शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

मासेमारीला भरावाचा फटका

By admin | Updated: December 24, 2014 22:37 IST

: जेएनपीटी बंदराच्या अखत्यारीतील डी.पी. वर्ल्डनजीक चालू असणाऱ्या ३३० मीटरच्या नव्या जेटीच्या भरावांमुळे न्हावा, न्हावा खाडी आणि गव्हाण परिसरातील मासेमारी बाधित होत आहे.

उरण : जेएनपीटी बंदराच्या अखत्यारीतील डी.पी. वर्ल्डनजीक चालू असणाऱ्या ३३० मीटरच्या नव्या जेटीच्या भरावांमुळे न्हावा, न्हावा खाडी आणि गव्हाण परिसरातील मासेमारी बाधित होत आहे. त्यामुळे हजारो स्थानिक मच्छीमारांवर उपासमारीची वेळ येण्याची शक्यता आहे. याविरोधात आवाज उठवण्यासाठी येत्या सोमवारी उरणच्या करळ फाट्यावर रास्ता रोको करण्याचा निर्णय स्थानिकांनी घेतला आहे. या आंदोलनाबाबत जेएनपीटी प्रशासनाला १५ डिसेंबरलाच निवेदनाद्वारे कळविण्यात आले आहे. उरणच्या जेएनपीटी बंदराच्या विस्तारीकरणाचे काम गेल्या काही दिवसांपासून चालू आहे. हे काम करताना केवळ मासेमारीवर उदरनिर्वाह असणाऱ्या न्हावा, न्हावा खाडी आणि गव्हाण परिसरातील मासेमारांना आणि स्थानिकांना कोणत्याही प्रकारची नुकसान भरपाई जेएनपीटीने जाहीर केलेली नाही. न्हावा गाव आणि न्हावे खाडी गावातील ९० कुटुंबांचा आणि त्यावर आधारित नागरिकांच्या मासेमारी होड्या असून त्याद्वारे याच समुद्र किनाऱ्यावर मासेमारी केली जाते. गाव परिसरातील ४० टक्के लोकांचा खाजणी मासळी पकडण्याचा व्यवसाय आहे. त्याचप्रमाणे हाताने निवटे ढोसणे, कालवं काढणे, फळीवर जाऊन किळशी, वाव पकडणे आदी प्रकारची मासेमारी ही येथील नागरिकांकडून केली जाते. ४५ कुटुंबे कालवं निर्माणाचे दगडी बंधारे याच समुद्र किनाऱ्यावर करीत आहेत. मासेमारीशी संबंधित या सर्व व्यवसायांवर भरावामुळे परिणाम होत आहे. येथील नागरिकांना विस्तारित जेट्टीवर नोकऱ्या देण्यात प्राधान्य देण्याबरोबरच मासेमारांना प्रकल्पग्रस्त म्हणून दाखला, कालवं निर्माणासाठीच्या बंधाऱ्याच्या मालकांना प्रकल्पग्रस्त म्हणून दाखला देण्यात यावा त्याचबरोबर स्थानिकांना न्हावा ते घारापुरी या प्रवासाकरिता न्हावा गावाजवळ सुसज्ज जेट्टी उभारुन द्यावी, अशी मागणी न्हावा ग्रामसुधारणा मंडळाने दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे. या मागण्यांची पूर्तता करण्याबाबत त्वरित पावले न उचलल्यास २९ डिसेंबरला रास्ता रोको करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.करळ फाट्यावर रास्ता रोको करण्याची जोरदार तयारी सुरु आहे. त्यासाठी न्हावा आणि न्हावा खाडी गावात नागरिकांनी शंभर टक्के आंदोलनात उतरावे यासाठी गावबैठका घेण्यात येत असून या बैठकांनाही जोरदार पाठिंबा मिळत आहे.