शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

मीरा भाईंदरमध्ये पहाटेपर्यंत फोडले जात होते फटाके, प्रदूषणा मुळे हवा दुषित; दोन दिवसात २२ ठिकाणी आगीच्या घटना 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2025 16:29 IST

एकीकडे केवळ ग्रीन फटाके फोडण्यास मुभा असून फटाके फोडण्याची वेळ सकाळी ६ ते ७ आणि रात्री ८ ते १० इतकी घालुन दिलेली आहे. शिवाय शांतता क्षेत्रात व परिसरात १०० मीटर दरम्यान फटाके फोडण्यास मनाई आहे.

मीरारोड- फटाके फोडण्याच्या वेळेची मर्यादा रात्री १० वाजे पर्यंत असताना मीरा भाईंदर मध्ये मात्र पहाटे पर्यंत प्रचंड आवाज आणि प्रदूषण करणारे फटाके पोलिसांच्या नाका खाली फोडले जात आहेत. त्यातच फटाक्यांच्या प्रदूषणा मुळे शहराची हवेची गुणवत्ता अतिशय वाईट झाली असून फटाक्यांमुळे शहरात दोन दिवसात २२ ठिकाणी आगी लागल्या आहेत. 

एकीकडे केवळ ग्रीन फटाके फोडण्यास मुभा असून फटाके फोडण्याची वेळ सकाळी ६ ते ७ आणि रात्री ८ ते १० इतकी घालुन दिलेली आहे. शिवाय शांतता क्षेत्रात व परिसरात १०० मीटर दरम्यान फटाके फोडण्यास मनाई आहे. कांदळवन व ५० मीटर बफर झोन, इको सेन्सेटिव्ह झोन, वन हद्दीत देखील फटाके फोडण्यास मनाई आहे. 

परंतु यंदाच्या दिवाळीत महापालिका आणि पोलिसांच्या फटाके विक्रेत्यांशी झालेल्या संगनमताने कायदे - नियम व शासन आणि न्यायालय आदेश धाब्यावर बसवून रस्त्या लगत निवासी क्षेत्र, गर्दीच्या ठिकाणी सर्रास नियमबाह्य फटाके स्टॉल विक्रीला परवानग्या देण्यात आल्या आहेत. हवा आणि ध्वनी प्रदूषण कमी होईल याची काळजी घेण्या ऐवजी महापालिका व पोलिसांनी प्रदूषण करणारे आणि लोकांच्या जीवित - मालमत्तेला धोक्यात आणून फटाके विक्रीस मोकळीक दिली असल्याची टीका होत आहे. 

 फटाके फोडण्याची मर्यादा असताना देखील मीरा भाईंदर मध्ये सोमवारी, मंगळवारी दिवाळीच्या दोन्ही दिवशी तसेच बुधवारच्या पहाटे पर्यंत फटाके फोडले जात होते. शांतता क्षेत्र सह प्रतिबंधित क्षेत्रात पहाटे पर्यंत कानठळ्या बसवणारे आणि प्रचंड धूर करणारे फटाके फोडले गेले. पोलिसांनी दुर्लक्ष केल्याने शहरातील लाखो लोकांना याचा त्रास सहन करावा लागला. रुग्ण, वृद्ध, लहान बालके पासून सामान्य लोकांना फटाक्यांच्या आवाज मुळे झोप मिळाली नाही.  कानठळ्या बसवणारे आवाज आणि धुराच्या जाच आरोग्याला त्रासदायक ठरला. अनेकाना खोकला, श्वास घेण्यास त्रास झाला.

फटाक्यांच्या प्रदूषणा मुळे शहरातील हवेत सर्वत्र घातक विषारी धुराचे थर साचलेले दिसून आले. रात्रीच्या वेळी तर हवा आरोग्यासाठी अतिशय धोकादायक ठरली. धुरा मुळे अनेकांना श्वास घेणे अवघड जात होते. नाईलाजाने लोकांना प्रदूषित धूर श्वासा द्वारे घ्यावा लागला. प्रदूषण नियंत्रण मंडळाने तर शहराच्या बाहेर मोकळ्या मैदानात हवेची गुणवत्ता मोजणारी यंत्रणा बसवण्याची चलाखी केली आहे. मात्र सर्वत्रच हवेची गुणवत्ता अतिशय खराब झालेली होती. 

फटाक्यांची मोकळीक असल्याने सोमवारी आणि मंगळवारी २२ ठिकाणी आगी लागल्याच्या घटना घडल्या आहेत. अग्निशमन दलाने दिलेल्या आकडेवारी नुसार २२ घटनां मध्ये मुख्यत्वे कचऱ्याचे ढीग, काही घरे व गोदामचा समावेश आहे. भाईंदर पूर्वेच्या जेसल पार्क खाडी किनारी कांदळवन क्षेत्रात तर प्रचंड प्रमाणात मध्यरात्री नंतर देखील फटाके फोडले जात होते. विशेष म्हणजे येथे नवघर पोलीस चौकी तसेच सहायक पोलीस आयुक्त कार्यालय देखील आहे.

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदरfire crackerफटाके