शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

तारापूर एमआयडीसीत रासायनिक कंपनीला आग 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2024 14:51 IST

आगीने रौद्ररूप धारण केल्याने आग इतरत्र पसरली. रविवारी कंपनीला सुट्टी असल्यामुळे कारखान्यात सुरक्षा कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त कोणीही उपस्थित नव्हते.

बोईसर : तारापूर एमआयडीसीतील के-७ प्लॉटमधील यू. के. ॲरोमॅटिक या अगरबत्ती व अगरबत्तीला लागणाऱ्या केमिकल बनवणाऱ्या रासायनिक कारखान्याला रविवारी संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास भीषण आग लागली. आगीने रौद्ररूप धारण केल्याने आग इतरत्र पसरली. रविवारी कंपनीला सुट्टी असल्यामुळे कारखान्यात सुरक्षा कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त कोणीही उपस्थित नव्हते.

धुराचे लोट दूरवरकारखान्यातील ज्वलनशील रसायनाचा स्फोट होऊन आग भडकत होती, तर जळते रसायन गटारातून वाहत येत असल्याने आग रस्त्यापर्यंत पोहोचली होती.  धुराचे लोट दूरपर्यंत पसरले होते. घटनास्थळी पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील, पोलिस निरीक्षक शिरीष पवार उपस्थित होते. 

सर्व रस्ते केले होते बंदसुरक्षिततेचा उपाय म्हणून पोलिसांनी घटनास्थळाकडे जाणारे सर्व रस्ते बंद केले होते. घटनास्थळाहून सुमारे २०० मीटर दूर व रस्त्यापलीकडे असलेल्या बिंदिका कंपनीपर्यंत आग पोहोचली होती. मात्र, अग्निशमन दलाने आग वेळेत नियंत्रणात आणल्याने मोठा अनर्थ टळला. 

आग नियंत्रणात आणली-आग विझवण्यासाठी एमआयडीसीच्या अग्निशमन दलासह तारापूर अणुऊर्जा केंद्र, पालघर, डहाणू व वसई-विरार नगर परिषदेच्या आणि डहाणूतील अदानी पॉवर इत्यादी ठिकाणांहून अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल होऊन आगीशी झुंज देत होत्या. -आग शेजारच्या श्री केमिकल व आदर्श कंपनीसह अन्य कारखान्यांत पोहोचू नये म्हणून शर्थीचे प्रयत्न सुरू होते.

टॅग्स :fireआग