शहरं
Join us  
Trending Stories
1
आता दोघांनीही थांबावे; डोनाल्ड ट्रम्प यांची भारत-पाकिस्तानमध्ये पुन्हा मध्यस्थीची ऑफर
2
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
3
भारताच्या एअर स्ट्राईकमुळे पाकिस्तानमध्ये कितीजण मृत्युमुखी पडले? आकडा आला समोर  
4
बहावलपूरवरील हल्ला पाकिस्तानी सैन्याच्या लागलाय जिव्हारी, कापलं गेलंय नाक, कारण काय?
5
पाकिस्तानच्या गोळीबारात भारतीय जवान शहीद; डॉक्टरांनी वाचविण्याचा खूप प्रयत्न केला...
6
नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून आगळीक, भारतीय नागरिकांच्या मृत्यूनंतर चोख प्रत्युत्तर देण्याचे लष्कराला आदेश 
7
‘ऑपरेशन सिंदूर’ला नागपुरातील ‘नागास्त्र-१’चे बळ ? टेहळणीसोबतच लक्ष्याचा भेद करण्याची क्षमता
8
पॉवरप्लेमध्ये अर्धा संघ तंबूत परतल्यावरही CSK नं काढली मॅच; प्लेऑफ्स शर्यतीत KKR तळ्यात मळ्यात
9
Operation Sindoor 2.0: पाकिस्तानला सहजासहजी सोडणार नाही भारत, आणखी काय-काय घडणार?
10
Thank You Rohit Sharma! हिटमॅनच्या कसोटी निवृत्तीनंतर कोण काय म्हणाले? वाचा सविस्तर
11
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे अवसान गळाले, आता म्हणतात, "आम्ही संयम पाळू, तणाव आणखी वाढता नये’’  
12
मुरिदकेमध्ये बड्या दहशतवाद्याचा खात्मा? पाकिस्तानी सैन्यातील अधिकाऱ्यांची अंत्ययात्रेला हजेरी   
13
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
14
'ऑपरेशन सिंदूर'बद्दल पंतप्रधान मोदींनी कालच दिले होते संकेत? 'त्या' वाक्यावरून रंगलीये चर्चा
15
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
16
Operation Sindoor Live Updates: पंजाबमधील अमृतसरमध्ये ब्लॅकआउट, लोकांना घरातच राहण्याचे आवाहन
17
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
18
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे माजी PM ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
19
अजिंक्य रहाणेचं अर्धशतक हुकलं; पण IPL मध्ये ५ हजार धावांचा पल्ला गाठत मारली खास क्लबमध्ये एन्ट्री
20
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."

कोरोनाच्या भीतीने व्यापाऱ्यांनी फिरवली पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2021 00:46 IST

कलिंगड उत्पादकांत चिंतेचे  वातावरण

- वसंत भोईरलोकमत न्यूज नेटवर्क वाडा : या वर्षी कोरोना मारामारीचे संकट, अवकाळी पाऊस पडल्याने भातपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. याही परिस्थितीत स्वतःला  सावरत तालुक्यातील शेतकऱ्यांनी कलिंगड शेती केली असून पीकही बहरून आले आहे,  मात्र या पिकाला तालुक्यात बाजारपेठ उपलब्ध नाही तसेच मालाच्या साठवणुकीसाठी गोडावून उपलब्ध नसल्याचा फायदा व्यापारी उठवत आहेत. त्यातच कोरोनाने परत डोके वर काढल्याने पुन्हा लाॅकडाऊन होण्याची भीती व्यापारी शेतकऱ्यांना दाखवत असून माल खरेदीसाठी येतच नाहीत. यामुळे बहरून आलेले कलिंगडचे उत्पादन कवडीमोल दराने विक्री करण्याची वेळ येथील शेतकऱ्यांवर आली आहे. 

 वाडा तालुक्यात भाताखालोखाल कडधान्याचे उत्पादन घेतले जाते. यामध्ये वाल, तूर, मूग, हरभरा, तीळ, उडीद, मटकी, चवळी, धणे, राई आदी रब्बी पिके घेतली जातात. परंतु या वर्षी हवामान बदलाचा फटका रब्बी पिकांना बसल्याने ही पिकेही शेतकऱ्यांच्या हातून गेलेलीच आहेत. यातून सावरण्यासाठी कर्जे काढून भाजीपाला, कलिंगड, टरबूज, पपई ही फळशेती करण्याचा प्रयत्न करून भातशेती, रब्बी पिकांतून झालेली हानी भरून काढण्याचा प्रयत्न येथील शेतकरी करू पाहत होता. कलिंगडचे पीकही बहरून आले आहे. मात्र खरेदी करणारे व्यापारी फिरकतच नसल्याने मातीमोल किमतीत कलिंगडची विक्री करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आल्याने बळीराजा मात्र आर्थिक संकटात सापडला आहे. निसर्गाचा लहरीपणा व कोरोना मारामारीचे संकट यावर मात करून येथील शेतकऱ्यांनी कलिंगडची उत्तम शेती केली आहे. पीकही बहरून आले आहे, मात्र योग्य दराने विक्री होत नसल्याची खंत येथील शेतकरी प्रकाश पष्टे यांनी व्यक्त केली.

कलिंगड खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांकडून पुन्हा  लाॅकडाऊन होणार असल्याची भीती कलिंगड उत्पादक शेतकऱ्यांना दाखवली जात आहे. यामुळे या उत्पादनातून झालेला खर्चही निघणार नसल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. कलिंगड शेतीसाठी मी दीड लाख रुपये कर्ज घेतले आहे. त्या कर्जाचा बोजा डोक्यावर चढणार असून घेतलेले कर्ज फेडणार कसे? व संसाराचे रहाटगाडगे हाकणार कसे? ही समस्या उभी राहिली आहे.- अरुण पष्टे, कलिंगड उत्पादक शेतकरी, डोंगस्ते