शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

शेतकऱ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न सुरू; उच्च दाबाच्या वाहिनीसाठी जागा न देण्याचा निर्धार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 23:08 IST

उच्च दाबाच्या वाहिनीसाठी जागा न देण्याचा निर्धार : पोलीस बळाचा वापर करू पाहत असल्याचा आरोप

वाडा : तालुक्यातील डाकिवली परिसरातून उच्च दाबाची विद्युत वाहिनी जात असून, या वाहिनीचे मनोरे उभारण्याचे काम महापारेषणने हाती घेतले आहे; मात्र या वाहिनीमुळे अनेक शेतकऱ्यांचे नुकसान होणार आहे. त्यामुळे वाहिनीस तीव्र विरोध दर्शवून जागा न देण्याचा निर्धार शेतकऱ्यांनी केल्याने महापारेषण आता पोलीस बळाचा वापर करू पाहात असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. 

गुरुवारी काही शेतकऱ्यांना वाडा पोलीस ठाण्यात बोलावून पोलीस निरीक्षक सुधीर संख्ये यांनी समज दिली. शेतकरी ऐकतच नसतील तर पोलीस बंदोबस्त घेऊन सरकारचा प्रकल्प पूर्ण करा, असे महापारेषणच्या अधिकाऱ्यांना संख्ये यांनी सांगितले. यावरून महापारेषण आता पोलीस बळाचा वापर करू पाहात असल्याचे स्पष्ट झाले आहे.

२२० के.व्ही. तारापूर-बोरीवली आणि बोईसर-घोडबंदर-कुडूस अशी उच्च दाबाची विद्युत वाहिनी जात आहे. वाडा, वसई व पालघर या तालुक्यातील गावे यामध्ये बाधित होणार आहेत. त्यासाठी ३० मीटर जागा संपादित करण्यात आली आहे; मात्र हे करताना शेतकऱ्यांना विश्वासात न घेता किंवा पूर्वकल्पना न देता या वाहिनीचे मनोरे उभारण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यातच सन २०१६ साली बनवलेल्या नकाशाप्रमाणे हे काम न करता महापारेषणने मनमानी कारभार करत आपल्या मर्जीप्रमाणे काम सुरू केले आहे. यात डाकिवली गावातील अनेक शेतकरी बाधित झाले आहेत. येथील बहुतांशी शेतकरी अल्पभूधारक असून, बाधित शेतकऱ्यांचे लागवडी क्षेत्र संपुष्टात येणार आहे. ज्या जमिनीतून ही वाहिनी जात आहे,  ती जमीन मातीमोल होणार असल्याने शेतकरी प्रचंड  संतापले आहेत.

शेतकरी तीव्र विरोध करत असल्याचे  महापारेषणच्या लक्षात आल्याने त्यांनी थेट पोलीस ठाणे गाठून शेतकऱ्यांना पोलीस ठाण्यात बोलावून घेतले. पोलीस निरीक्षक सुधीर संख्ये यांनी शेतकऱ्यांना हा सरकारचा प्रकल्प असून, त्याला विरोध करू नका, अशी समज दिली. तर शेतकऱ्यांचे कमीत कमी कसे नुकसान होईल, असे पाहा, असे महापारेषणच्या अधिकाऱ्यांना सांगितले. याउपर शेतकरी ऐकतच नसतील तर पोलीस अधीक्षकांकडून रीतसर पोलीस बंदोबस्त घ्या, असे पारेषणच्या अधिकाऱ्यांना सांगण्यात आले.

टॅग्स :Farmerशेतकरी