शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
2
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
3
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
4
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
5
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
6
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!
7
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...
8
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
9
आधार कार्डबाबतची 'ही' चूक केल्यास १० वर्षांचा तुरुंगवास! यूआयडीएआयने जारी केले कठोर नियम
10
Viral Video : चीनला पोहोचलेल्या भारतीय व्यक्तीने दाखवलं असं काही की पाहणारेही झाले थक्क! तुम्हीही कमाल बघाच
11
चिंता वाढली! एलियन्स, AI आणि तिसरे महायुद्ध; बाबा वेंगाची 2026 वर्षाबद्दल भविष्यवाणी काय?
12
'आता तुझ्यासोबत राहायचं नाही'; पतीपासून वेगळं राहणाऱ्या 28 वर्षीय महिलेवर अनेकवेळा बलात्कार
13
मनोज जरांगेंच्या बैठकीत मधमाशांचा हल्ला, सहकाऱ्यांनी अंगावर उपरणी टाकून पाटलांना वाचवलं
14
"माझ्याशी लग्न कर, तुला सगळ्या सिनेमात घेईन...", प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने अभिनेत्याला दिलेली ऑफर, नकार देताच करिअर संपवलं
15
हैदराबाद विद्यापीठाच्या निवडणुकीत ABVP चा मोठा विजय; NSUI ला नोटापेक्षा कमी मते...
16
VIRAL : फक्त तिकीटच नाही, तरुणीचे इन्स्टाग्राम अकाऊंटही तपासले! रेल्वेतील टीटीईचा धक्कादायक प्रताप
17
टॅरिफ, H1B व्हिसानंतर अमेरिकेचा आता भारतीय कोळंबीवर डोळा! मच्छीमारांवर संकट येणार?
18
पती, पत्नी आणि तो... वेगळचं प्रकरण! माहेर अन् सासरच्यांनी मिळून केलं विवाहितेचं अपहरण; पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
19
५००० परदेशी लोकांना नोकरीवर बसवले, १६ हजार अमेरिकींना काढले...; ट्रम्प प्रशासनाने H-1B चा पाढाच वाचला...
20
लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या गर्लफ्रेंडची हत्या; सुटकेसमध्ये भरून मृतदेह १०० किमी दूर नदीत फेकला

जव्हारमध्ये बियाणे व खत खरेदीसाठी शेतकऱ्यांची झुंबड

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2019 00:13 IST

जुन च्या दुस-या आठवड्यात पावसाची चाहुल लागताच मंगळवारी ११ जुन २०१९ रोजी शेतकरी वर्गाने खत खरेदी करीता शहरात खत विक्रेत्यांकडे खत व बियाणे खरेदी करीता गर्दी केली होती.

- हुसेन मेमनजव्हार - जुन च्या दुस-या आठवड्यात पावसाची चाहुल लागताच मंगळवारी ११ जुन २०१९ रोजी शेतकरी वर्गाने खत खरेदी करीता शहरात खत विक्रेत्यांकडे खत व बियाणे खरेदी करीता गर्दी केली होती. जव्हार, मोखाडा, विक्रमगड तालुके हे आदिवासी तालुके असून येथील आदिवासी बांधवांचा मुख्य व्यवसाय शेती आहे. लाखो हेक्टरमध्ये येथे भात, गहू, ज्वारी, बाजरी, नागली, खूरासनी वगैरे पीक येथील शेतकरी लावतात. या पिकांकरीता येथील जमीन उपयुक्त ठरते त्यामुळे पावसाळ्यापुर्वी येथे खत खरेदीकरीता मोठी झूंबड उडतांन दिसत आहे.जव्हार तालुक्यातील शेतकऱ्यांची भात बियाणे जास्त प्रमाणात खरेदी करतात, त्यात प्रामुख्याने इंद्रायणी, सुवर्णा, डांगी, कसबय, सोनम, राशीपुनम, पाच ऐकी, मुंद्रायणी, सह्याद्री ६८९, कर्जत ४ ते १२, गुजरात, हे बियाणे हळवा भात म्हणून खरेदी करतात, तर मसुरा, कसबय, कर्जत ४, सुमा, एक काडी, कोलम, हे बीयाणे गरवा भात म्हणून खरेदी करतात. हळवा भात म्हणजे लवकर पिकणारा भात आहे, हे पीक १०० ते १२० दिवसांत पिकते, आणि गरवा भाताला १५० ते १८५ दिवस लागतात त्यामुळे हळवा भात बायाण्याला चांगलीच मागणी आहे. हळवा भात बियाणे प्रति किलो ८५ ते १७५ पर्यत, तर गरवा भात बीयाणा २५ किलो पोती, ९८ ते १९५ या दराने बाजारात उपलब्ध आहे.याच बरोबर प्रामुख्याने या भागात नागलीचे पिक मोठ्याप्रमाणात येथील शेतकरी घेतात. या भागात आदिवासी बांधव हे आपल्या कुटूंबाना वर्षभर पुरेल इतकी पेरणी करून थोडाफार पिक विक्री करता बाजारात आणतात. तसेच, वरई (वरी) बीयाणांची चलतीही मोठ्याप्रमाणात होते. या पिकाला बाजारात चांगली मागणी असल्यामुळे शेतकरी आप आपल्या आयपतीनुसार जागेच्या उपलब्धीनुसार पेरणी करून पिक घेतात.वरईची शेती ठरते नगदी शेतक-यांचा वाढता कलवरईला प्रोसेस करून भगर तयार करण्यात येते, तिला बाजारात जास्त मागणी असल्यामुळे ते नगदी ठरते. येथील शेतकरी वरईचे पीक मोठ्याप्रमाणात घेऊन उत्पन्नाचे स्त्रोत वाढवतात. प्रत्येक पीक घेण्यासाठी विविध प्रकाराचे खत व औषध शेतकºयांना लागत असते. पावसाळा जवळ आला की, खतांची खरेदी सुरू होते. परंतू पावसाळ्यापुर्वी खतांची मागणी जास्त असल्यामुळे भाव वाढ हाते, त्यामुळे शेतकºयांना वाढीव दराचा त्रास सोसावा लागत आहे.

टॅग्स :Vasai Virarवसई विरारFarmerशेतकरी