शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

तीन तासांत आगीवर नियंत्रण; दोन लाख लीटर पाण्याचा वापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2020 00:44 IST

अडीच हजार ली. फोमचा वापर; ५० जवानांचा समावेश

- पंकज राऊतबोईसर : तारापूर औद्योगिक क्षेत्रातील रासायनिक कारखान्यात मंगळवारी संध्याकाळी लागलेली भीषण आग नियंत्रणात आणण्यासाठी विविध अग्निशमन दलाचे आठ बंब, ५० जवान आणि काही अधिकाऱ्यांनी तीन तास अत्यंत धोका पत्करुन झुंज दिली. ही आग विझवण्यासाठी जवळपास दोन लाख ली. पाणी तर अडीच हजार ली. फोमचा वापर करावा लागला.

औद्योगिक क्षेत्रातील हरशूल केमिकल्स प्रा.लि. (मे. श्री. साई एंटरप्राइजेस ) प्लॉट नं. टी १०१ या रासायनिक कारखान्याला आग लागल्याची वर्दी महाराष्ट्र औद्योगिक विकास मंडळाच्या तारापूर येथील अग्निशामन दलाला मंगळवारी संध्याकाळी साडे पाचच्या सुमारास मिळाली. त्यानंतर काहीच मिनिटांनी तारापूर अग्निशमन दलाची दोन वाहने प्रथम घटनास्थळी पोहोचली. तेव्हा कारखान्याच्या संपूर्ण परिसरात आग पसरली होती. आगीने रौद्ररूप धारण केले होते. तर ज्वलनशील रसायनांची भरलेली पिंपे फुटून आग अधिकच भडकत होती.

बघता बघता आग शेजारच्या केशवा आॅरगॅनिक कंपनीच्या काही भागापर्यंत पोहोचून मोठा धोका निर्माण झाला. अशावेळी सुरक्षेसाठी पाणी मारून, कुलिंग करून आग थोपवून धरल्याने तो कारखाना आगीपासून वाचवण्यात आला. असे असले तरी त्या कारखान्याची एअर हॅन्डलिंग सिस्टीम आणि इलेक्ट्रिक केबल पूर्णपणे जळून गेल्याने विद्युत पुरवठा खंडित झाला. दुरुस्तीसाठी काही दिवस कारखाना बंद राहणार असून यात जवळपास एक कोटी रुपयाचे नुकसान झाल्याचे कारखान्याचे मालक डी. के. राऊत यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

आग विझविण्यासाठी एम.आय.डी.सी. अग्निशमन दलाचे ३, बी.ए.आर.सी., पालघर नगर परिषद, डहाणू अदाणी थर्मल पॉवर, डहाणू नगर परिषद, वसई - विरार महानगरपालिका यांच्या अग्निशमन दलाच्या प्रत्येकी एक अशा एकूण ८ गाड्या घटनास्थळी होत्या. त्यांना आठ टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात आला. बोईसर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रदीप कसबे अधिकारी आणि पोलीस कर्मचाऱ्यांना घेऊन घटनास्थळी उपस्थित होते. अग्निशमन दलाचे जवान आणि अधिकाºयांएवढीच त्यांचीही भूमिका महत्त्वाची होती.

कारखान्यातील प्लास्टिक ड्रमचा वितळून लगदा केमिकल ट्रान्सफर करताना अर्थिंग दिली असताना स्पार्क होऊन आग लागल्याचे कंपनीच्या मालकांकडून अग्निशमन दलाच्या अधिकाºयांना सांगण्यात आले. या कारखान्यातील कच्च्या आणि पक्क्या मालासहकारखाना जळून गेल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या कारखान्याच्या मार्जिन स्पेसमधेच रसायनांनी भरलेली पिंपे असल्याने आग विझविण्यासाठी अडचणी येत होत्या. त्यावर मात करून तारापूरअग्निशमन दलाचे अग्निशमन अधिकारी मनीष सावंत यांच्या नेतृत्वाखाली सर्वांनी जीव धोक्यात घालून भीषण आग तीन तासात नियंत्रणात आणली. आगीत हा संपूर्ण कारखाना भस्मसात झाला आहे.

टॅग्स :Vasai Virarवसई विरारfireआगMaharashtraमहाराष्ट्र