाठी पापलेट मासा हवा असतो, मात्र अलीकडे समुद्रात पापलेट दिसेनासे झाले आहे. मेहनत करूनही मोठ्या पापलेटच्या तुलनेत केवळ छोटी पापलेट जाळ्यात अडकू लागल्याने मच्छीमार हवालदिल झाले असून आर्थिक चिंतेत अडकले आहेत.

मासेमारीच्या हंगामाच्या सुरुवातीलाच वादळे, अतिवृष्टी, खराब हवामान, अवकाळी पाऊस आदीबाबतीत मासळीचे भाव गडगडले. त्यामुळे समस्त मच्छीमार समाजात निराशा पसरली असताना त्यात मोठे उत्पन्न देणाºया मासळीच्या दुर्भिक्ष्यामुळे मच्छी दुष्काळाचे संकट किनारपट्टीवर घोंगावू लागले आहे. दरम्यान, नव्या हंगामाच्या पहिल्या चार महिन्यात पुरेशा प्रमाणात उपलब्ध होणारे मोठे पापलेट आता समुद्रात मिळेनासे झाले आहे. मच्छीमार बांधव सांगतात की, छोट्या पापलेटला बाजारात भाव मिळत नसल्यामुळे मच्छीमारांचे अर्थकारण कोलमडले आहे.

पावसाळी मासेमारी बंदीनंतर गतवर्षी आॅगस्ट महिन्यात मासेमारीच्या नव्या हंगामाला सुरु वात झाली. हंगामाच्या सुरुवातीपासूनच ते साधारणत: नोव्हेंबरपर्यंत सुपर, एक नंबर, दोन नंबर अशा प्रतवारीतील मोठ्या आकाराचे पापलेट पुरेशा प्रमाणात उपलब्ध होतात. त्यातून मच्छीमारांना चांगले उत्पन्न मिळते. त्यामुळे पहिल्याच हंगामात जास्तीत जास्त मोठे पापलेट मिळवूनत्याद्वारे मिळणाºया उत्पन्नातून वर्षभरातील खर्चाची बेगमी करण्याचे मच्छीमारांचे प्रयत्न असतात. मात्र डिसेंबरपर्यंत मोठे पापलेट मिळेल या भरवशावर राहिलेल्या मच्छीमारांना या वेळी अगदी छोट्या आकाराची पापलेट जाळ्यात मिळत आहेत. आज वसई, नायगाव व अर्नाळा आदी ठिकाणी घाऊक मासळी बाजारात विक्र ीसाठी येणाºया मासळीमध्ये मोठे पापलेट खूपच कमी आणि छोट्या आकाराच्या पापलेटचे प्रमाण जास्त दिसून येते. परंतु या छोट्या पापलेटला अपेक्षित भाव मिळत नसल्याने बºयाच वेळेला मिळेल त्या भावात या माशांची विक्री करावी लागत आहे.मच्छीच्या वाढीस पुरेसा वेळ मिळावामासळीच्या वाढीला पुरेसा वेळ दिला जात नाही. त्यामुळे ही परिस्थिती उद्भवली आहे. गेल्या कित्येक वर्षापासून १५ मे ते १५ आॅगस्ट अशी तीन महिने मासेमारी बंद ठेवण्याची मागणी मच्छीमारांनी शासनाकडे केली आहे, मात्र या मागणीकडे शासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप स्थानिक मच्छीमार करीत आहेत.