शहरं
Join us  
Trending Stories
1
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
2
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
3
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
4
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
5
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
6
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
7
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
8
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
9
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
10
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
11
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
12
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
13
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
14
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
15
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
16
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
17
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
18
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
19
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
Daily Top 2Weekly Top 5

वाढवण बंदराच्या मुद्द्यावरून मतदानावर बहिष्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2019 23:35 IST

धाकटी डहाणू, केळवेवासीयांचा निर्णय : जिल्हाधिकाऱ्यांची शिष्टाई झाली असफल

- हितेन नाईक/शौकत शेखपालघर : वाढवण बंदराविरोधातील धगधगता वणवा आता किनारपट्टीवरील विधानसभा मतदार संघात भडकू लागला आहे. याविरु द्ध स्थानिकांमध्ये प्रचंड रोष असून हे बंदर रद्द करावे यासाठी लोकांनी जोरदार संघर्ष उभा केला आहे. शासनाच्या बंदर उभारणीचा निषेध व्यक्त करण्यासाठी धाकटी डहाणू ग्रामपंचायतीने येत्या विधानसभा निवडणुकीत मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत ग्रामस्थांची सभा जि.प. शाळेच्या प्रांगणात पार पडली. ग्रामस्थांमधील या नाराजीचा फटका निवडणुकीत बसण्याची भीती सर्वपक्षीयांना भेडसावते आहे.

दरम्यान, केळवे रोड पूर्व येथील पूर्व - पश्चिम पट्ट्याला जोडणाºया उड्डाणपुलाच्या मागणीसह रस्त्याच्या दुरवस्थेबाबत प्रशासन गंभीर नसल्याने निवडणुकांवर टाकलेले बहिष्काराचे अस्त्र कृती समितीने बळकट करीत आपली भूमिका कायम केली.

वाढवण बंदर उभारणी व त्या अनुषंगाने बंदराला संरक्षण कवच बनलेल्या प्राधिकरणाला हटविण्याच्या हालचाली सरकारकडून सुरू असल्याने त्या विरोधात जनमानसात प्रचंड संताप आहे. सेना पक्ष प्रमुखांच्या ‘आम्ही लोकांसोबत राहू’ या वक्तव्यावर विश्वास ठेवत मागच्या दोन्ही लोकसभा निवडणुकीत धाकटी डहाणू, गुंगवाडा, तडीयाळे, पोखरण, धूमकेत, रायतळे, वरोर, वाढवण, चिंचणी येथील मतदारांनी सेना - भाजपच्या उमेदवारांना मतदान केले. परंतु भाजप सरकारने प्राधिकरण हटविण्याच्या अथवा त्या प्राधिकरणात आपलेच पदाधिकारी नियुक्त करून वाढवण बंदराचा मार्ग मोकळा करण्याचे प्रयत्न केंद्रातून सुरू झाले होते. वाढवण बंदराबाबत मी लोकांसोबत आहे या पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्यावर लोकांचा विश्वास असला तरी आम्ही वाढवण बंदर होऊ देणार नाही अशी स्पष्ट भूमिका त्यांनी घ्यावी अशी प्रांजळ अपेक्षा येथील मतदारांची आहे. खा. राजेंद्र गावित वगळता अन्य कोणीही लोकप्रतिनिधी आपली भूमिका अजूनही स्पष्ट करत नसल्याने वाढवण, धाकटी डहाणू, वरोर आदी भागातील तरु ण वर्ग भडकला आहे.

त्यांनी रस्त्यावर ‘एकच जिद्द, वाढवण बंदर रद्द’ अशा विविध स्लोगन लिहून किनारपट्टी भागात निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याबाबत जनजागृतीस सुरुवात केली आहे. याला किनारपट्टीवरील गावातून चांगला प्रतिसाद मिळत असून हे लोण अनेक गावांत सोशल मीडियाद्वारे पसरवले जात आहे. ग्रामस्थांच्या या भूमिकेमुळे उमेदवारांत भीतीचे वातावरण आहे.समस्या प्रलंबित राहिल्याने ग्रामस्थांचा उद्रेकरविवारी केळवे रोड परिसरातील ग्रामस्थांची एकित्रत बैठक पार पडली. या बैठकीत आगामी विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याची निर्णायक भूमिका घेण्यात आली. या परिसरातील नागरिकांचे वर्षानुवर्षे प्रलंबित प्रश्न जोपर्यंत सुटत नाहीत तोपर्यंत निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याची ही भूमिका कायम ठेवण्याचा निर्धार ग्रामस्थांनी केला आहे. केळवे रोड पूर्व - पश्चिम जोडणारा उड्डाणपूल हा अतिशय जिव्हाळ्याचा व अत्यावश्यक विषय आहे. या समस्येमुळे परिसरातील जनता शैक्षणिक आणि आरोग्यविषयकमूलभूत गरजांपासून वंचित राहते. वर्षानुवर्षे मतदानाचा हक्क बजावूनही अशा अनेक समस्या प्रलंबितच राहिल्याने उद्रेक होऊन जनतेने ही टोकाची भूमिका घेतली होती. या भूमिकेवर जिल्हाधिकाऱ्यांनी कृती समितीला चर्चेला बोलावले होते. मात्र समितीचे समाधान न झाल्याने त्यांनी विधानसभा निवडणुकीवर बहिष्काराची भूमिका कायम ठेवली आहे. निवडणुकांवर बहिष्कार घातलेल्या नागरिकांशी बोलून त्यावर उपाय योजना आखण्याबाबत मी पुन्हा त्यांच्याशी संवाद साधणार आहे.