शहरं
Join us  
Trending Stories
1
"राजकारण बंद करेन, पण आता..."; काँग्रेसमध्ये प्रवेश करताच प्रशांत जगतापांनी मांडली भूमिका
2
पाकिस्तानला अजूनही 'ऑपरेशन सिंदूर'ची भीती! सीमेवर अँटी-ड्रोन सिस्टीम बसवले
3
ठाकरे-शिंदेंनी प्रयत्न केले, पण अखेर काँग्रेसमध्ये गेले; प्रशांत जगताप यांची राजकीय कारकीर्द
4
भाजपानं 'या' राज्यात इतिहास रचला, पहिल्यांदाच पक्षाचा महापौर बनला; विधानसभा निवडणुकीपूर्वी मोठा संकेत
5
"आम्हाला मुलांमध्ये अजिबात रस नाही"; २ मैत्रिणी एकमेकींच्या प्रेमात झाल्या वेड्या, बांधली लग्नगाठ
6
Swami Samartha: आपल्यावर सद्गुरू कृपा आहे की नाही हे ओळखण्याचा सोपा मार्ग जाणून घ्या
7
५२ आठवड्यांच्या उच्चांकी स्तरावर 'हा' शेअर; आज जोरदार तेजी, चांदीतील तेजी ठरतेय कारण
8
जयंत पाटील 'मातोश्री'वर उद्धव ठाकरेंच्या भेटीला; मुंबईत NCP शरद पवार गट ठाकरे बंधूंसोबत येणार?
9
"हॉस्पिटलनेच माझ्या पतीला मारलं, मला म्हणाले..."; पत्नीने सांगितली काळजात चर्र करणारी गोष्ट
10
महायुतीचा फॉर्म्युला ठरला, मुंबईत जागावाटपाचा तिढा सुटला; भाजपा-शिंदेसेना किती जागा लढणार?
11
२ देशांसोबत मिळून चीननं शेजारील देशात चढवला जोरदार हल्ला, ४५४ इमारती उद्ध्वस्त; शेकडो अटकेत
12
नोकरी गेली तरी आर्थिक चक्र थांबू नका! संकटकाळात EMI आणि SIP चे व्यवस्थापन कसे कराल? तज्ज्ञांचा सल्ला
13
मोहम्मद युनूस यांचा तो एक निर्णय, ज्यामुळे बांगलादेश आज हिंसाचाराच्या आगीत होरपळतोय...
14
कोणती सरकारी बँक देतेय सर्वात स्वस्त पर्सनल लोन? कोणत्याही बँकेतून कर्ज घेण्यापूर्वी पाहा डिटेल्स
15
UPSC यशानंतर IPS अधिकारी बनली पूर्वा चौधरी, सौंदर्यासोबतच वादामुळे चर्चेत, जाणून घ्या प्रकरण
16
कोकण रेल्वेची प्रवाशांना मोठी भेट; मुंबईतून सुटणाऱ्या ‘या’ ट्रेनचे कोच कायमस्वरुपी वाढले
17
सोनं विक्रमी उच्चांकावर, चांदी एका झटक्यात १३११७ रुपयांनी उसळली! पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
काँग्रेसची १२५हून अधिक तिकिटे फायनल; प्रदेश निवड समितीच्या बैठकीत १५ मिनिटांत आटोपली चर्चा
19
"२१ कोटींची मागणी आणि...", अक्षय खन्नाची 'दृश्यम ३' सिनेमातून एक्झिट, अखेर खरं कारण समोर
20
MS Dhoni Pension: बीसीसीआय महेंद्रसिंह धोनीला किती पेन्शन देते? जाणून घ्या!
Daily Top 2Weekly Top 5

एडवण किनाऱ्यावर भीषण आग, नागरी वस्ती बचावली

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2018 02:15 IST

पालघर जिल्ह्यातील समुद्र किनाºयावर साठलेल्या तेल मिश्रित डांबर गोळ्यांनी स्वच्छ आणि सुंदर किनारे विद्रुप केले जात असतांना सोमवारी एडवणच्या किना-यावर साचलेले डांबर गोळे अचानक पेटल्याने लागलेल्या आगीने क्षणार्धात रौद्ररुप धारण केले.

