शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

जव्हारमध्ये बियाणे व खत खरेदीसाठी शेतकऱ्यांची झुंबड

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2019 00:13 IST

जुन च्या दुस-या आठवड्यात पावसाची चाहुल लागताच मंगळवारी ११ जुन २०१९ रोजी शेतकरी वर्गाने खत खरेदी करीता शहरात खत विक्रेत्यांकडे खत व बियाणे खरेदी करीता गर्दी केली होती.

- हुसेन मेमनजव्हार - जुन च्या दुस-या आठवड्यात पावसाची चाहुल लागताच मंगळवारी ११ जुन २०१९ रोजी शेतकरी वर्गाने खत खरेदी करीता शहरात खत विक्रेत्यांकडे खत व बियाणे खरेदी करीता गर्दी केली होती. जव्हार, मोखाडा, विक्रमगड तालुके हे आदिवासी तालुके असून येथील आदिवासी बांधवांचा मुख्य व्यवसाय शेती आहे. लाखो हेक्टरमध्ये येथे भात, गहू, ज्वारी, बाजरी, नागली, खूरासनी वगैरे पीक येथील शेतकरी लावतात. या पिकांकरीता येथील जमीन उपयुक्त ठरते त्यामुळे पावसाळ्यापुर्वी येथे खत खरेदीकरीता मोठी झूंबड उडतांन दिसत आहे.जव्हार तालुक्यातील शेतकऱ्यांची भात बियाणे जास्त प्रमाणात खरेदी करतात, त्यात प्रामुख्याने इंद्रायणी, सुवर्णा, डांगी, कसबय, सोनम, राशीपुनम, पाच ऐकी, मुंद्रायणी, सह्याद्री ६८९, कर्जत ४ ते १२, गुजरात, हे बियाणे हळवा भात म्हणून खरेदी करतात, तर मसुरा, कसबय, कर्जत ४, सुमा, एक काडी, कोलम, हे बीयाणे गरवा भात म्हणून खरेदी करतात. हळवा भात म्हणजे लवकर पिकणारा भात आहे, हे पीक १०० ते १२० दिवसांत पिकते, आणि गरवा भाताला १५० ते १८५ दिवस लागतात त्यामुळे हळवा भात बायाण्याला चांगलीच मागणी आहे. हळवा भात बियाणे प्रति किलो ८५ ते १७५ पर्यत, तर गरवा भात बीयाणा २५ किलो पोती, ९८ ते १९५ या दराने बाजारात उपलब्ध आहे.याच बरोबर प्रामुख्याने या भागात नागलीचे पिक मोठ्याप्रमाणात येथील शेतकरी घेतात. या भागात आदिवासी बांधव हे आपल्या कुटूंबाना वर्षभर पुरेल इतकी पेरणी करून थोडाफार पिक विक्री करता बाजारात आणतात. तसेच, वरई (वरी) बीयाणांची चलतीही मोठ्याप्रमाणात होते. या पिकाला बाजारात चांगली मागणी असल्यामुळे शेतकरी आप आपल्या आयपतीनुसार जागेच्या उपलब्धीनुसार पेरणी करून पिक घेतात.वरईची शेती ठरते नगदी शेतक-यांचा वाढता कलवरईला प्रोसेस करून भगर तयार करण्यात येते, तिला बाजारात जास्त मागणी असल्यामुळे ते नगदी ठरते. येथील शेतकरी वरईचे पीक मोठ्याप्रमाणात घेऊन उत्पन्नाचे स्त्रोत वाढवतात. प्रत्येक पीक घेण्यासाठी विविध प्रकाराचे खत व औषध शेतकºयांना लागत असते. पावसाळा जवळ आला की, खतांची खरेदी सुरू होते. परंतू पावसाळ्यापुर्वी खतांची मागणी जास्त असल्यामुळे भाव वाढ हाते, त्यामुळे शेतकºयांना वाढीव दराचा त्रास सोसावा लागत आहे.

टॅग्स :Vasai Virarवसई विरारFarmerशेतकरी