शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
2
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
3
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
4
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
5
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
6
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
7
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
8
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
9
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
10
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
11
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
12
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
13
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
14
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
15
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
16
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
17
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
18
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
19
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
20
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत

एडवण किनाऱ्यावर भीषण आग, नागरी वस्ती बचावली

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2018 02:15 IST

पालघर जिल्ह्यातील समुद्र किनाºयावर साठलेल्या तेल मिश्रित डांबर गोळ्यांनी स्वच्छ आणि सुंदर किनारे विद्रुप केले जात असतांना सोमवारी एडवणच्या किना-यावर साचलेले डांबर गोळे अचानक पेटल्याने लागलेल्या आगीने क्षणार्धात रौद्ररुप धारण केले.

- हितेन नाईकपालघर - जिल्ह्यातील समुद्र किनाºयावर साठलेल्या तेल मिश्रित डांबर गोळ्यांनी स्वच्छ आणि सुंदर किनारे विद्रुप केले जात असतांना सोमवारी एडवणच्या किना-यावर साचलेले डांबर गोळे अचानक पेटल्याने लागलेल्या आगीने क्षणार्धात रौद्ररुप धारण केले. किनारपट्टीवरील बागायती क्षेत्राला याची मोठी झळ पोहचण्याचा धोका निर्माण झाल्याने ग्रामस्थांसह अग्निशमन जवानांनी या आगीवर नियंत्रण मिळविल्याने आसपासची घरे मात्र थोडक्यात बचावली.जिल्ह्याच्या १०७ किमीची किनारपट्टी अनेक खाड्या, खाजणे, नाले औद्योगिक वसाहती मधून कोणतीही प्रक्रि या न करता सोडण्यात येणाºया प्रदूषित पाण्यामुळे काळवंडली आहे. त्यामुळे अनेक गावपाडे विविध प्रदूषणाने ग्रासले आहेत. कॅन्सर, त्वचा रोग, श्वसनाच्या विविध विकारांनी लोक मृत्युमुखी पडू लागले आहेत. जहाजे आपले टाकाऊ तेल व उत्सर्जके समुद्रात टाकत असल्याने समुद्राच्या पृष्ठभागावर तवंग दिसण्यात सध्या वाढ होऊ लागली आहे. मागच्या काही वर्षभरात सुमारे १० हजार तेल वाहतूक करणार्या जहाजाना जलसमाधी मिळाल्याने हा साठा मासेमारीला मारक ठरतो आहे.ओएनजीसी कंपनी कडून समुद्रात तेल,खिनज द्रव्याच्या शोधार्थ महाकाय बोटी द्वारे प्रत्येक वर्षात केल्या जाणाºया उत्खननामुळे आणि तेल काढण्याच्या प्रक्रियेदरम्यान समुद्रात पडणाº्या तेला मुळे समुद्रात ही काही भागात तवंग दिसू लागले आहेत. तेल उत्खननादरम्यान आणि त्यांच्या फ्लॅटफॉर्म वरून पडणारे तेल भरतीच्या वेळी किनार्यालगत येते आहे तर सध्या जिल्ह्यातील सर्वच किनार्यावर डांबर गोळ्यांचा प्रदूषित कचरा मोठ्या प्रमाणात जमल्याचे दिसत असून सोमवारी दुपारी एडवण, कोरे ह्या गावसमोरील किनार्यावर जमलेल्या डांबर गोळ्यांनी अचानक पेट घेतला होता. २५ ते ३० फुटांच्या ज्वाला उसळल्याने उपसरपंच सचिन वर्तक ह्यांनी आपत्कालीन व्यवस्थापन विभागाचे अधिकारी कदम यांना त्याची माहिती देऊन मदत मागितली.पालघर नगरपरिषदेच्या अग्निशमन सेवेचा बंब पोचण्या आधीच उपसरपंच वर्तक , दिपेश ठाकुर, प्रभाकर ठाकूर , उसरणी सरपंच हरेंद्र पाटील,विकास राऊत , ग्रामविकास अधिकारी तुरबाडकर, विकास वर्तक व कुलदीप वर्तक व इतरांनी किनार्यावरील माती आणि पाण्याच्या सहाय्याने आगीवर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न सुरू ठेवला होता. त्यामुळे ती नियंत्रणात आली.निर्मल सागर तट अभियान बारगळले?निर्मल सागर तट अभियाना अंतर्गत झाई, बोर्डी, घोलवड, चिखले, नरपड, चिंचणी, सातपाटी, शिरगाव, एडवन, माहीम, केळवे, अर्नाळा, कळंब, रानगाव ह्या ग्रामपंचायतींना २०पासून ते १४लाखाचा निधी देणार होते.मात्र एडवण सह अनेक ग्राम पंचायतींना ५ ते ६ लाखाच्या वर पैसेच मिळाले नाही. ते मिळाले असते तर आम्ही स्वच्छता ठेवली असती व हा प्रसंग घडला नसता असे सरपंच अरु णा तरे ह्यानी लोकमतला सांगितले.

टॅग्स :fireआगVasai Virarवसई विरार