- हितेन नाईकपालघर - जिल्ह्यातील समुद्र किनाºयावर साठलेल्या तेल मिश्रित डांबर गोळ्यांनी स्वच्छ आणि सुंदर किनारे विद्रुप केले जात असतांना सोमवारी एडवणच्या किना-यावर साचलेले डांबर गोळे अचानक पेटल्याने लागलेल्या आगीने क्षणार्धात रौद्ररुप धारण केले. किनारपट्टीवरील बागायती क्षेत्राला याची मोठी झळ पोहचण्याचा धोका निर्माण झाल्याने ग्रामस्थांसह अग्निशमन जवानांनी या आगीवर नियंत्रण मिळविल्याने आसपासची घरे मात्र थोडक्यात बचावली.जिल्ह्याच्या १०७ किमीची किनारपट्टी अनेक खाड्या, खाजणे, नाले औद्योगिक वसाहती मधून कोणतीही प्रक्रि या न करता सोडण्यात येणाºया प्रदूषित पाण्यामुळे काळवंडली आहे. त्यामुळे अनेक गावपाडे विविध प्रदूषणाने ग्रासले आहेत. कॅन्सर, त्वचा रोग, श्वसनाच्या विविध विकारांनी लोक मृत्युमुखी पडू लागले आहेत. जहाजे आपले टाकाऊ तेल व उत्सर्जके समुद्रात टाकत असल्याने समुद्राच्या पृष्ठभागावर तवंग दिसण्यात सध्या वाढ होऊ लागली आहे. मागच्या काही वर्षभरात सुमारे १० हजार तेल वाहतूक करणार्या जहाजाना जलसमाधी मिळाल्याने हा साठा मासेमारीला मारक ठरतो आहे.ओएनजीसी कंपनी कडून समुद्रात तेल,खिनज द्रव्याच्या शोधार्थ महाकाय बोटी द्वारे प्रत्येक वर्षात केल्या जाणाºया उत्खननामुळे आणि तेल काढण्याच्या प्रक्रियेदरम्यान समुद्रात पडणाº्या तेला मुळे समुद्रात ही काही भागात तवंग दिसू लागले आहेत. तेल उत्खननादरम्यान आणि त्यांच्या फ्लॅटफॉर्म वरून पडणारे तेल भरतीच्या वेळी किनार्यालगत येते आहे तर सध्या जिल्ह्यातील सर्वच किनार्यावर डांबर गोळ्यांचा प्रदूषित कचरा मोठ्या प्रमाणात जमल्याचे दिसत असून सोमवारी दुपारी एडवण, कोरे ह्या गावसमोरील किनार्यावर जमलेल्या डांबर गोळ्यांनी अचानक पेट घेतला होता. २५ ते ३० फुटांच्या ज्वाला उसळल्याने उपसरपंच सचिन वर्तक ह्यांनी आपत्कालीन व्यवस्थापन विभागाचे अधिकारी कदम यांना त्याची माहिती देऊन मदत मागितली.पालघर नगरपरिषदेच्या अग्निशमन सेवेचा बंब पोचण्या आधीच उपसरपंच वर्तक , दिपेश ठाकुर, प्रभाकर ठाकूर , उसरणी सरपंच हरेंद्र पाटील,विकास राऊत , ग्रामविकास अधिकारी तुरबाडकर, विकास वर्तक व कुलदीप वर्तक व इतरांनी किनार्यावरील माती आणि पाण्याच्या सहाय्याने आगीवर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न सुरू ठेवला होता. त्यामुळे ती नियंत्रणात आली.निर्मल सागर तट अभियान बारगळले?निर्मल सागर तट अभियाना अंतर्गत झाई, बोर्डी, घोलवड, चिखले, नरपड, चिंचणी, सातपाटी, शिरगाव, एडवन, माहीम, केळवे, अर्नाळा, कळंब, रानगाव ह्या ग्रामपंचायतींना २०पासून ते १४लाखाचा निधी देणार होते.मात्र एडवण सह अनेक ग्राम पंचायतींना ५ ते ६ लाखाच्या वर पैसेच मिळाले नाही. ते मिळाले असते तर आम्ही स्वच्छता ठेवली असती व हा प्रसंग घडला नसता असे सरपंच अरु णा तरे ह्यानी लोकमतला सांगितले.

टॅग्स :fireआगVasai Virarवसई विरार