शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे म्हणाले, 'आता माझी सटकली, आता तुमची...' एकनाथ शिंदेंनी दिलं असं प्रत्युत्तर
2
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
3
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
4
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
6
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
7
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
8
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
9
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
10
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
11
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
12
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
13
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
14
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
15
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
16
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
17
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
18
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
19
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
20
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका

मासेमारीबंदीच्या फतव्याने तीव्र नाराजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2019 11:51 PM

६१ दिवसांच्या कालावधीचे परिपत्रक : यांत्रिक नौकांद्वारे मासेमारीवर बंदी, मत्स्यदुष्काळाला जणू आमंत्रणच

- हितेन नाईक

पालघर : १५ मे ते १५ आॅगस्ट अशी ९१ दिवसांची मासेमारी बंदी कालावधीची मच्छिमारांची मागणी धुडकावून लावीत मत्स्यव्यवसाय विभागाने पुन्हा १ जून ते ३१ जुलै अशी केवळ ६१ दिवसाच्या मासेमारी बंदी कालावधीचे परिपत्रक काढल्याने मच्छिमारामधून तीव्र नापसंती व्यक्त केली जात आहे.

जिल्ह्यातील वसई तालुक्यातील वसई, अर्नाळा, पाचूबंदर, नायगाव तर पालघर तालुक्यातील सातपाटी, मुरबे, डहाणू तालुक्यातील डहाणू, धाकटी डहाणू, झाई-बोर्डी या भागातील बाराशे ते पंधराशे मच्छिमार बोटीद्वारे पापलेट, दाढा, घोळ, शेवंड, बोंबील आदी माश्यांची मासेमारी केली जात असून दिवसेंदिवस मत्स्य उत्पादनात घट होत आहे. पापलेट, दाढा, घोळ, बोंबील, शेवंड आदी मच्छिमाराना आर्थिक स्थैर्य देणाऱ्या मत्स्यसंपदा नामशेष होतात की काय अशी अवस्था निर्माण झाल्याने जिल्ह्यातील सर्व मच्छिमार सहकारी संस्था आणि त्यांच्या संघटनांनी १५ मे ते १५ आॅगस्ट अशी ९१ दिवसाची मासेमारी बंदीचा कालावधी जाहीर करण्याची मागणी शासन दरबारी अनेक वर्षापासून केली आहे. समुद्रात माश्यांनी टाकलेल्या अंड्यातून निघालेल्या लहान पिल्लाची होणारी मासेमारी (कत्तल) थांबून मत्स्य उत्पादनात वाढ व्हावी हा त्या मागचा उद्देश होता. मात्र या मागणीचा कुठलाही सकारात्मक विचार न करता शासनाने पुन्हा १ जून ते ३१ जुलै असा अवघ्या ६१ दिवसाची बंदी घोषित करून मत्स्यदुष्काळाला जणू आमंत्रणच दिल्याची भावना मच्छिमारामधून व्यक्त केली जात आहे.

पालघर जिल्ह्यातील हजारो बोटधारक खरेतर १ मेपासूनच मासेमारी बंदी कालावधीची अंमलबजावणी करण्याची तयारी करीत आपल्या बोटी स्वत:हून किनाºयावर नांगरून ठेवण्याचे काम हाती घेतात. सातपाटीमधील दोन्ही सहकारी संस्थानी मागील १२-१५ वर्षापूर्वी १५ मेपासूनच आपल्या सुमारे ४५० बोटींची मासेमारी उत्स्फूर्तपणे बंद करून रत्नागिरी ते गुजरात दरम्यानच्या सहकारी संस्थांना भेट देत मे महिन्यापासून मासेमारी बंदीबाबत जनजागृती सुरू केली होती. त्याची अंमलबजावणी आताही सुरूच असल्याचे विनोद पाटील यांनी सांगितले. मच्छिमाराकडून मत्स्य उत्पादन वाढीसाठी प्रयत्न केले जात असताना काही मत्स्यव्यवसाय अधिकारी शासनाची दिशाभूल करून १ जून ते ३१ जुलै अशी मर्यादित मासेमारी बंदी घोषित करीत असल्याचे काही मच्छिमारांनी सांगितले.१ जून ते जुलैअखेर यांत्रिक नौकांद्वारे मासेमारीवर बंदी, डोलारा कोसळतोयमासळीच्या साठ्यांचे जतन तसेच मच्छिमारांच्या जीवित वा वित्त यांचे रक्षण व्हावे यासाठी महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम, १९८१ च्या अधिकारान्वये १ जून ते ३१ जुलै या कालावधीसाठी समुद्रात यांत्रिक बोटींना मासेमारी करण्यास बंदी घालण्यात आल्याचे आदेश मत्स्यव्यवसाय विभागाच्या आयुक्तांनी काढला आहे.जून आणि जुलै महिन्यात सागरी जीवांना प्रजोत्पादनास पोषक वातावरण असते. या कालावधीत मासेमारी बंदीमुळे मासळीच्या बीजनिर्मिती प्रक्रि येला वाव मिळून मत्स्यसाठ्याचे जतन होते. तसेच खराब आणि वादळी हवामानामुळे मच्छिमारांची जीवित व वित्त हानी टाळणे शक्य होते. त्यामुळे सागर किनाºयापासून १२ सागरी मैलापर्यंत या राज्याच्या जलधी क्षेत्रामध्ये यांत्रिक मासेमारी नौकांना मासेमारी बंदी लागू करण्यात आली आहे.बंदी कालावधीमध्ये मासेमारी करताना आढळल्यास महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियमानुसार गलबत आणि त्यात पकडण्यात आलेली मासळी जप्त करण्यासह कठोर कारवाई करण्यात येईल. मासेमारी करताना यांत्रिक नौकेस अपघात झाल्यास शासनाकडून देण्यात येणारी नुकसानभरपाई मिळणार नाही. ज्या मच्छिमार सहकारी संस्थांच्या मासेमारी नौका मासेमारी करताना आढळतील, अशा संस्थांनी पुरस्कृत केलेले अर्ज राष्ट्रीय सहकार विकास निगम योजनेच्या लाभासाठी विचारात घेतले जाणार नाहीत, असेही मत्स्यव्यवसाय आयुक्त कार्यालयाने स्पष्ट केले आहे.