शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
3
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
4
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
5
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
6
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
7
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
8
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
9
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
10
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
11
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
12
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
13
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
14
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
15
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
16
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
17
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थयथयाट
18
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
19
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
20
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!

उच्च दाबाच्या विद्युत वाहिनीस शेतकऱ्यांनी दर्शवला विरोध, बाधित शेतकऱ्यांनी दिले निवेदन

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2021 00:50 IST

वाडा तालुक्यातील डाकिवली परिसरातून उच्चदाबाची विद्युतवाहिनी जात असून या वाहिनीचे मनोरे उभारण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.

वाडा : तालुक्यातील डाकिवली परिसरातून उच्चदाबाची विद्युतवाहिनी जात असून या वाहिनीचे मनोरे उभारण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. या वाहिनीमुळे शेतकरी देशोधडीला लागणार असल्याने शेतकऱ्यांनी या वाहिनीस विरोध दर्शवला आहे. वाहिनीचे काम बंद करावे. अन्यथा, जनआंदोलन उभारण्याचा इशारा शेतकऱ्यांनी प्रशासनाला तक्रारीद्वारे दिला आहे. २२० के.व्ही. तारापूर-बोरीवली आणि बोईसर-घोडबंदर, लीलो कुडूस अशी उच्च दाबाची विद्युत वाहिनी जात आहे.वाडा, वसई व पालघर या तालुक्यांतील गावे यामध्ये बाधित होणार आहेत. त्यासाठी ३० मीटर जागा संपादित करण्यात आली आहे. मात्र, हे करताना शेतकऱ्यांना विश्वासात न घेता किंवा पूर्वकल्पना न देता या वाहिनीचे मनोरे उभारण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. शेतकऱ्यांनी या वाहिनीला विरोध दर्शविला आहे. येथील शेतकरी हे अल्पभूधारक शेतकरी असल्याने आणि त्यांच्या लागवडी क्षेत्रातून वाहिनी जात असल्यामुळे बाधित शेतकऱ्यांचे लागवडी क्षेत्र संपुष्टात येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे. या जागेतून वाहिनी गेल्यास जमीन मातीमोल होणार असल्याने शेतकरी या वाहिनीला विरोध करीत आहेत. डाकिवली परिसरातून जाणारी ही विद्युत वाहिनी रद्द करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी तक्रारीत केली आहे. या तक्रारीवर डाकिवली व चांबळे येथील १२३ शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या असून, जिल्हाधिकारी पालघर, महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार आदींना या तक्रारींची प्रत देण्यात आली आहे. 

महापारेषण कंपनीने पूर्वी खदानलगतच्या जागेत केलेले सर्वेक्षण रद्द करून आता पूर्ण डाकिवली गावाला वळसा घालून अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या जागेतून ही वाहिनी नेत असून अनेक शेतकऱ्यांवर अन्याय करत आहेत. या वाहिनीमुळे आम्हा शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे.-विठ्ठल घरत, बाधित शेतकरी 

टॅग्स :electricityवीजVasai Virarवसई विरारFarmerशेतकरी