शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
3
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
4
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
5
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
6
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
7
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
8
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
9
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
10
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
11
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
12
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
13
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
14
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
15
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
16
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
17
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
18
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
19
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
20
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार

सुशोभीकरणाच्या कामामुळे चेंगराचेंगरी हाेण्याची भीती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2021 12:43 AM

भाईंदर महापालिकेचा भोंगळ कारभार : प्रवाशांचे होत आहेत हाल

लोकमत न्यूज नेटवर्क मीरा राेड : भाईंदर पश्चिमेस रेल्वे स्थानकाबाहेरील नियोजनशून्य सुशोभीकरणाच्या भोंगळ कामामुळे प्रवाशांचे अतोनात हाल होत आहेत. त्यामुळे चेंगराचेंगरीची भीती असल्याने उंच बांधलेले हे बांधकाम काढून रेल्वे स्थानकात तसेच तिकीट खिडकीकडे जाण्याचे मार्ग पूर्ववत करावेत, अशी मागणी त्यांनी केली आहे.

या कामासाठी तब्बल आठ कोटी रुपयांचे कंत्राट महापालिकेने दिले आहे. त्यानुसार ठेकेदाराने रस्त्याच्या लेव्हलपेक्षा सुमारे चार ते पाच फूट उंचीचा पाया बांधला आहे. यामुळे रस्ता अतिशय अरुंद झाला आहे. त्यातच तिथे रिक्षा उभ्या राहत असल्याने प्रवाशांना तिकीटघराकडे जाणे जिकिरीचे झाले आहे. एमबीएमटी, एसटी, बेस्ट ह्या सार्वजनिक परिवहन बस उपक्रमासह खाजगी बस, रिक्षा, खाजगी दुचाकी व चार चाकी वाहनांनी प्रवाशांची ये-जा याच भागातून होत असल्याने वाहतूककोंडीत प्रचंड भर पडली आहे. रेल्वे स्थानकाच्या पश्चिम दिशेला मुख्य रस्त्याने जोडणारा हा उत्तरेकडचा एकमेव भाग आहे. त्यामुळे रेल्वे स्थानकातून पश्चिमेला उतरणारे दोन मुख्य जिने उत्तरेकडे आणि मध्य भागातील मोठा जिनादेखील उत्तरेकडेच उतरतो. त्यामुळे ह्या तिन्ही जिन्यांनी ये-जा करणारे हजारो प्रवासी उत्तर दिशेच्या मार्गानेच बाहेर पडतात.मुंबई उच्च न्यायालयाने तर रेल्वे स्थानकांपासून १५० मीटर अंतरापर्यंत फेरीवालेसुद्धा बसू देऊ नका, असे आदेश दिलेले असताना सुशोभीकरणाच्या ह्या बांधकामामुळे प्रवाशांना प्रचंड अडथळा होत आहे. शिवाय फेरीवाले व दुचाकी वाहने यांचे अतिक्रमण आणखीनच जाचक ठरले आहे. त्यातच मध्ये लोखंडी खांब लावलेले असून यातून वाट काढणे जिकिरीचे होऊन वृद्ध, महिलांचीच नव्हेतर, पुरुषांचीसुद्धा दमछाक होत आहे.

सुमारे आठ कोटी रुपये खर्चून सुशोभीकरणाच्या नावाखाली नागरिकांच्या पैशांची उधळपट्टी करण्यापेक्षा येथे प्रशस्त व मोकळे मार्ग ठेवण्याची आवश्यकता आहे. रेल्वे स्थानकात पश्चिमेकडून ये-जा करण्यासाठी एकमेव मार्ग असून तोदेखील अरुंद व अतिक्रमणाच्या विळख्यात आहे. अव्यवस्था करून प्रवाशांचे हाल करण्यात महापालिका आणि नगरसेवकांना आनंद वाटतो का? हे बांधकाम काढून हा परिसर मोकळा करावा.     - दिनेश उले, प्रवासी 

टॅग्स :Vasai Virarवसई विरार